शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

मुंबईचा पारा ३५ वरून ३३ अंशावर

By admin | Updated: May 2, 2017 05:11 IST

चैत्रानंतर सुरू झालेल्या वैशाख वणव्यादरम्यान वातावरणात बदल होत असून मुंबईचा पारा ३५ वरून ३३ अंशावर गेला आहे

मुंबई : चैत्रानंतर सुरू झालेल्या वैशाख वणव्यादरम्यान वातावरणात बदल होत असून मुंबईचा पारा ३५ वरून ३३ अंशावर गेला आहे. राज्यात ठिकठिकाणी गारांचा मारा सुरू असून, मराठवाड्यासह विदर्भात सातत्याने गारांसह पाऊस पडत असून, २ मे रोजी विदर्भातील काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडेल तर उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे. जळगाव, मालेगाव, परभणी, नांदेड, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या शहरांचे कमाल तापमान अद्याप ४० अंशावर नोंदवण्यात येत आहे, तर दुसरीकडे मुंबईचे कमाल तापमान सातत्याने ३५ अंश नोंदवण्यात येत होते. आता मात्र, मुंबईच्या कमाल तापमानात २ अंशांची घसरण झाली आहे. मुंबईचे कमाल ३३ अशांवर घसरले आहे.दरम्यान, मुंबईच्या कमाल तापमानात दोन अंशाची घसरण झालीआहे. मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब असली तरी तापमानात घसरण होऊनही येथे उष्ण आणि कोरडे वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. शिवाय उकाडाही कायम आहे. वाहणाऱ्या या कोरड्या, उष्ण वाऱ्यांमुळे मुंबईकर घामाघूम  होत असून, मंगळवारसह बुधवारी मुंबईचे कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)