शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

‘मेट्रो ३’ प्रकल्प ‘आरे’तूनच जाणार

By admin | Updated: April 2, 2016 01:45 IST

मेट्रो ३ ही विशेष योजना आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहित करावी लागत असून हा प्रकल्प ‘आरे’तूनच जाणार, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. योजना बदलली तरी २,३०० नाही

मुंबई : मेट्रो ३ ही विशेष योजना आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहित करावी लागत असून हा प्रकल्प ‘आरे’तूनच जाणार, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. योजना बदलली तरी २,३०० नाही; तर ३५० झाडे तोडावीच लागणार. तरीही हा प्रकल्प पर्यावरण आणि प्रदूषण कमी करणारा ठरणार आहे. मी मुंबईच्या वाहतुकीत आमूलाग्र बदल करून निवृत्तीनंतर नागपूरला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.झाडे वाचविण्यासाठी दलदलीची पर्यायी जागा घ्यावी लागणार आणि त्यासाठी दीड हजार कोटींचा अधिक भार पडेल, हा पैसा जनतेच्या खिशातूनच जाणार. त्याचा परिणाम तिकिटावर होईल. त्यामुळे आरेतून मेट्रो ३ जाणे सयुक्तिक आहे. पर्यावरणाचा विचार करता झाडे ही कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. पण हा कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी सार्वजनिक परिवहन हा सर्वांत उत्तम मार्ग आणि त्यातही मेट्रो हे सर्वोत्तम माध्यम समजले जाते, असे मुख्यमंत्री म्हणाले.इतर मुद्द्यांविषयी मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र ही योजना आम्ही राबवत आहोत. यात एका वर्षात १०० शहरे हागणदारीमुक्त केली आहेत. १० शहरांची स्मार्ट सिटीसाठी निवड केली. पुणे आणि सोलापूर वगळता इतर ८ शहरांना निधी उपलब्ध करून दिला आहे. शिवाय, केंद्राचा निधीही त्यांनाच देण्यात येणार आहे. ज्या महापालिका सरकारचा निधी घेऊन योजना वेळेपूर्वी पूर्ण करतील त्यांना बोनस निधी दिला जाणार आहे. तर ज्या योजना उशिरा पूर्ण होतील त्यांना आर्थिक दंड केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. एमआयडीसी, वीजप्रकल्पांना सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी पुरविले जाईल. तेच प्रक्रिया केलेले पाणी त्यांनी वापरावे, असे बंधन घातले जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)आयव्हीआरसीएलच्या कामांची चौकशी कराकोलकाता येथे आयव्हीआरसीएल कंपनीने बांधलेला एक मोठा पूल कोसळला. या कंपनीच्या महाराष्ट्रातल्या प्रकल्पांच्या कामांची तंत्रज्ञांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली. आयव्हीआरसीएल कंपनी काही अन्य कंपन्याबरोबर मिळून महाराष्ट्रातदेखील रस्त्यांची आणि अन्य प्रकल्पांची कामे करीत आहे. राज्यात अशी दुर्घटना होऊ नये, यासाठी सर्व कामांची तंत्रज्ञांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी केली.