शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा पारा ३५ वरून ३३ अंशावर

By admin | Updated: May 2, 2017 05:11 IST

चैत्रानंतर सुरू झालेल्या वैशाख वणव्यादरम्यान वातावरणात बदल होत असून मुंबईचा पारा ३५ वरून ३३ अंशावर गेला आहे

मुंबई : चैत्रानंतर सुरू झालेल्या वैशाख वणव्यादरम्यान वातावरणात बदल होत असून मुंबईचा पारा ३५ वरून ३३ अंशावर गेला आहे. राज्यात ठिकठिकाणी गारांचा मारा सुरू असून, मराठवाड्यासह विदर्भात सातत्याने गारांसह पाऊस पडत असून, २ मे रोजी विदर्भातील काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडेल तर उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे. जळगाव, मालेगाव, परभणी, नांदेड, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या शहरांचे कमाल तापमान अद्याप ४० अंशावर नोंदवण्यात येत आहे, तर दुसरीकडे मुंबईचे कमाल तापमान सातत्याने ३५ अंश नोंदवण्यात येत होते. आता मात्र, मुंबईच्या कमाल तापमानात २ अंशांची घसरण झाली आहे. मुंबईचे कमाल ३३ अशांवर घसरले आहे.दरम्यान, मुंबईच्या कमाल तापमानात दोन अंशाची घसरण झालीआहे. मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब असली तरी तापमानात घसरण होऊनही येथे उष्ण आणि कोरडे वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. शिवाय उकाडाही कायम आहे. वाहणाऱ्या या कोरड्या, उष्ण वाऱ्यांमुळे मुंबईकर घामाघूम  होत असून, मंगळवारसह बुधवारी मुंबईचे कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)