शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
2
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
3
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
4
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
5
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
6
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
7
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
8
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
9
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
10
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
11
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
12
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
13
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
14
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
15
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
16
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
18
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
19
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
20
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार

कर्ता पुरुष अडकल्याने घरातील चूल बंद!

By admin | Updated: September 22, 2016 22:08 IST

दोन दिवस झाले आमच्या घरी चूल पेटलेली नाही़ कोणत्याही प्रकारची चूक नसताना कर्ता पुरुष अटकेत असल्याने आमच्यावर संकट कोसळले आहे़

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. २२ : दोन दिवस झाले आमच्या घरी चूल पेटलेली नाही़ कोणत्याही प्रकारची चूक नसताना कर्ता पुरुष अटकेत असल्याने आमच्यावर संकट कोसळले आहे़ जीवन जगायचे कसे, लहान मुलांना सांभाळायचे कसे, असा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे़ या संदर्भात पालकमंत्र्यांपुढे कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला तर आमचे म्हणणे ऐकून न घेता दुर्लक्ष केल्याची कैफियत अटकेतील शेतकरी कुटुंबातील महिलांनी व्यक्त केली़ या वेळी त्यांनी आपल्या अश्रूंना वाट करून दिली़ दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठकीपूर्वी बंद खोलीत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली़

अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या प्रश्नावरुन मंगळवारी शेतकऱ्यांनी आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेकही केली. यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली़ ही बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बंद खोलीत पार पडली़ त्यात पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्यासह काही अधिकारी उपस्थित होते़ बंद खोलीत बैठक झाल्याने त्यात काय चर्चा झाली, हे मात्र कळू शकले नाही.

असे असले तरी या बैठकीत मंगळवारी झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात विचारविनिमय झाला असल्याचे सांगण्यात आले़ या बैठकीनंतर नियोजन सभागृहात धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत बैठक झाली़ या वेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक चैतन्या एस़, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, सिंचन विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते़

बैठकीत सुरुवातीस पालकमंत्री म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयावरील दगडफेकप्रकरणी पोलीस प्रशासन सीसीटीव्हीचे उपलब्ध असलेले फुटेज पाहून निर्णय घेतील़ दगडफेकीत ज्यांचा समावेश नाही, त्या व्यक्तींची नावे मागे घेण्याबाबत पोलीस प्रशासन कार्यवाही करेल़ शेतकऱ्यांच्या भावनांशी आपण सहमत आहोत़ या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविल्या जातील़ त्यानंतर निर्णय घेतला जाईल़ असे सांगून डाव्या कालव्याचे काम सात दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले़ २५ वर्ष होऊनदेखील काम मार्गी लागत नाही़ आमच्यावर संकट कोसळले असताना आम्ही कोणाकडे दाद मागायची? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला़ पालकमंत्र्यांना युवक कॉँग्रेसचा घेरावआंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी पालकमंत्री दादा भुसे यांना युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी घेराव घालण्यात आला़ राज्यात सरकारच्या दुटप्पी भुमिकेमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे़ शेतकऱ्यांना कांदा ५ पैसे दराने विकण्याची वेळ आलेली आहे़ असे असताना अक्कलपाडा प्रकल्पातील पाणी डाव्या कालव्याने मिळावे म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांवर लाठीहल्ला करण्यात आला. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे़ प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात येऊनही काम मार्गी लागलेले नाही़ तातडीने डाव्या कालव्याचे काम पूर्ण करावे आणि आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या, अशी मागणी या वेळी करण्यात आली़ युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीलेश काटे, प्रभादेवी परदेशी, गायत्री जयस्वाल, योगिता पवार, बानू शिरसाठ, सतीश रवंदळे, डॉ़ कैलास सोनवणे, हरीश पाटील, मुबीन अन्सारी, अबुलास खान, रफीक शाह, योगेश विभुते, मसूद सरदार, महेश कालेवार, सरवर अन्सारी, राजू कर्पे, मोहसीन तांबोळी, नाजनीन शेख, शोएब अन्सारी, रिदवान अन्सारी आदी या वेळी उपस्थित होते.