शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त वसाहत योजनेतून ‘स्वयंरोजगार स्वयंघरी’चा संदेश

By admin | Updated: July 6, 2014 23:27 IST

८0 कुटुंबांना लाभ : जमीन हस्तांतरणाची कार्यवाही पूर्ण

वाशिम : विकासापासून कोसो दूर असलेल्या भटक्या विमुक्त समाजातील भुमिहीन, बेघर व गोरगरीब कुटूंबांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेने आपल्या दारिद्रयावर मात करण्याचा आशेचा किरण दाखविला आहे. जिल्हयातील चार गावातील प्रत्येक २0 याप्रमाणे ८0 कुटूंबांची आवश्यक त्या मुलभुत सुविधांसह स्वतंत्र वसाहत निर्माण करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. या मोहिमेतून ह्यस्वयंरोजगार स्वयंघरीह्णचा संदेश दिला जाणार आहे.विमुक्त जाती, भटक्या जमातीतील दुर्बल कुटूंबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने ह्ययशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनाह्ण हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. वाशिम जिल्हयात जिल्हास्तरीय समितीने दीड वर्षांपूर्वी भटक्या विमुक्तांची अधिक लोकवस्ती असलेल्या मेडशी, किन्हीराजा, पोहरादेवी व फुलउमरी या चार गावांची निवड केली होती. या चार गावांमधून प्रत्येकी २0 याप्रमाणे ८0 कुटूंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. मध्यंतरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारंसहिता असल्याने गोरगरीब लाभार्थींची स्वतंत्र वसाहत निर्माण करण्याच्या कामाला ब्रेक लागले होते. आचारसंहिता संपताच लाभार्थी निवडही पार पडली. ८0 कुटुंबांना स्वतंत्र घरकुल व वसाहत निर्माण करण्याबरोबरच स्वयंरोजगार देण्याचेही या योजनेत प्रस्तावित राहणार आहे. दीड वर्षांपूर्वी या चारही गावात शासनाच्या पाच एकर जागेची पाहणी करण्यात आली होती. जिल्हास्तरीय चमूने जागेची निवड केल्यानंतर या जागेच्या मोजणीसाठी २0१३ च्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात भूमिअभिलेखच्या खात्यात आवश्यक ते शुल्कही जमा करण्यात आले होते. जमिन हस्तांतरणाची कार्यवाही पार पडल्यानंतर जमिन मोजणी आणि आता लाभार्थी निवडीची कार्यवाहीदेखील पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे ८0 कुटुंबांना राहण्यासाठी घर आणि उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगार मिळण्याच्या अपेक्षा आहेत.** मुक्त वसाहत योजनेतून स्वतंत्र वसाहत निर्मितीविमुक्त जाती व भटक्या जमातीमधील भूमिहीन, बेघर कुटूंब, एका लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले, यापुर्वी घरकुल योजनेचा लाभ न घेतलेले व महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या लाभार्थींची या योजनेत जिल्हास्तरीय समितीने निवड केली आहे.प्रत्येक गावातील २0 कूटुंबाची पाच एकरावर स्वतंत्र वसाहत शासनाकडून मोफत तयार केली जाणार आहे. प्रत्येक कुटूंबाला पाच गुंठे क्षेत्रफळ दिले जाईल. यावर घर बांधून दिले जाईल तसेच उर्वरीत जागा स्वयंरोजगारासाठी वापरता येणार आहे. जमिन हस्तांतरणाची प्रक्रिया झाली आहे.