शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

मानसिक स्थैर्यासाठी संतसाहित्य उत्तम

By admin | Updated: November 9, 2014 00:02 IST

सध्याचे जग हे स्पर्धेचे आहे, या चढाओढीत अस्तित्व सिद्ध करण्याची लढाई सुरू आहे, यात प्रत्येकाचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे.

पुणो :  सध्याचे जग हे स्पर्धेचे आहे, या चढाओढीत अस्तित्व सिद्ध करण्याची  लढाई सुरू आहे, यात प्रत्येकाचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे.  मानसिक स्थैर्य मिळविण्यासाठी संतसाहित्य हा उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच संचेती यांनी केले. 
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे माजी विभागप्रमुख प्रा. अशोक कामत यांनी संपादित केलेल्या ‘निवडक सार्थ नामदेव’ या ग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी ते बोलत होते. गुरूकुल प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम कर्वे रस्त्यावरील स्वामी कृपा हॉल येथे पार पडला. याप्रसंगी संत नामदेव महाराजांचे विद्यमान वंशज ज्ञानेश्वर महाराज, ज्येष्ठ पत्रकार सागर देशपांडे उपस्थित होते. 
डॉ. संचेती म्हणाले, संत साहित्यामधून संतांनी संस्काराची शिकवण दिली. पिढ्यानपिढ्या संस्काराची मुल्ये बदलत गेली तरी मूळ तत्व बदलत नाही. ज्ञानातून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर शहाणपण असावे लागते तेच देण्याचा प्रयत्न संतांनी केला. आचार-विचार यांची सांगड घातली की संवेदनशीलता निर्माण होते,  संतानी संतसाहित्यामधून ती संवेदनशीलता जागृत करण्याचे काम केले.
डॉ.  कामत म्हणाले, साहित्यिक हे कधीच राजकारण्यांना शरण जात नाहीत तर ते समाज समृद्ध करण्याचे काम करतात. साहित्य हे खर्-या अर्थाने विचार देण्याचे नव्हेतर तर आचार देण्याचे व्यासपीठ आहे.
लवकरच सर्वसामान्यांची जिज्ञासापूर्ती करण्यासाठी आणि अभ्यासक व संशोधकांना विश्लेषण करण्यासाठी दोन ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. याच साहित्याने आचाराचे उत्तम देणो दिले आहे.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्ता पुणतांबेकर यांनी केले.  (प्रतिनिधी)