शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

मेळघाट अंधारात

By admin | Updated: January 23, 2015 01:54 IST

महावितरणने ४५ लाखांची थकबाकी अदा न केल्याने मध्य प्रदेशने गुरुवारी पहाटे ६ वाजेपासून मेळघाटातील ४५ गावांचा वीजपुरवठा खंडित केला आहे़

मध्य प्रदेशची कारवाई : ४५ आदिवासी गावांची वीज कापलीनरेंद्र जावरेल्ल चिखलदरा (जि़ अमरावती)महावितरणने ४५ लाखांची थकबाकी अदा न केल्याने मध्य प्रदेशने गुरुवारी पहाटे ६ वाजेपासून मेळघाटातील ४५ गावांचा वीजपुरवठा खंडित केला आहे़ परिणामी ही सर्व गावे अंधारात बुडाली आहेत. अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा तालुक्यांना मध्य प्रदेशातून, तर मुक्तागिरी व परिसरात महाराष्ट्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. दोन्ही राज्यांतून समन्वयाने हा पुरवठा सुरू आहे. परंतु महावितरणने ४५ लाख रुपयांची थकबाकी न भरल्याने चिखलदरा तालुक्यातील जारिदा सबस्टेशनचा वीजपुरवठा मध्य प्रदेशातून खंडित केला आहे. त्यामुळे काटकुंभ - चुरणी-जारिदा परिसरातील ४५ गावांतील आदिवासींवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे. तर देयके भरण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असून, वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अचलपूरचे महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी यांनी स्पष्ट केले़ वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा योजना, दळण यंत्र बंद आहेत. तर दुसरीकडे शेतीचे ओलीत थांबले आहे. पुरवठा बंद राहिल्यास पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.आमचा दोष काय?आम्ही आमची वीज बिले अदा केली आहेत. आमचा दोष काय़? महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका आदिवासी शेतकऱ्यांना बसत आहे. झालेल्या पिकांची नुकसानभरपाई महावितरणने द्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा युवक काँग्रेसचे पीयूष मालवीय, राहुल येवले, अमोल बोरेकार, गौरव काळे आदींनी दिला आहे. थकबाकी २२ जानेवारीपर्यंत ४४ लाख ८८ हजार रुपये भरण्याचा अल्टीमेटम महावितरणला देण्यात आला होता. तरी कुठलेच पाऊल उचलण्यात आले नाही़ परिणामी वीजपुरवठा खंडित केल्याचे भैसदेही येथील शाखा अभियंता अरविंद डहटिया यांनी सांगितले.