शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

चालक संघटनेची मंत्र्यांसोबत बैठक

By admin | Updated: July 22, 2016 02:13 IST

रायगड जिल्ह्यातील विक्रम-मिनीडोर संघटनेचे उपोषण १८ जुलैपासून आझाद मैदान मुंबई येथे सुरू आहे.

पेण : रायगड जिल्ह्यातील विक्रम-मिनीडोर संघटनेचे उपोषण १८ जुलैपासून आझाद मैदान मुंबई येथे सुरू आहे. संघटनेच्या परिवहन मंत्रालयाकडे असलेल्या प्रलंबित न्यायिक मागण्यांसाठी संघटनेचे शेकडो मालक -चालक पदाधिकारी यांची ही गांधीगिरी सुरू असून संघटनेच्या या उपोषणाची दखल घेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संघटना अध्यक्ष विजय पाटील यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेवून संघटनेच्या न्यायिक मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा केल्याचे विजय पाटील यांनी सांगितले. या बैठकीस उरणचे आ. मनोहर भोईर व महाडचे आ. भरत गोगावलेही उपस्थित होते.रायगड जिल्हा विक्रम-मिनीडोर चालक -मालक संघटनेने गेली दोन वर्षे आपल्या प्रलंबित न्यायिक मागण्यांसाठी आंदोलने केली. येत्या पावसाळी अधिवेशनाचा कालखंड लक्षात घेवून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ जुलैपासून आरंभलेल्या या उपोषणाचा गुरु वारी पाचवा दिवस परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेली बैठक व रायगडच्या दोन्ही आमदारांनी संघटनेच्या बाजूने केलेली शिफारस पाहता या न्यायिक रास्त मागण्या मान्य होणयाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परिवहन मंत्र्यांनीही रास्त व सकारात्मक मागण्या आहेत, मात्र परिवहन खात्याचे सचिव, परिवहन आयुक्त, परिवहन प्रादेशिक अधिकारी, आ. मनोहर भोईर, आ. भरत गोगावले, यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, इतर पदाधिकारी यांच्यासोबत येत्या ८ ते १० दिवसात संयुक्त बैठक होणार असून या अंतिम बैठकीत चर्चेअंती संघटनेच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा होवून निर्णय होणार आहे, तो आशादायक निर्णय असेल असे विजय पाटील यांनी सांगितले. मात्र लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला आहे. विक्रम-मिनीडोरच्या जिल्ह्यात सेवा देण्यासाठी ७५०० गाड्या कार्यरत असून ग्रामीण रस्त्यावर धावणारी ही सेवा गोरगरिबांसाठी आवश्यक असणारी आहे. सण व उत्सवाप्रसंगी हक्काची सेवा म्हणून हे गाडीवान प्रत्येक गावोगावी जातात. मात्र महानगरासारखी कररचना आकारणी होत असल्याने ग्रामीण परिसरातील चालक त्रस्त झाले आहेत. ही सेवा चालकांना अनेक परिवहन खात्याच्या जाचक ठरणाऱ्या अटींमध्ये शिथिलता करावी जेणेकरून ही सेवा पूर्णपणे या चालकांना आर्थिक स्थैर्य देण्यास परिणामकारक ठरेल अशी मागणी आहे. (वार्ताहर)।अटी शिथिल कराव्यातसण व उत्सवाप्रसंगी हक्काची सेवा म्हणून हे मिनीडोअर चालक गावोगावी जातात, महानगरासारखी कररचना आकारणी होत आहे. यामुळे ग्रामीण परिसरातील चालकांना अनेक परिवहन खात्याच्या जाचक ठरणाऱ्या अटींमध्ये शिथिलता करावी जेणेकरून ही सेवा या चालकांना आर्थिक स्थैर्य देण्यास परिणामकारक ठरेल.