शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

स्त्री-पुरुषांना समान हक्क मिळावेत- चेतन भगत

By admin | Updated: October 6, 2016 19:54 IST

प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला कायद्यानुसार समान हक्क मिळावेत, असं वक्तव्य प्रख्यात लेखक चेतन भगत यांनी केलं आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 6 - प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला कायद्यानुसार समान हक्क मिळावेत, असं वक्तव्य प्रख्यात लेखक चेतन भगत यांनी केलं आहे. 'लोकमत'ने केसरी टूर्स व ट्रॅव्हल्स प्रा.लि.च्या सहयोगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला केसरी टूर्स व ट्रॅव्हल्स प्रा.लि. झेलम चौबळ आणि लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा उपस्थित होते. यावेळी लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी कार्यक्रमाला संबोधित केले.

"कौटुंबिक हिंसाचाराविषयी संसदेत विधेयक मंजूर करताना डोळ्यांत अश्रू आले होते. आजही महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. मंदिर आणि मशिदींमध्ये महिलांना आजही प्रवेश नाकारला जात आहे. मात्र आज ही परिस्थिती काही प्रमाणात बदलत आहे. यामध्ये लोकमतने राबविलेल्या विविध उपक्रमांचा मोठा वाटा आहे. लोकमत सखी मंच यांचा त्यात मोठा वाटा आहे. 40 महिलांपासून सुरू झालेला सखी मंच 3 लाख महिलांचा झाला असून,  आज आपण महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे", असं मत लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मांडलं आहे.त्यानंतर मंचावर आलेले चेतन भगत म्हणाले, "अनेक पुरुष नेहमी मुलीकडे पाहून हायफाय आहे, असं म्हणतात. मात्र लग्न करायला त्यांना घरगुती मुलगीच लागते. अनेक महिलांना घर सांभाळणे ही मुख्य जबाबदारी वाटते. तर अनेक महिलांना करियर, मात्र काहींना दोन्ही जबाबदा-या महत्त्वाच्या वाटतात. प्रत्येक स्त्रीनुसार तिची जबाबदारी बदलते. आपण महिलांना संधी देतो मात्र जेव्हा त्या काही साध्य करायला जातात तेव्हा आपल्याला त्यांच्याबाबत प्रश्न पडतो की त्या घरातील कामे करतील का ?, असा प्रश्न चेतन भगत यांनी उपस्थित केला आहे.

माझं लिखाण जरी खूप अनौपचारिक वाटत असले तरी त्यामागे एक विचार असतो. तो संदेश मला माझ्या लिखाणातून पोहोचवायचा असतो, असं प्रतिपादन चेतन भगत यांनी केलं आहे.

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे- 

- अनेक पुरुष नेहमी मुलीकडे पाहून हायफाय आहे, असं म्हणतात. मात्र लग्न करायला त्यांना घरगुती मुलगीच लागते
- अनेक महिलांना घर सांभाळणे ही मुख्य जबाबदारी वाटते. तर अनेक महिलांना करियर, मात्र काहींना दोन्ही जबाबदा-या महत्त्वाच्या वाटतात
- प्रत्येक स्त्रीनुसार तिची जबाबदारी बदलते, स्त्रीवाद हा प्रत्येक गोष्टीतून आपल्या समोर येतो
- आपण महिलांना संधी देतो मात्र जेव्हा त्या काही साध्य करायला जातात तेव्हा आपल्याला त्यांच्याबबत प्रश्न पडतो की ही घरातील कामे करेल का ?
- महिलांच्या बाबतीत अनेक कायदे आहेत, मात्र पुरुषांच्या बाजूने फार कमी कायदे आहेत
- माझं लिखाण जरी खूप अनौपचारिक वाटत असेल तरी त्यामागे एक विचार असतो, तो संदेश मला माझ्या लिखाणातून पोहोचवायचा असतो

चेतन भगत हे विशेष करून तरुण पिढीतील मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. सध्याचे आघाडीचे बेस्टसेलर लेखक म्हणून त्यांचे नाव देश-विदेशात सन्मानाने घेतले जाते. भारतीय लेखक, स्तंभलेखक, प्रेरणादायी वक्ते म्हणून सुपरिचित तर ते आहेतच. फाईव्ह पॉइंट समवन, वन नाईट अ‍ॅट कॉलसेंटर, ३ मिस्टेक्स ऑफ माय लाईफ, मेकिंग इंडिया ऑसम ही त्यांची काही फारच गाजली आहेत. त्यांच्या पुस्तकांवर बॉलिवूडमध्ये ३ इडियट्स, काय पो छे, टू स्टेट्स असे बॉक्स ऑफिसवर हीट झालेले चित्रपटही बनलेले आहेत. विविध संस्था आणि संमेलनांतून ते व्याख्यानेही देतात. या निमित्ताने चेतन यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक पर्वणी ठरला आहे.