शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मुक्त वसाहत योजनेतून ‘स्वयंरोजगार स्वयंघरी’चा संदेश

By admin | Updated: July 6, 2014 23:27 IST

८0 कुटुंबांना लाभ : जमीन हस्तांतरणाची कार्यवाही पूर्ण

वाशिम : विकासापासून कोसो दूर असलेल्या भटक्या विमुक्त समाजातील भुमिहीन, बेघर व गोरगरीब कुटूंबांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेने आपल्या दारिद्रयावर मात करण्याचा आशेचा किरण दाखविला आहे. जिल्हयातील चार गावातील प्रत्येक २0 याप्रमाणे ८0 कुटूंबांची आवश्यक त्या मुलभुत सुविधांसह स्वतंत्र वसाहत निर्माण करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. या मोहिमेतून ह्यस्वयंरोजगार स्वयंघरीह्णचा संदेश दिला जाणार आहे.विमुक्त जाती, भटक्या जमातीतील दुर्बल कुटूंबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने ह्ययशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनाह्ण हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. वाशिम जिल्हयात जिल्हास्तरीय समितीने दीड वर्षांपूर्वी भटक्या विमुक्तांची अधिक लोकवस्ती असलेल्या मेडशी, किन्हीराजा, पोहरादेवी व फुलउमरी या चार गावांची निवड केली होती. या चार गावांमधून प्रत्येकी २0 याप्रमाणे ८0 कुटूंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. मध्यंतरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारंसहिता असल्याने गोरगरीब लाभार्थींची स्वतंत्र वसाहत निर्माण करण्याच्या कामाला ब्रेक लागले होते. आचारसंहिता संपताच लाभार्थी निवडही पार पडली. ८0 कुटुंबांना स्वतंत्र घरकुल व वसाहत निर्माण करण्याबरोबरच स्वयंरोजगार देण्याचेही या योजनेत प्रस्तावित राहणार आहे. दीड वर्षांपूर्वी या चारही गावात शासनाच्या पाच एकर जागेची पाहणी करण्यात आली होती. जिल्हास्तरीय चमूने जागेची निवड केल्यानंतर या जागेच्या मोजणीसाठी २0१३ च्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात भूमिअभिलेखच्या खात्यात आवश्यक ते शुल्कही जमा करण्यात आले होते. जमिन हस्तांतरणाची कार्यवाही पार पडल्यानंतर जमिन मोजणी आणि आता लाभार्थी निवडीची कार्यवाहीदेखील पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे ८0 कुटुंबांना राहण्यासाठी घर आणि उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगार मिळण्याच्या अपेक्षा आहेत.** मुक्त वसाहत योजनेतून स्वतंत्र वसाहत निर्मितीविमुक्त जाती व भटक्या जमातीमधील भूमिहीन, बेघर कुटूंब, एका लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले, यापुर्वी घरकुल योजनेचा लाभ न घेतलेले व महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या लाभार्थींची या योजनेत जिल्हास्तरीय समितीने निवड केली आहे.प्रत्येक गावातील २0 कूटुंबाची पाच एकरावर स्वतंत्र वसाहत शासनाकडून मोफत तयार केली जाणार आहे. प्रत्येक कुटूंबाला पाच गुंठे क्षेत्रफळ दिले जाईल. यावर घर बांधून दिले जाईल तसेच उर्वरीत जागा स्वयंरोजगारासाठी वापरता येणार आहे. जमिन हस्तांतरणाची प्रक्रिया झाली आहे.