शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

मासिक पाळीच्या दिवसांत गावाबाहेर राहावे लागते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 06:33 IST

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नाराजी; मुख्य सचिवांना बजावली नोटीस 

- यदु जोशी

मुंबई : मासिक पाळीच्या दिवसांत महिलांना गावाबाहेरील झोपडीत पाठविण्याच्या (गावकोर) आदिवासी समाजातील प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी सरकारने काय प्रयत्न केले, असा प्रश्न राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने केला आहे, तसेच याबाबत जागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर २०१५मध्ये स्थापन केलेल्या समितीची एकही बैठक न झाल्याबाबत मुख्य सचिवांना पाठविलेल्या नोटिशीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

प्रामुख्याने गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमधील माडिया गोंड आदिवासी समाजामध्ये ही अनिष्ट प्रथा आहे. मासिक पाळीदरम्यान महिला, मुलींना गावाबाहेर झोपडीत (कुरमाघर) पाठविले जाते. त्यांना घरून जेवण दिले जाते. या वेळी जेवण पोहोचविणारे कुणी नसेल, तर त्यांचे हाल होतात. जवळ पाणवठा असला, तरी त्या ठिकाणी जाऊन पाणीदेखील त्यांना पिता येत नाही.

या प्रथेमुळे महिलांना सोसाव्या लागणाऱ्या त्रासाबाबत गडचिरोलीतील ‘स्पर्श’ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिलीप बारसागडे यांनी अनेक आदिवासी पाड्यांवर फिरून सर्वेक्षण केले आणि त्याविषयीची निवेदने जिल्हाधिकारी, आदिवासी विकास विभागाकडे अनेकदा दिली, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. शेवटी बारसागडे यांनी मानवाधिकार आयोगाचा दरवाजा ठोठावला. आयोगाने याची गंभीर दखल घेत, राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस पाठवून चार आठवड्यांत उत्तर देण्याच्या सूचना दिल्या आहेत.विश्रांती मिळावी यासाठी पद्धतमासिक पाळीच्या काळात महिलेच्या शरीरातील अशुद्ध रक्त दैवी शक्तीच्या आधारे निघून जाते. या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप नको, म्हणून महिलांना या काळात गावाबाहेरील झोपडीत ठेवले जाते, असे समर्थन गावकोर प्रथेच्या समर्थनासाठी दिले जाते. महिलांना मासिक पाळीच्या काळात विश्रांती मिळावी, म्हणून गावकोर पद्धत असल्याचा दावादेखील केला जातो.

टॅग्स :Womenमहिला