शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

मेगाब्लॉकमुळे झाले मेगाहाल

By admin | Updated: June 26, 2017 02:49 IST

ठाकुर्ली स्थानकाजवळ होणाऱ्या उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या सहा तासांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाले.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : ठाकुर्ली स्थानकाजवळ होणाऱ्या उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या सहा तासांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाले. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे आधीच रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. त्यात कल्याण आणि डोंबिवलीदरम्यान वाहतुकीसाठी केलेली पर्यायी व्यवस्था कोलमडल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडली. जवळपास दोन तास प्रवासी कल्याण स्थानकात अडकून पडले. त्यातील काहींनी रिक्षाने डोंबिवलीला येऊन प्रवास केला, तर काहींनी माघारी जाण्याचा पर्याय स्वीकारला.रेल्वेच्या या मेगाब्लॉकमुळे कर्जत, कसाऱ्याच्या दिशेने येणारी वाहतूक कल्याणहून वळविण्यात आली, तर मुंबईहून येणारी लोकल वाहतूक डोंबिवलीपर्यंतच नेण्यात येत होती. त्यामुळे या दोन्ही स्थानकांदरम्यान कल्याण-डोंबिवली पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस तैनात करण्यात आल्या होत्या, परंतु त्याही अपुऱ्या ठरल्या. त्यामुळे रिक्षाचालकांनी नेहमीप्रमाणे लूट केली. नेहमी प्रति प्रवासी आकारल्या जाणाऱ्या २४ रुपयांऐवजी ५० रुपये आणि त्यापेक्षा अधिक रक्कम घेतली जात होती. या मेगाब्लॉकमुळे सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत जलद वाहतूक बंद राहाणार होती, पण गर्डरच्या कामासाठी मागविलेली हायड्रोलिक क्रेन वारंवार बिघडत असल्याने, जलद मार्ग एक तास उशिरा वाहतुकीसाठी खुला झाला, तर धिम्या मार्गावरील वाहतूक सकाळी ९ ते दुपारी ४ अशी सहा तास बंद राहाणार होती. मात्र, गर्डरच्या कामाला विलंब लागत असल्याने, त्याच्या कामाचा अंदाज घेऊन ती वाहतूक तासभर लवकर सुरू करण्यात आली. मात्र, कल्याण ते डोंबिवलीदरम्यान समांतर रस्ता व्यवस्थित सुरू नसल्याने, दोन्ही रेल्वे स्थानकांपासून सुटलेल्या बसेस डोंबिवली शहरातून नेण्यात आल्या. परिणामी, या प्रवासास पाऊण तास लागत होता. त्याचाही फटका प्रवाशांना बसला.पुढच्या महिन्यात पुन्हा ब्लॉक-एकच गर्डर टाकण्याचे काम रात्री उशिरा पूर्ण झाल्याने, दुसऱ्या गर्डरसाठी ९ जुलैला पुन्हा मेगाब्लॉक घेतला जाण्याची शक्यता आहे. तो किती काळाचा असेल, ते रेल्वेने अद्याप जाहीर केलेले नाही. दरम्यान, अंबरनाथ-बदलापूर स्थानकांदरम्यान नाल्याच्या कामासाठी चार तास होणारा ट्रॅफिक ब्लॉक पावसामुळे रेल्वेने रद्द केला.तलाव क्षेत्रातही पावसाची दमदार हजेरीमुंबई शहर आणि उपनगरात पावसाने कहर केला असतानाच, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर, तानसा, विहार, तुलसी, अप्पर वैतरणा, भातसा, मध्य वैतरणा या सातही तलाव क्षेत्रांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसात तलाव क्षेत्रात समाधानकारक पातळी नोंदविण्यात येत असल्याने, महापालिकेलाही दिलासा मिळाला असून, पुढील तीन महिने पावसाचा वेग असाच कायम राहिला, तर मुंबईकराचे पाण्याचे टेन्शन मिटणार आहे.तलावपातळी (मीटर्स)पाऊस (मिमी)-मोडक सागर१५१.९४२८१तानसा१२२.९३३४०.४०विहार७५.५२८८तुलसी१३४.०१७५अप्पर वैतरणा५९३.५७१६०भातसा११३.२३१८४मध्य वैतरणा२६९.७४२१८.३०