शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

पुस्तकरूपात साठवल्या पोलीस बाबाच्या आठवणी

By admin | Updated: March 22, 2017 01:51 IST

पोलीस खात्यातील रूक्ष आणि तणावग्रस्त जीवन जगत असताना आपला छंद सांभाळणे आणि त्याच्यासाठी वेळ देणे हे पोलिसांना कधी शक्य नसते.

मनीषा म्हात्रे / मुंबईपोलीस खात्यातील रूक्ष आणि तणावग्रस्त जीवन जगत असताना आपला छंद सांभाळणे आणि त्याच्यासाठी वेळ देणे हे पोलिसांना कधी शक्य नसते. अशात बाबांची पुस्तक लिहिण्याची राहिलेली अपूर्ण इच्छा तसेच पोलिसांबाबतच्या बदलत चाललेल्या काळाची आठवण करून देण्यासाठी एका एसीपीच्या मुलीने बाबांच्या आठवणी पुस्तकरूपात साठवून पोलिसांना भेट म्हणून दिली आहे.नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास जागता पहारा देणारा ‘पोलीस’ हाही एक माणूसच आहे, हे आपण बहुतेक वेळा विसरून जातो. कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक संकटे त्याच्यासमोर येत असतात. अनेक मोहाचे क्षण गुंगवून टाकतात. राजकारणी, समाजातले प्रतिष्ठित, श्रीमंत यांच्यापुढे अनेकदा लाचारी पत्करावी लागते. गुन्हा, गुन्हेगार, सामान्य जनता यांच्यामध्ये काम करताना मन अस्वस्थ करणाऱ्या अनेक घटना घडतात. गुन्हेगार माहीत असूनही त्याला शासन करणे शक्य होत नाही तेव्हा उद्वेग होतो. पण या तमाम अडचणीतूनही आपल्या कर्तव्याचे सतत भान ठेवून त्यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करत राहतात. हे सगळे करत असताना त्याच्या कुटुंबाकडे स्वत:कडे तो नेहमीच दुर्लक्ष करत राहतो. हे सगळे करत असताना त्याच्यावरील हल्ल्यांचे सत्रदेखील सुरूच आहे. त्याच्या व्यथा मांडण्यासाठी पोलीस पत्नी रस्त्यावर उतरल्या.असेच भोईवाडा परिसरात राहत असलेल्या भावना पेडणेकर हिचे बाबा विजय राजाराम पेडणेकर. १९४१मध्ये ते पोलीस दलात रुजू झाले. पायधुनी, वांद्रे, वरळी, वाहतूक, सामान्य शाखा, एन.एम. जोशी, विमातळ सुरक्षा, सहार, खार आणि दादर पोलीस ठाण्यात उल्लेखनीय कामगिरी बजावली. १९९१मध्ये ते दादरमधून एसीपी म्हणून निवृत झाले. गेल्या वर्षी २३ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे पेडणेकर कुटुंबाला धक्का बसला. मात्र पुढे काय? याच बाबांच्या खाकीतील वेचक आठवणी तिने पुस्तकात मांडण्याचे ठरवले. पेडणेकर यांना पुस्तक लिहिण्याची इच्छा होती. मात्र सेवेत असताना कामादरम्यान तर निवृत्तीनंतर समाजसेवेमुळे त्यांना वेळ मिळाला नाही. हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी बाबांच्या निधनाच्या दुसऱ्या दिवसापासून तिने पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांच्या संपर्कात आलेल्या शेकडो जणांच्या तिने भेटीगाठी सुरू केल्या. पोलीसमित्र, जुनी वृत्तपत्रांची कात्रणे, फोटोंची जमवाजमव केली. त्याची वस्तुस्थिती ‘खाकी वर्दीतील वेचक आठवणी’ या पुस्तकात मांडली आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच तिने विविध क्षेत्रांतील मान्यवरांना भेटलेले बाबा कसे होते हे त्यांच्याच शब्दांत व्यक्त केले आहे. कामावरून दमून घरी आलेल्या बाबांचे किस्से, त्यांनी केलेल्या विविध गुन्ह्यांचा उलगडा तिने या पुस्तकात मांडला आहे. कामातून वेळ काढत कधीतरी त्यांनाही भेटलेल्या बाबांच्या सहवासाची ऊबही पुस्तकातून पुढे जाणवते. गुन्ह्यांचा तपास करताना मिळालेले यश, त्यावर झालेल्या पुरस्कारांच्या वर्षावाचा उल्लेख तिने या पुस्तकात केला आहे. हे सारे मांडत असताना पूर्वीचा दरारा आता कुठे तरी कमी झाला आहे, याची खंतही ती व्यक्त करताना दिसते आहे. सध्या हेच पुस्तक घेऊन ती मुंबईतल्या प्रत्येक पोलिसाला मोफत भेट म्हणून देत आहे. आतापर्यंत तिने पोलीस आयुक्तांसह ५० वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना हे पुस्तक मोफत भेट म्हणून दिले. तिच्या या प्रयत्नांनी भारावलेल्या पोलिसांकडून कुठे तिचा सत्कार होतोय तर कुठे तिच्यावर शाबासकीची थाप पडताना दिसते आहे.