शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
4
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
5
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
6
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
7
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
8
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
9
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
10
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
11
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
12
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
13
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
14
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
15
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
16
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
17
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
18
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
19
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
20
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात

मेगाब्लॉकमुळे झाले मेगाहाल

By admin | Updated: June 26, 2017 02:49 IST

ठाकुर्ली स्थानकाजवळ होणाऱ्या उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या सहा तासांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाले.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : ठाकुर्ली स्थानकाजवळ होणाऱ्या उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या सहा तासांच्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल झाले. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे आधीच रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. त्यात कल्याण आणि डोंबिवलीदरम्यान वाहतुकीसाठी केलेली पर्यायी व्यवस्था कोलमडल्याने प्रवाशांच्या त्रासात भर पडली. जवळपास दोन तास प्रवासी कल्याण स्थानकात अडकून पडले. त्यातील काहींनी रिक्षाने डोंबिवलीला येऊन प्रवास केला, तर काहींनी माघारी जाण्याचा पर्याय स्वीकारला.रेल्वेच्या या मेगाब्लॉकमुळे कर्जत, कसाऱ्याच्या दिशेने येणारी वाहतूक कल्याणहून वळविण्यात आली, तर मुंबईहून येणारी लोकल वाहतूक डोंबिवलीपर्यंतच नेण्यात येत होती. त्यामुळे या दोन्ही स्थानकांदरम्यान कल्याण-डोंबिवली पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस तैनात करण्यात आल्या होत्या, परंतु त्याही अपुऱ्या ठरल्या. त्यामुळे रिक्षाचालकांनी नेहमीप्रमाणे लूट केली. नेहमी प्रति प्रवासी आकारल्या जाणाऱ्या २४ रुपयांऐवजी ५० रुपये आणि त्यापेक्षा अधिक रक्कम घेतली जात होती. या मेगाब्लॉकमुळे सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत जलद वाहतूक बंद राहाणार होती, पण गर्डरच्या कामासाठी मागविलेली हायड्रोलिक क्रेन वारंवार बिघडत असल्याने, जलद मार्ग एक तास उशिरा वाहतुकीसाठी खुला झाला, तर धिम्या मार्गावरील वाहतूक सकाळी ९ ते दुपारी ४ अशी सहा तास बंद राहाणार होती. मात्र, गर्डरच्या कामाला विलंब लागत असल्याने, त्याच्या कामाचा अंदाज घेऊन ती वाहतूक तासभर लवकर सुरू करण्यात आली. मात्र, कल्याण ते डोंबिवलीदरम्यान समांतर रस्ता व्यवस्थित सुरू नसल्याने, दोन्ही रेल्वे स्थानकांपासून सुटलेल्या बसेस डोंबिवली शहरातून नेण्यात आल्या. परिणामी, या प्रवासास पाऊण तास लागत होता. त्याचाही फटका प्रवाशांना बसला.पुढच्या महिन्यात पुन्हा ब्लॉक-एकच गर्डर टाकण्याचे काम रात्री उशिरा पूर्ण झाल्याने, दुसऱ्या गर्डरसाठी ९ जुलैला पुन्हा मेगाब्लॉक घेतला जाण्याची शक्यता आहे. तो किती काळाचा असेल, ते रेल्वेने अद्याप जाहीर केलेले नाही. दरम्यान, अंबरनाथ-बदलापूर स्थानकांदरम्यान नाल्याच्या कामासाठी चार तास होणारा ट्रॅफिक ब्लॉक पावसामुळे रेल्वेने रद्द केला.तलाव क्षेत्रातही पावसाची दमदार हजेरीमुंबई शहर आणि उपनगरात पावसाने कहर केला असतानाच, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर, तानसा, विहार, तुलसी, अप्पर वैतरणा, भातसा, मध्य वैतरणा या सातही तलाव क्षेत्रांमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसात तलाव क्षेत्रात समाधानकारक पातळी नोंदविण्यात येत असल्याने, महापालिकेलाही दिलासा मिळाला असून, पुढील तीन महिने पावसाचा वेग असाच कायम राहिला, तर मुंबईकराचे पाण्याचे टेन्शन मिटणार आहे.तलावपातळी (मीटर्स)पाऊस (मिमी)-मोडक सागर१५१.९४२८१तानसा१२२.९३३४०.४०विहार७५.५२८८तुलसी१३४.०१७५अप्पर वैतरणा५९३.५७१६०भातसा११३.२३१८४मध्य वैतरणा२६९.७४२१८.३०