शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

शेतकरी संपाबाबत आज संध्याकाळी "वर्षा"वर बैठक

By admin | Updated: May 30, 2017 13:59 IST

राज्यात १ जूनपासून केलेल्या जाणाऱ्या शेतकरी संपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यास शेतकरी समन्वय समितीने तयारी दर्शवली आहे

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि. 30 - राज्यात १ जूनपासून केलेल्या जाणाऱ्या शेतकरी संपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यास शेतकरी समन्वय समितीने तयारी दर्शवली आहे.

आज सायंकाळी ७ वाजता मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी ही बैठक होईल. मात्र, बैठकीत कर्जमाफीच्या विषयावर निर्णय झाला तरच पुढील चर्चा होईल, अशी अट शेतकरी समन्वय समितीने टाकली आहे.

कर्जमाफीसाठी पुणतांबा येथे शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरु असून १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय राज्यातील विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांनी घेतला आहे.

आज सकाळी ११ वाजता कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुणतांबा येथे येऊन आंदोलकांची भेट घेत त्यांना संप स्थगित करण्याचे आवाहन केले.

मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलो असून शेतकऱ्यांसाठी सरकारने चर्चेचे दरवाजे उघडे ठेवले असल्याचे ते म्हणाले. खोत आंदोलकांना भेट देऊन गेल्यानंतर आंदोलकांनी पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक घेतली.

बैठकीनंतर जयाजीराव सुर्यवंशी व धनंजय जाधव यांनी वरील निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी आंदोलक तातडीने मुंबईला रवाना होणार आहेत. कर्जमाफीच्या निर्णयानंतरच बैठकीत पुढील चर्चा होईल, असे संघटनेने जाहीर केल्यामुळे सायंकाळच्या बैठकीत मुख्यमंत्री काय तोडगा काढणार? याबाबत उत्सुकता आहे.

शेतक-यांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना

पुणतांबा येथील दहा शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले आहेत. शिष्टमंडळात औरंगाबादचे जयाजीराव सूर्यवंशी, पुणतांबा येथी क्रांती सेनेचे समन्वयक धनंजय जाधव, प्रवीण गिड्डे, शेतकरी संघटनेचे अनिल घनवट आदींचा समावेश आहे. कर्जमाफीचे लेखी अश्वासन दिले तरच चर्चा करणार नाही तर, चर्चा न करता परत येणार असल्याचे घनवट यांनी स्पष्ट केले आहे.