शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

नमामी चंद्रभागाची उद्या पुण्यात बैठक

By admin | Updated: July 11, 2016 21:01 IST

इंद्रायणी आणि भीमा नदीतीच्या प्रदूषणाबाबत नमामी गंगेच्या धर्तीवर शासनाने नमामी चंद्रभागा अभियान सुरू केले

शिवाजी सुरवसे/ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 11- इंद्रायणी आणि भीमा नदीतीच्या प्रदूषणाबाबत नमामी गंगेच्या धर्तीवर शासनाने नमामी चंद्रभागा अभियान सुरू केले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नदीकाठच्या विविध गावच्या मलनित्सारण योजना आणि पाणीपुरवठा योजनेचा आराखडा केला असून ३५२ कोटींच्या या आराखड्यात विविध कामांचा समावेश आहे़ पाणीपुरवठा, स्वच्छता व पर्यावरण मंत्री बबनराव लोणीकर यांनी या अभियानाबाबत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व प्रमुख अधिकाऱ्यांची १३ जूलै रोजी दुपारी १२ वाजता पुण्यात बैठक आयोजित केली आहे़ जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार तसेच पुणे आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी, पुणे, पिंपरीचिंचवड, सोलापूर महापालिकेचे आयुक्त, पुणे आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसीचे पुणे आणि सोलापूरचे अधिकारी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना या बैठकीस बोलाविले आहे़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हा संभाव्य आराखडा तयार केला आहे़ नदीच्या तिरावर असलेली गावे त्यांची आत्ताची लोकसंख्या, २०१७ ची लोकसंख्या आणि २०३२ ची लोकसंख्या याचा विचार करुन भीमा नदीत घाण पाणी मिसळू नये यासाठी नियोजन केले जात आहे़ वास्तविक पाहता पुण्यातील नद्यातूनच दूषित झालेले पाणी उजनी धरणात मिसळते त्यामुळे तेथील प्रदूषण रोखणे हे खूप मोठे काम आहे़ सोलापूर जिल्ह्यातील प्रदूषणापेक्षा भीमा नदी पुणे जिल्ह्यातच जास्त प्रदूषित होते़ नदीकाठचे उद्योग, कारखाने यांचे देखील दूषित पाणी मोठ्या प्रमाणावर नदीत मिसळते त्यामुळे या प्रदूषणावर आळा बसविणे खूप मोठे काम आहे़ नमाची चंद्रभागा अभियानासाठी २० कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे़ दशक्रिया विधीपासून ते उद्योगाचा प्रदूषण रोखण्यापर्यंत आणि पुण्यातून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रदूषण रोखणे महत्त्वाचे आहे़ सध्या गटारगंगेप्रमाणे अत्यंत घाण पाणी पुण्यातून भीमानदीत मिसळते ही वस्तुस्थिती सर्वांना माहित आहे़................................या प्रमुख कामांचा समावेश-उजनी धरणापासून भीमा नदीच्या दोन्ही तिरावरील ११३ गावासाठी नांदेड पॅटर्नप्रमाणे सांडपाणी व्यवस्थापन योजना करणे-१२४ कोटी रुपये-गोपाळपूर, वाखरी, लक्ष्मी टाकळी, भटूंबरे, शेगाव दुमाला व आढीव गावांसाठी पाणीपुरवठा व मलनि:सारण योजना करणे-८६ कोटी-पंढरपूर शहरात २४ तास आणि ७ दिवस पाणीपुरवठा करण्यासाठी विविध कामे करणे-६३ कोटी-पंढरपूर शहरात भुयारी गटारी योजना टप्पा क्रमांक ३ करणे -६५ कोटी -चंद्रभागा नदीच्या पश्मिच तिरावर दशक्रिया विधी घाट बांधणे- १५ कोटी रुपये