शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या कामाची पद्धत ‘एक घाव दोन तुकडे' - अजित पवार

By admin | Updated: October 26, 2016 14:03 IST

होय मी ‘खडूस’ आहे. मी फटाफट निर्णय घेतो. माझ्या कामाची पध्दत ‘एक घाव दोन तुकडे’ अशीच आहे.

 ऑनलाइन लोकमत 

सोलापूर, दि. २६ -  होय मी  ‘खडूस’  आहे. मी पटापट निर्णय घेतो. माझ्या कामाची पद्धत ‘एक घाव दोन तुकडे’ अशीच आहे. राज्याला खमक्या मुख्यमंत्री हवा, अशी वक्तव्ये करत एकाहून एक प्रश्नांच्या सरबत्तीसमोर कधी फटकळ कधी रोखठोक तर कधी अभ्यासू वृत्तीने सामोरे जात अजित पवार यांनी आपले विविध पैलू उलगडले.
 
रोटरी क्लब ऑफ सोलापूर मिडटाऊनच्या वतीने ‘गप्पा रोखठोक दादांशी’ या कार्यक्रमात ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांनी त्यांची मुलाखत घेतली. तब्बल पावणे दोन तास ही मुलाखत रंगली. मी वेळेवर येणारा माणूस आहे माझ्याबद्दल गैरसमज नको, असे सांगत त्यांनी एक तास उशिरा कार्यक्रम सुरू झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. 
 
आपण किती वाजता उठतो त्यानुसार कार्यकर्ते भेटायला येतात मी सकाळी सहा वाजल्यापासून माझ्या मतदार संघात कार्यरत असतो. पवार साहेबांमुळे ही शिकवण मिळाल्याची कबुली त्यांनी दिली. औद्योगिकीकरणामध्ये आंध्र, गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेले आहेत़ राज्याला खमक्या नेतृत्वाची गरज असल्याचे पवारांनी निक्षून सांगितले.
 
माझ्या कामाची पद्धत म्हणजे एक घाव दोन तुकडे अशीच आहे़ जे काम होते ते मी झटापट करतो आणि जे होणार नाही ते नाही असे स्पष्टपणे सांगतो़ चांद्यापासून ते बांद्यापर्यंत मी सिंचनाची कामे केली. त्यामुळे सहा टक्के सिंचन क्षेत्र वाढले यावर चितळे आयोगाने देखील शिक्कामोर्तब केला असताना मला भाजप नेत्यांनी बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. राज्य स्वतंत्र झाल्यापासून आजवर ७० हजार कोटींची कामे झाली आणि तेवढाच घोटाळा मी केल्याचा बिनबुडाचा आरोप केला जातो आहे़ या प्रकरणाची चौकशी सुरु आहे़ लवकरच ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ हे चित्र समोर येईल त्यामुळे याबद्दल अधिक बोलणे को असे पवार म्हणाले.
 
माझ्या काळात राष्ट्रवादीकडे जी खाती होती ती तपासा, निश्चित आमच्या मंत्र्यांच्या कामाचा आलेख चढता राहिला़ त्यामुळे विक्रीकराचे उत्पन्न वाढविणे असो, विविध प्रकल्पांची उंची वाढविणे असो आदी अनेक जनहिताचे निर्णय आम्ही घेतले़ आमच्या सरकारमुळेच राज्यात सध्या सरप्लस वीज झाली आहे. 
 
मी सत्तेत असताना एक टीएमसी पाण्याच्या  प्रकल्पासाठी सुमारे २०० कोटी खर्च व्हायचा आता हाच खर्च ८०० ते हजार कोटींवर आहे. पुण्याच्या मेट्रोला प्रतिदिनी विलंब झाल्यास दोन कोटींचा खर्च वाढत आहे त्यामुळे निर्णय झटापट झाले पाहिजेत, असे ते म्हणाले़ टेल टू हेड पाणी वाटपाचा कायदा आम्ही आणला, देशाने त्याचा अंमल केला असे पवार म्हणाले. 
 
किशोर कुमारांची गाणी अन् मधुबाला ही आवड कशी असे विचारात त्यांनी किशोर कुमाराची ८० व ९० च्या दशकातील गाणी आवडतात असे सांगितले. तुमच्या स्वभावाबद्दल मुलगा पार्थ काय म्हणतो तर बाप खडूस आहे असेच म्हणणार दुसरे काय असे अजित पवार  मिश्लिकपणे म्हणाले़ 
 
सुरुवातीला रोटरी क्लब ऑफ सोलापूर मिड टाऊनचे गुरुविंदसिंह बोमरा यांनी प्रास्ताविक केले़ रोटरी क्लबचे वर्षा विभुते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती यावेळी उपस्थित होत्या़ मान्यवरांनी देखील अजित पवार यांना विविध प्रश्न विचारले. श्वेता हुल्ले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 
 
सोलापूर रब्बीचा बागायती झाला ना !
आम्ही उजनी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला त्यामुळे ११४ टक्के पाणी उजनीमध्ये साठले जाते़ शिरापूर, बार्शी, सीना माढा आदी अनेक प्रकल्पांना आमच्या सरकारने मदत केली म्हणूत तर जिल्ह्यात ३८ साखर कारखाने झाले़ रब्बीचा सोलापूर जिल्हा बागायती झाला कसा याचा अभ्यास आपण केला पाहिजे असे अजित पवार यांनी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले़ कोयनेमध्ये ६ टीएमसी पाणी माझ्यामुळे वाढले. अनेक प्रकल्पांची उंची वाढविणे त्यांना निधी देणे ही कामे झाल्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाली.