शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

आजारी जिल्हा बँकांचे राज्य बँकेत विलीनीकरण

By admin | Updated: April 29, 2017 03:22 IST

आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करावे, असे मत मुख्यमंत्री

मुंबई : आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करावे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरीप हंगामाच्या बैठकीत व्यक्त केले. सरकारने याबाबत निर्णय घेतला तर राज्यातील किमान नऊ जिल्हा बँकांचे अशा पद्धतीने विलीनीकरण होऊ शकते. जिल्हा बँकांमार्फत कृषी पतपुरवठा केला जातो. मात्र, गैरव्यवस्थापनामुळे आर्थिक डबघाईला आलेल्या जिल्हा बँकांमुळे या वर्षी संबंधित जिल्ह्यात राज्य शिखर बँकेमार्फत पीक कर्जाचे वाटप करावे लागले. नोटाबंदीच्या काळात रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणल्यामुळे राज्यातील जिल्हा बँकांनी स्वीकारलेल्या पाच हजार कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत. नोटाबंदीमुळे या बँकांची आर्थिक कोंडी झाली. नाशिक जिल्हा बँकेत तर शिक्षकांचे पगार, ठेवी अडकल्या आहेत. आठवडाभरापासून तिथे आंदोलन सुरू आहे. राज्यातील बहुतेक जिल्हा बँकांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. आर्थिक डबघाईच्या कारणामुळे या बँकांचे राज्य शिखर बँकेत विलीनीकरण करून विरोधकांच्या हातून आर्थिक सत्ताकेंद्र काढून घेण्याचा विचार यामागे असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावेळी जालना जिल्ह्याने पीक कर्ज विमा योजनेत शंभर टक्के सहभाग घेऊन महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळविल्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संबंधितांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते आदी मंत्री, मुख्य सचिव सुमित मल्लिक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी) एकच बँक ठेवा!आजारी जिल्हा बँकाच नव्हे तर सर्वच जिल्हा बँकांचे राज्य बँकेत विलिनीकरण करून केरळसारखी एकच बँक ठेवावी, असा प्रस्तावही शासनासमोर असल्याचे सूत्रांनी सांगितले. नाबार्ड-राज्य बँक-जिल्हा बँक-विविध कार्यकारी सोसायटी-शेतकरी अशी कर्जवाटपाची महाराष्ट्रातील आजची साखळी आहे. जिल्हा बँक विलिन केल्या तर कर्जवाटपाची नवीन व्यवस्था निर्माण करावी लागेल. जलशिवारसाठी निधी कमी पडू देणार नाहीजलयुक्त शिवारची कामे येत्या दोन महिन्यात युद्धपातळीवर पूर्ण करा, शेततळी आणि विहिरीही पूर्ण करा, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.

सर्वांना कर्जाचा लाभ मिळवून द्या!पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा, तालुका, गावपातळीवर पीक कर्ज मेळावे आयोजित करावेत. तसेच कृषी विद्यापीठाने पीक पद्धतीचे नियोजन करून आपल्या विभागात कोणती पिके घेतली पाहिजेत यासाठी प्रयत्न करावेत, दुबार पेरणीचे संकट येऊ नये यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. सध्या कर्ज घेत असलेल्या शेतकऱ्यांव्यतिरिक्त ३० लाख शेतकरी हे कर्ज घेत नाहीत त्यांनाही कर्जाचा लाभ मिळवून द्या, त्यासाठी अविश्रांत मेहनत घ्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.या बँकांची स्थिती नाजूक : सोलापूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, जालना, परभणी, बुलडाणा, वर्धा आणि नागपूर या जिल्हा बँकांची स्थिती अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे या बँकांना दिलेल्या पीक कर्जाचे उद्दिष्ट साध्य होत नाही. त्यामुळे या बँकांच्या विलीनीकरणाचे सूतोवाच स्वत: मुख्यमंत्र्यांनी केले आहे.