शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

नमामी चंद्रभागाची उद्या पुण्यात बैठक

By admin | Updated: July 11, 2016 21:01 IST

इंद्रायणी आणि भीमा नदीतीच्या प्रदूषणाबाबत नमामी गंगेच्या धर्तीवर शासनाने नमामी चंद्रभागा अभियान सुरू केले

शिवाजी सुरवसे/ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 11- इंद्रायणी आणि भीमा नदीतीच्या प्रदूषणाबाबत नमामी गंगेच्या धर्तीवर शासनाने नमामी चंद्रभागा अभियान सुरू केले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नदीकाठच्या विविध गावच्या मलनित्सारण योजना आणि पाणीपुरवठा योजनेचा आराखडा केला असून ३५२ कोटींच्या या आराखड्यात विविध कामांचा समावेश आहे़ पाणीपुरवठा, स्वच्छता व पर्यावरण मंत्री बबनराव लोणीकर यांनी या अभियानाबाबत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व प्रमुख अधिकाऱ्यांची १३ जूलै रोजी दुपारी १२ वाजता पुण्यात बैठक आयोजित केली आहे़ जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार तसेच पुणे आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी, पुणे, पिंपरीचिंचवड, सोलापूर महापालिकेचे आयुक्त, पुणे आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसीचे पुणे आणि सोलापूरचे अधिकारी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना या बैठकीस बोलाविले आहे़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हा संभाव्य आराखडा तयार केला आहे़ नदीच्या तिरावर असलेली गावे त्यांची आत्ताची लोकसंख्या, २०१७ ची लोकसंख्या आणि २०३२ ची लोकसंख्या याचा विचार करुन भीमा नदीत घाण पाणी मिसळू नये यासाठी नियोजन केले जात आहे़ वास्तविक पाहता पुण्यातील नद्यातूनच दूषित झालेले पाणी उजनी धरणात मिसळते त्यामुळे तेथील प्रदूषण रोखणे हे खूप मोठे काम आहे़ सोलापूर जिल्ह्यातील प्रदूषणापेक्षा भीमा नदी पुणे जिल्ह्यातच जास्त प्रदूषित होते़ नदीकाठचे उद्योग, कारखाने यांचे देखील दूषित पाणी मोठ्या प्रमाणावर नदीत मिसळते त्यामुळे या प्रदूषणावर आळा बसविणे खूप मोठे काम आहे़ नमाची चंद्रभागा अभियानासाठी २० कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे़ दशक्रिया विधीपासून ते उद्योगाचा प्रदूषण रोखण्यापर्यंत आणि पुण्यातून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रदूषण रोखणे महत्त्वाचे आहे़ सध्या गटारगंगेप्रमाणे अत्यंत घाण पाणी पुण्यातून भीमानदीत मिसळते ही वस्तुस्थिती सर्वांना माहित आहे़................................या प्रमुख कामांचा समावेश-उजनी धरणापासून भीमा नदीच्या दोन्ही तिरावरील ११३ गावासाठी नांदेड पॅटर्नप्रमाणे सांडपाणी व्यवस्थापन योजना करणे-१२४ कोटी रुपये-गोपाळपूर, वाखरी, लक्ष्मी टाकळी, भटूंबरे, शेगाव दुमाला व आढीव गावांसाठी पाणीपुरवठा व मलनि:सारण योजना करणे-८६ कोटी-पंढरपूर शहरात २४ तास आणि ७ दिवस पाणीपुरवठा करण्यासाठी विविध कामे करणे-६३ कोटी-पंढरपूर शहरात भुयारी गटारी योजना टप्पा क्रमांक ३ करणे -६५ कोटी -चंद्रभागा नदीच्या पश्मिच तिरावर दशक्रिया विधी घाट बांधणे- १५ कोटी रुपये