शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

चिमुकल्यांनी भिंत रंगवून ठाणेकरांना दिला जलसाक्षरतेचा संदेश

By admin | Updated: May 16, 2016 03:24 IST

महाराष्ट्रातील भीषण दुष्काळामुळे पाणीटंचाई सर्वत्र जाणवू लागली आहे

ठाणे : महाराष्ट्रातील भीषण दुष्काळामुळे पाणीटंचाई सर्वत्र जाणवू लागली आहे. पाणीबचतीसाठी ठाणे शहरात सोसायटीस्तरावर विविध उपाय व उपक्रम योजिले जात असून ठाण्यातील प्राइड प्रेसिडेन्सी लक्झोरिया या सोसायटीतील चिमुकल्यांनी या जनजागरणासाठी पुढाकार घेतला. आपल्या सोसायटीच्या १५० फुटांच्या भिंतीवर पाणीटंचाईसारखी भीषण समस्या त्यांनी आपल्या कुंचल्यातून साकारली आहे. ढोकाळी येथील या सोसायटीतील चार ते १७ वर्षे वयोगटांतील जवळपास १५ मुलांनी सोसायटीमधील १५० फुटांची भिंत रंगवली आहे. या भिंतीवर पाणीटंचाई हा विषय घेऊन आपापल्या कल्पकतेतून चित्रे रेखाटून सर्वांचेच डोळे उघडले आहे. पाणी हे सर्वांसाठीच आहे, त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे, ही सर्वांची जबाबदारी आहे. पाणी हे केवळ मानवासाठीच आवश्यक नसून प्राणी आणि पक्ष्यांसाठीदेखील गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचाही विचार मानवाने केला पाहिजे, असा महत्त्वाचा संदेश या चिमुकल्यांनी चित्रांतून दिला आहे. ‘पावसाचे पाणी वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘झाडे नाहीतर पाऊस नाही आणि पाऊस नाही तर पाणी नाही’, ‘निसर्गावर प्रेम करा’, ‘नळाची गळती थांबवा’ आदी संदेश चित्रांतून रेखाटले आहे. आठ दिवसांत ही चित्रे या मुलांनी रेखाटली आहे. ती चित्रे रेखाटताना प्रत्येक मुलाने पाणी वाचवणे, ही आपली जबाबदारी असल्याचे मनाशी पक्के केले. मुलांच्या या उपक्रमाला त्यांच्या पालकांनी आणि सोसायटीच्या ज्येष्ठ नागरिकांनीही पाठिंबा दिला.