शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

मेगाब्लॉकमुळे झाले मेगाहाल

By admin | Updated: June 26, 2017 02:49 IST

ठाकुर्ली स्थानकाजवळ होणाऱ्या उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या सहा तासांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाले.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : ठाकुर्ली स्थानकाजवळ होणाऱ्या उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या सहा तासांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाले. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे आधीच रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. त्यात कल्याण आणि डोंबिवलीदरम्यान वाहतुकीसाठी केलेली पर्यायी व्यवस्था कोलमडल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडली. जवळपास दोन तास प्रवासी कल्याण स्थानकात अडकून पडले. त्यातील काहींनी रिक्षाने डोंबिवलीला येऊन प्रवास केला, तर काहींनी माघारी जाण्याचा पर्याय स्वीकारला.रेल्वेच्या या मेगाब्लॉकमुळे कर्जत, कसाऱ्याच्या दिशेने येणारी वाहतूक कल्याणहून वळविण्यात आली, तर मुंबईहून येणारी लोकल वाहतूक डोंबिवलीपर्यंतच नेण्यात येत होती. त्यामुळे या दोन्ही स्थानकांदरम्यान कल्याण-डोंबिवली पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस तैनात करण्यात आल्या होत्या, परंतु त्याही अपुऱ्या ठरल्या. त्यामुळे रिक्षाचालकांनी नेहमीप्रमाणे लूट केली. नेहमी प्रति प्रवासी आकारल्या जाणाऱ्या २४ रुपयांऐवजी ५० रुपये आणि त्यापेक्षा अधिक रक्कम घेतली जात होती. या मेगाब्लॉकमुळे सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत जलद वाहतूक बंद राहाणार होती, पण गर्डरच्या कामासाठी मागविलेली हायड्रोलिक क्रेन वारंवार बिघडत असल्याने, जलद मार्ग एक तास उशिरा वाहतुकीसाठी खुला झाला, तर धिम्या मार्गावरील वाहतूक सकाळी ९ ते दुपारी ४ अशी सहा तास बंद राहाणार होती. मात्र, गर्डरच्या कामाला विलंब लागत असल्याने, त्याच्या कामाचा अंदाज घेऊन ती वाहतूक तासभर लवकर सुरू करण्यात आली. मात्र, कल्याण ते डोंबिवलीदरम्यान समांतर रस्ता व्यवस्थित सुरू नसल्याने, दोन्ही रेल्वे स्थानकांपासून सुटलेल्या बसेस डोंबिवली शहरातून नेण्यात आल्या. परिणामी, या प्रवासास पाऊण तास लागत होता. त्याचाही फटका प्रवाशांना बसला.पुढच्या महिन्यात पुन्हा ब्लॉक-एकच गर्डर टाकण्याचे काम रात्री उशिरा पूर्ण झाल्याने, दुसऱ्या गर्डरसाठी ९ जुलैला पुन्हा मेगाब्लॉक घेतला जाण्याची शक्यता आहे. तो किती काळाचा असेल, ते रेल्वेने अद्याप जाहीर केलेले नाही. दरम्यान, अंबरनाथ-बदलापूर स्थानकांदरम्यान नाल्याच्या कामासाठी चार तास होणारा ट्रॅफिक ब्लॉक पावसामुळे रेल्वेने रद्द केला.तलाव क्षेत्रातही पावसाची दमदार हजेरीमुंबई शहर आणि उपनगरात पावसाने कहर केला असतानाच, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर, तानसा, विहार, तुलसी, अप्पर वैतरणा, भातसा, मध्य वैतरणा या सातही तलाव क्षेत्रांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसात तलाव क्षेत्रात समाधानकारक पातळी नोंदविण्यात येत असल्याने, महापालिकेलाही दिलासा मिळाला असून, पुढील तीन महिने पावसाचा वेग असाच कायम राहिला, तर मुंबईकराचे पाण्याचे टेन्शन मिटणार आहे.तलावपातळी (मीटर्स)पाऊस (मिमी)-मोडक सागर१५१.९४२८१तानसा१२२.९३३४०.४०विहार७५.५२८८तुलसी१३४.०१७५अप्पर वैतरणा५९३.५७१६०भातसा११३.२३१८४मध्य वैतरणा२६९.७४२१८.३०