शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मेघे पिता-पुत्रांचा काँग्रेसला रामराम

By admin | Updated: June 10, 2014 01:14 IST

काँग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी खासदार दत्ता मेघे यांनी त्यांचे पुत्र व माजी आमदार सागर मेघे आणि युवक काँग्रेसचे नेते समीर मेघे यांच्यासह काँग्रेसला रामराम ठोकला आहे.

कांबळे, देशमुखांवर फोडले खापर :   ५ जुलैला कार्यकर्त्यांंसह भाजप प्रवेशनागपूर : काँग्रेसचे विदर्भातील ज्येष्ठ नेते व माजी खासदार दत्ता मेघे यांनी त्यांचे पुत्र  व माजी आमदार सागर मेघे आणि युवक काँग्रेसचे नेते समीर मेघे  यांच्यासह काँग्रेसला रामराम ठोकला आहे. येत्या ५ जुलैला ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वर्धा लोकसभा मतदारसंघातून मेघे पुत्र सागर यांचा दारुण पराभव झाला  होता. पुत्राच्या पराभवामुळे  व्यथित झालेले मेघे पक्ष सोडण्याच्या मन:स्थितीत होते. काँग्रेसमध्ये आपला कोणीही वाली राहिलेला नसल्याने पक्षात राहून उपयोग नाही, असे त्यांनी  त्यांच्या विश्‍वासू कार्यकर्त्यांंसोबत खाजगीत बोलून दाखविले होते. सोमवारी  त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपला राजीनामा पाठवून पक्ष सोडण्याच्या चर्चेवर   शिक्कामोर्तब केले. मेघे यांनी सोमवारी पक्षाच्या  प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि अ.भा. काँग्रेस समितीचे  सरचिटणीस व राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश तसेच जिल्हाध्यक्षांकडेही  पाठविला आहे. येत्या ५ जुलै रोजी पुत्र सागर, समीर आणि सर्मथक कार्यकर्त्यांंसह  भाजपात प्रवेश करणार असल्याचेही  त्यांनी स्पष्ट केले आहे. राजीनामा पत्रासह  प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात मेघे यांनी पक्षात  होत असलेल्या कोंडीकडे लक्ष वेधले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार सागर मेघे यांच्या   पराभवासाठी काँग्रेस नेते व राज्यमंत्री रणजित कांबळे व वर्धेचे आमदार सुरेश देशमुख कारणीभूत असल्याचा आरोपही केला. खासदार असूनही   मतदार संघातील विकासाच्या प्रश्नांबाबत पक्षाकडे आणि सरकारकडे वारंवार अर्ज, विनंत्या करूनही त्याकडे लक्ष देण्यात आले नाही, अशी खंत  त्यांनी व्यक्त केली आहे.काँग्रेसचा त्याग करताना मेघे यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविषयी आदर व्यक्त केला आहे. त्यांनी नेहमीच चांगली  वागणूक दिल्याचे  त्यांच्या पत्रात नमूद  आहे.नरेंद्र मोंदीवर विश्‍वासपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या  नेतृत्वाखाली देशाचा विकास घडून येईल, असा विश्‍वास जनतेला आहे व मी जनतेपैकीच एक आहे, या शब्दात मेघे यांनी  मोंदीवर विश्‍वास व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदी व नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात विदर्भाचा आणि राज्याचा विकास घडून येईल. लोकहिताचे निर्णय होतील, याची खात्री पटल्याने त्यांच्या  नेतृत्वात भाजपमध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोणतीही अपेक्षा व अटी न टाकता भाजपमध्ये जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  (प्रतिनिधी)कोंडी झाल्याने राजीनामा-राजीनामा पत्रासह प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात मेघे यांनी पक्षात  होत असलेल्या कोंडीकडे लक्ष वेधले आहे.-लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार सागर मेघे यांच्या  पराभवासाठी काँग्रेस नेते व राज्यमंत्री रणजित कांबळे व वर्धेचे आमदार सुरेश देशमुख  कारणीभूत असल्याचा आरोपही केला. -खासदार असूनही  मतदार संघातील विकासाच्या प्रश्नांबाबत पक्षाकडे आणि सरकारकडे वारंवार अर्ज, विनंत्या करूनही त्याकडे लक्ष देण्यात आले  नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.