शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

लिलावगृहातील व्यापाऱ्यांची अडवणूक सुरू

By admin | Updated: June 11, 2016 02:51 IST

कांदा-बटाटा मार्केटमधील बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांना लिलावगृहात जागा उपलब्ध करून दिली आहे.

नवी मुंबई : कांदा-बटाटा मार्केटमधील बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांना लिलावगृहात जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतु त्यांचे नुकसान करण्यासाठी लिलावगृहाच्या तीनही बाजूने अनधिकृतपणे अवजड वाहने उभी केली जात आहेत. ग्राहकांना ये - जा करण्यासाठीही अडथळा होत असून मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाजार समितीने कांदा मार्केटमधील बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांना २००८ मध्ये गाळ्यांमध्ये व्यवसाय करण्यास बंदी घातली. सर्वांनी लिलावगृहात व्यवसाय करण्याची अट घातली. सुरवातीला सर्व व्यापारी लिलावगृहात आले. परंतु त्यामधील बहुतांश जणांनी पुन्हा अनधिकृतपणे गाळे भाड्याने घेवून व्यापार सुरू केला आहे. यामधील अनेकांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले आहेत, तरीही प्रशासन त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही. जे बिगरगाळाधारक प्रामाणिकपणे लिलावगृहात व्यवसाय करतात त्यांना अडचणीत आणले जात आहे. लिलावगृहाच्या तीनही बाजूला अनधिकृतपणे अवजड वाहने उभी केली जात आहेत. वास्तविक नियमाप्रमाणे मार्केटमध्ये माल घेवून येणारी वाहने तत्काळ खाली करून बाहेर गेली पाहिजेत. परंतु कांदा मार्केटमध्ये अनेक वाहने ८ ते १० दिवस एकाच ठिकाणी उभी असतात. अनधिकृत वाहनतळाचे स्वरूप मार्केटला आले आहे. लिलावगृहाला लागून वाहने उभी असल्याने ग्राहकांना लिलावगृहात जाता येत नाही. ग्राहकांनी पाठ फिरविल्याने अनेकांना त्यांचा व्यवसाय बंद करावा लागला आहे. उर्वरित व्यापाऱ्यांनाही येथून गाशा गुंडाळून लावण्यासाठी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जावू लागले आहेत. बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांनी वारंवार अनधिकृत वाहनतळाची तक्रार प्रशासनाकडे केली आहे. परंतु या तक्रार अर्जांना केराची टोपली दाखविली जात आहे. लिलावगृहामध्ये माथाडी कामगारांचा मेळावा असेल तरच वाहने हटविली जातात. याव्यतिरिक्त कोणी कितीही तक्रारी केल्या तरी वाहने बाजूला केली जात नाहीत. यामुळे व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला लिलावगृहात जागा देवून आमचा व्यवसाय बंद पाडण्याचे षड्यंत्र सुरू असल्याची शंका उपस्थित केली आहे. बाजार समिती प्रशासनाने तत्काळ अनधिकृत पार्किंग बंद करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)बिगरगाळाधारकांवर अन्याय प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या बिगरगाळाधारक व्यापाऱ्यांवर बाजार समिती प्रशासन वारंवार अन्याय करत आहे. बाजार समितीने दिलेल्या आदेशाप्रमाणे व्यापाऱ्यांनी लिलावगृहात व्यापार सुरू केला. परंतु ज्यांनी अनधिकृतपणे गाळ्यात व्यवसाय सुरू ठेवला त्यांच्यावर काहीच कारवाई केलेली नाही. लिलावगृहातील व्यापाऱ्यांच्या जागेसमोर वाहने उभी करून ठेवली जात आहेत. तक्रार केली तरी कोणीच लक्ष देत नसल्याने अजून किती दिवस अन्याय सहन करायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.