शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
3
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
4
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
5
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
6
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
7
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
8
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
9
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
10
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
11
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
12
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
13
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
14
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
15
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
16
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
17
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
18
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
19
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
20
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?

कर्ता पुरुष अडकल्याने घरातील चूल बंद!

By admin | Updated: September 22, 2016 22:08 IST

दोन दिवस झाले आमच्या घरी चूल पेटलेली नाही़ कोणत्याही प्रकारची चूक नसताना कर्ता पुरुष अटकेत असल्याने आमच्यावर संकट कोसळले आहे़

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. २२ : दोन दिवस झाले आमच्या घरी चूल पेटलेली नाही़ कोणत्याही प्रकारची चूक नसताना कर्ता पुरुष अटकेत असल्याने आमच्यावर संकट कोसळले आहे़ जीवन जगायचे कसे, लहान मुलांना सांभाळायचे कसे, असा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे़ या संदर्भात पालकमंत्र्यांपुढे कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला तर आमचे म्हणणे ऐकून न घेता दुर्लक्ष केल्याची कैफियत अटकेतील शेतकरी कुटुंबातील महिलांनी व्यक्त केली़ या वेळी त्यांनी आपल्या अश्रूंना वाट करून दिली़ दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठकीपूर्वी बंद खोलीत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली़

अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या प्रश्नावरुन मंगळवारी शेतकऱ्यांनी आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेकही केली. यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली़ ही बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बंद खोलीत पार पडली़ त्यात पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्यासह काही अधिकारी उपस्थित होते़ बंद खोलीत बैठक झाल्याने त्यात काय चर्चा झाली, हे मात्र कळू शकले नाही.

असे असले तरी या बैठकीत मंगळवारी झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात विचारविनिमय झाला असल्याचे सांगण्यात आले़ या बैठकीनंतर नियोजन सभागृहात धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत बैठक झाली़ या वेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक चैतन्या एस़, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, सिंचन विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते़

बैठकीत सुरुवातीस पालकमंत्री म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयावरील दगडफेकप्रकरणी पोलीस प्रशासन सीसीटीव्हीचे उपलब्ध असलेले फुटेज पाहून निर्णय घेतील़ दगडफेकीत ज्यांचा समावेश नाही, त्या व्यक्तींची नावे मागे घेण्याबाबत पोलीस प्रशासन कार्यवाही करेल़ शेतकऱ्यांच्या भावनांशी आपण सहमत आहोत़ या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविल्या जातील़ त्यानंतर निर्णय घेतला जाईल़ असे सांगून डाव्या कालव्याचे काम सात दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले़ २५ वर्ष होऊनदेखील काम मार्गी लागत नाही़ आमच्यावर संकट कोसळले असताना आम्ही कोणाकडे दाद मागायची? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला़ पालकमंत्र्यांना युवक कॉँग्रेसचा घेरावआंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी पालकमंत्री दादा भुसे यांना युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी घेराव घालण्यात आला़ राज्यात सरकारच्या दुटप्पी भुमिकेमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे़ शेतकऱ्यांना कांदा ५ पैसे दराने विकण्याची वेळ आलेली आहे़ असे असताना अक्कलपाडा प्रकल्पातील पाणी डाव्या कालव्याने मिळावे म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांवर लाठीहल्ला करण्यात आला. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे़ प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात येऊनही काम मार्गी लागलेले नाही़ तातडीने डाव्या कालव्याचे काम पूर्ण करावे आणि आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या, अशी मागणी या वेळी करण्यात आली़ युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीलेश काटे, प्रभादेवी परदेशी, गायत्री जयस्वाल, योगिता पवार, बानू शिरसाठ, सतीश रवंदळे, डॉ़ कैलास सोनवणे, हरीश पाटील, मुबीन अन्सारी, अबुलास खान, रफीक शाह, योगेश विभुते, मसूद सरदार, महेश कालेवार, सरवर अन्सारी, राजू कर्पे, मोहसीन तांबोळी, नाजनीन शेख, शोएब अन्सारी, रिदवान अन्सारी आदी या वेळी उपस्थित होते.