शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
4
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
5
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
6
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
7
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
8
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
9
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
10
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
11
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
12
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
13
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
14
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
15
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
16
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
17
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
18
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
19
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
20
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

‘मेट्रो ३’ प्रकल्प ‘आरे’तूनच जाणार

By admin | Updated: April 2, 2016 01:45 IST

मेट्रो ३ ही विशेष योजना आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहित करावी लागत असून हा प्रकल्प ‘आरे’तूनच जाणार, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. योजना बदलली तरी २,३०० नाही

मुंबई : मेट्रो ३ ही विशेष योजना आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहित करावी लागत असून हा प्रकल्प ‘आरे’तूनच जाणार, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. योजना बदलली तरी २,३०० नाही; तर ३५० झाडे तोडावीच लागणार. तरीही हा प्रकल्प पर्यावरण आणि प्रदूषण कमी करणारा ठरणार आहे. मी मुंबईच्या वाहतुकीत आमूलाग्र बदल करून निवृत्तीनंतर नागपूरला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.झाडे वाचविण्यासाठी दलदलीची पर्यायी जागा घ्यावी लागणार आणि त्यासाठी दीड हजार कोटींचा अधिक भार पडेल, हा पैसा जनतेच्या खिशातूनच जाणार. त्याचा परिणाम तिकिटावर होईल. त्यामुळे आरेतून मेट्रो ३ जाणे सयुक्तिक आहे. पर्यावरणाचा विचार करता झाडे ही कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. पण हा कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी सार्वजनिक परिवहन हा सर्वांत उत्तम मार्ग आणि त्यातही मेट्रो हे सर्वोत्तम माध्यम समजले जाते, असे मुख्यमंत्री म्हणाले.इतर मुद्द्यांविषयी मुख्यमंत्री म्हणाले की, स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र ही योजना आम्ही राबवत आहोत. यात एका वर्षात १०० शहरे हागणदारीमुक्त केली आहेत. १० शहरांची स्मार्ट सिटीसाठी निवड केली. पुणे आणि सोलापूर वगळता इतर ८ शहरांना निधी उपलब्ध करून दिला आहे. शिवाय, केंद्राचा निधीही त्यांनाच देण्यात येणार आहे. ज्या महापालिका सरकारचा निधी घेऊन योजना वेळेपूर्वी पूर्ण करतील त्यांना बोनस निधी दिला जाणार आहे. तर ज्या योजना उशिरा पूर्ण होतील त्यांना आर्थिक दंड केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. एमआयडीसी, वीजप्रकल्पांना सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी पुरविले जाईल. तेच प्रक्रिया केलेले पाणी त्यांनी वापरावे, असे बंधन घातले जाणार आहे. (विशेष प्रतिनिधी)आयव्हीआरसीएलच्या कामांची चौकशी कराकोलकाता येथे आयव्हीआरसीएल कंपनीने बांधलेला एक मोठा पूल कोसळला. या कंपनीच्या महाराष्ट्रातल्या प्रकल्पांच्या कामांची तंत्रज्ञांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली. आयव्हीआरसीएल कंपनी काही अन्य कंपन्याबरोबर मिळून महाराष्ट्रातदेखील रस्त्यांची आणि अन्य प्रकल्पांची कामे करीत आहे. राज्यात अशी दुर्घटना होऊ नये, यासाठी सर्व कामांची तंत्रज्ञांकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी केली.