शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कोयना प्रकल्पाबाबत उद्या बैठक

By admin | Updated: March 23, 2015 00:40 IST

कार्यालये बंद : राज्य शासन निर्णयावर फेरविचार करणार ?

शिरगाव : महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरलेल्या कोयना प्रकल्पाची कोयना व अलोरे येथील विविध कार्यालये बंद करुन महाराष्ट्रभरात मनुष्यबळाचा वापर करण्याबाबतच्या शासनाच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी दि. २४ मार्च रोजी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. कोयना प्रकल्पाचा प्रश्न गेले अनेक दिवस प्रलंबित आहे. त्यामुळे आता याप्रश्नी सरकार कोणती भूमिका घेणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.ऐन शिमगोत्सवात तणावग्रस्त स्थितीत असलेल्या प्रकल्प वर्तुळात बैठकीचा संदेश आल्यानंतर अनेक प्रकारे चर्चा घडू लागल्या आहेत. १९६५ सालापासूनची हजारो कामगार कर्मचाऱ्यांची वस्ती, मध्यवर्ती बाजारपेठ, प्रकल्पग्रस्त कोट्यातील विकासकामे या बाबींकडे लक्ष केंद्रीत करता अनेक घटकांचा रोजगार येथे एकवटला आहे. शासनाकडे तुर्त असलेले उच्चपदस्थ अधिकारी कर्मचारी कामगार यांचे सातव्या वेतन आयोगामुळे वाढलेल्या वेतनाचीआकडेवारी पाहता त्यांच्या कार्यक्षमतेच्या वापराच्या तुलनेत मनुष्यबळ शासनाला उपयुक्त जागेवर पाठवणे योग्य वाटू लागले. याउलट मंत्रालय स्तरावर येथील कामांची स्थिती मांडणारे मोठे अधिकारी पश्चिम महाराष्ट्र व अन्य भागातील असल्याने येथील विकासकामे त्यांनी शासनाला दाखवून दिली नाहीत, असा आरोप स्थानिक पुढारी करत आहेत. कोयनानगर येथे ८० मेगॅवॅटचा जलविद्युत प्रकल्प, स्वयंदेव लघुपाटबंधारे तलाव, कोळकेवाडी धरण मजबूतीकरण अशी प्रस्तावित कामे शासनाला सूचवून ही कार्यालये अन्यत्र हलवू नये, यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्र आली आहेत. या अनुषंगाने भाजप पदाधिकारी राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांना निवेदनाद्वारे व्यथा मांडत आहेत, तर राज्यमंत्री शिवतारे यांच्याकडे अलोरेतील कर्मचारी संघटना व स्थानिक पदाधिकारी आपल्या व्यथा मांडत आहेत. शासनाची मालकी असलेली जागा, अंतर्गत रस्ते, वीजपुरवठा अशी आधुनिक सुविधानी युक्त असलेली शेकडो एकर जागा कोणत्या प्रकारे वापरात आणता येईल? असा केवळ प्रश्न विचारला जात आहे. आमच्या हाताला काम मिळावे, असे काही इथे घडावे, अशी भावना प्रकल्पग्रस्तातून येत असताना मूळ मालक जमीन परत शेती करायला मिळेल या प्रतीक्षेत आहेत. यापुढे जाऊन सुखाची नोकरी दूरवर कशी पूर्ण करता येईल, याचा विचार शासकीय कर्मचारी करत आहेत. शासनकर्त्यांच्या दूरदृष्टीवरच भवितव्य अवलंबून असल्याचे म्हटले जात आहे. (वार्ताहर)कोयना प्रकल्प कार्यालयाबाबत २४ रोजी बैठक.आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय एकवटले.अनेक दिवस प्रकल्पाबाबतचा प्रश्न प्रलंबित.प्रस्तावित कामे सुचवून कार्यालये अन्यत्र न हलवण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र.भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली राज्याच्या जलसंपदामंत्र्यांकडे व्यथा.