शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्त्री-पुरुषांना समान हक्क मिळावेत- चेतन भगत

By admin | Updated: October 6, 2016 19:54 IST

प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला कायद्यानुसार समान हक्क मिळावेत, असं वक्तव्य प्रख्यात लेखक चेतन भगत यांनी केलं आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 6 - प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला कायद्यानुसार समान हक्क मिळावेत, असं वक्तव्य प्रख्यात लेखक चेतन भगत यांनी केलं आहे. 'लोकमत'ने केसरी टूर्स व ट्रॅव्हल्स प्रा.लि.च्या सहयोगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला केसरी टूर्स व ट्रॅव्हल्स प्रा.लि. झेलम चौबळ आणि लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा उपस्थित होते. यावेळी लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी कार्यक्रमाला संबोधित केले.

"कौटुंबिक हिंसाचाराविषयी संसदेत विधेयक मंजूर करताना डोळ्यांत अश्रू आले होते. आजही महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. मंदिर आणि मशिदींमध्ये महिलांना आजही प्रवेश नाकारला जात आहे. मात्र आज ही परिस्थिती काही प्रमाणात बदलत आहे. यामध्ये लोकमतने राबविलेल्या विविध उपक्रमांचा मोठा वाटा आहे. लोकमत सखी मंच यांचा त्यात मोठा वाटा आहे. 40 महिलांपासून सुरू झालेला सखी मंच 3 लाख महिलांचा झाला असून,  आज आपण महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे", असं मत लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मांडलं आहे.त्यानंतर मंचावर आलेले चेतन भगत म्हणाले, "अनेक पुरुष नेहमी मुलीकडे पाहून हायफाय आहे, असं म्हणतात. मात्र लग्न करायला त्यांना घरगुती मुलगीच लागते. अनेक महिलांना घर सांभाळणे ही मुख्य जबाबदारी वाटते. तर अनेक महिलांना करियर, मात्र काहींना दोन्ही जबाबदा-या महत्त्वाच्या वाटतात. प्रत्येक स्त्रीनुसार तिची जबाबदारी बदलते. आपण महिलांना संधी देतो मात्र जेव्हा त्या काही साध्य करायला जातात तेव्हा आपल्याला त्यांच्याबाबत प्रश्न पडतो की त्या घरातील कामे करतील का ?, असा प्रश्न चेतन भगत यांनी उपस्थित केला आहे.

माझं लिखाण जरी खूप अनौपचारिक वाटत असले तरी त्यामागे एक विचार असतो. तो संदेश मला माझ्या लिखाणातून पोहोचवायचा असतो, असं प्रतिपादन चेतन भगत यांनी केलं आहे.

भाषणातील महत्त्वाचे मुद्दे- 

- अनेक पुरुष नेहमी मुलीकडे पाहून हायफाय आहे, असं म्हणतात. मात्र लग्न करायला त्यांना घरगुती मुलगीच लागते
- अनेक महिलांना घर सांभाळणे ही मुख्य जबाबदारी वाटते. तर अनेक महिलांना करियर, मात्र काहींना दोन्ही जबाबदा-या महत्त्वाच्या वाटतात
- प्रत्येक स्त्रीनुसार तिची जबाबदारी बदलते, स्त्रीवाद हा प्रत्येक गोष्टीतून आपल्या समोर येतो
- आपण महिलांना संधी देतो मात्र जेव्हा त्या काही साध्य करायला जातात तेव्हा आपल्याला त्यांच्याबबत प्रश्न पडतो की ही घरातील कामे करेल का ?
- महिलांच्या बाबतीत अनेक कायदे आहेत, मात्र पुरुषांच्या बाजूने फार कमी कायदे आहेत
- माझं लिखाण जरी खूप अनौपचारिक वाटत असेल तरी त्यामागे एक विचार असतो, तो संदेश मला माझ्या लिखाणातून पोहोचवायचा असतो

चेतन भगत हे विशेष करून तरुण पिढीतील मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. सध्याचे आघाडीचे बेस्टसेलर लेखक म्हणून त्यांचे नाव देश-विदेशात सन्मानाने घेतले जाते. भारतीय लेखक, स्तंभलेखक, प्रेरणादायी वक्ते म्हणून सुपरिचित तर ते आहेतच. फाईव्ह पॉइंट समवन, वन नाईट अ‍ॅट कॉलसेंटर, ३ मिस्टेक्स ऑफ माय लाईफ, मेकिंग इंडिया ऑसम ही त्यांची काही फारच गाजली आहेत. त्यांच्या पुस्तकांवर बॉलिवूडमध्ये ३ इडियट्स, काय पो छे, टू स्टेट्स असे बॉक्स ऑफिसवर हीट झालेले चित्रपटही बनलेले आहेत. विविध संस्था आणि संमेलनांतून ते व्याख्यानेही देतात. या निमित्ताने चेतन यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक पर्वणी ठरला आहे.