शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पारा चढतोय !

By admin | Updated: March 21, 2015 01:26 IST

अवकाळी पावसाचे संकट दूर झाल्यानंतर राज्याच्या तापमानात गेल्या ४-५ दिवसांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात उन्हाच्या झळा : अवकाळीचे ढग सरलेपुणे : अवकाळी पावसाचे संकट दूर झाल्यानंतर राज्याच्या तापमानात गेल्या ४-५ दिवसांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली असून, उकाडा जाणवू लागला आहे. शुक्रवारी राज्यात सर्वाधिक ३८.९ अंश सेल्सिअस तापमान सोलापूरमध्ये नोंदविले गेले.मार्चच्या पहिले पंधरा दिवस राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धुमाकूळ घातला होता. मार्च महिना उजाडला तरी थंडीचा मौसम जाणवत होता. यामुळे ऐन मार्च महिन्यातही राज्याचे तापमान सरासरीपेक्षा ३ ते ७ अंशांनी खाली होते. उन्हाचा कडाका जाणवत नसल्यामुळे राज्यातील नागरिक काहीसे खुश होते. पण दुसरीकडे पावसाने कहर केल्यामुळे नुकसानही होत होते. मात्र ४ दिवसांपूर्वी राज्यावरील अवकाळी पावसाचे ढग पूर्णपणे सरले. आता राज्यात हवामान कोरडे राहत असल्याने लगेचच तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली. शुक्रवारी सोलापूरपाठोपाठ अहमदनगरचे तापमान ३८.५ अंश, परभणीचे तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील ४ दिवस राज्यातील हवामान कोरडेच राहणार असल्याने तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. (प्रतिनिधी) प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुणे ३६.३, अहमदनगर ३८.५, जळगाव ३६.७, कोल्हापूर ३६.३, महाबळेश्वर ३०, मालेगाव ३६.३, नाशिक ३५.६, सांगली ३६.३, सातारा ३६.४, सोलापूर ३८.९, मुंबई ३४.२, अलिबाग ३३.८, रत्नागिरी ३१.६, डहाणू ३१.३, उस्मानाबाद ३६.६, औरंगाबाद ३६, परभणी ३८, नांदेड ३७.५, अकोला ३६.८, अमरावती ३४.६, बुलडाणा ३४.७, ब्रम्हपुरी ३६, चंद्रपूर ३७.८, नागपूर ३५.२, वाशिम ३५.२,वर्धा ३५, यवतमाळ ३३.८.च्चार दिवसांपूर्वी राज्यावरील अवकाळी पावसाचे ढग पूर्णपणे सरले. आता राज्यात हवामान कोरडे राहत असल्याने लगेचच तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली. शुक्रवारी राज्यात सर्वाधिक ३८.९ अंश सेल्सिअस तापमान सोलापूरमध्ये नोंदविले गेले.