शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चालक संघटनेची मंत्र्यांसोबत बैठक

By admin | Updated: July 22, 2016 02:13 IST

रायगड जिल्ह्यातील विक्रम-मिनीडोर संघटनेचे उपोषण १८ जुलैपासून आझाद मैदान मुंबई येथे सुरू आहे.

पेण : रायगड जिल्ह्यातील विक्रम-मिनीडोर संघटनेचे उपोषण १८ जुलैपासून आझाद मैदान मुंबई येथे सुरू आहे. संघटनेच्या परिवहन मंत्रालयाकडे असलेल्या प्रलंबित न्यायिक मागण्यांसाठी संघटनेचे शेकडो मालक -चालक पदाधिकारी यांची ही गांधीगिरी सुरू असून संघटनेच्या या उपोषणाची दखल घेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी संघटना अध्यक्ष विजय पाटील यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेवून संघटनेच्या न्यायिक मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा केल्याचे विजय पाटील यांनी सांगितले. या बैठकीस उरणचे आ. मनोहर भोईर व महाडचे आ. भरत गोगावलेही उपस्थित होते.रायगड जिल्हा विक्रम-मिनीडोर चालक -मालक संघटनेने गेली दोन वर्षे आपल्या प्रलंबित न्यायिक मागण्यांसाठी आंदोलने केली. येत्या पावसाळी अधिवेशनाचा कालखंड लक्षात घेवून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ जुलैपासून आरंभलेल्या या उपोषणाचा गुरु वारी पाचवा दिवस परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत झालेली बैठक व रायगडच्या दोन्ही आमदारांनी संघटनेच्या बाजूने केलेली शिफारस पाहता या न्यायिक रास्त मागण्या मान्य होणयाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परिवहन मंत्र्यांनीही रास्त व सकारात्मक मागण्या आहेत, मात्र परिवहन खात्याचे सचिव, परिवहन आयुक्त, परिवहन प्रादेशिक अधिकारी, आ. मनोहर भोईर, आ. भरत गोगावले, यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, इतर पदाधिकारी यांच्यासोबत येत्या ८ ते १० दिवसात संयुक्त बैठक होणार असून या अंतिम बैठकीत चर्चेअंती संघटनेच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा होवून निर्णय होणार आहे, तो आशादायक निर्णय असेल असे विजय पाटील यांनी सांगितले. मात्र लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला आहे. विक्रम-मिनीडोरच्या जिल्ह्यात सेवा देण्यासाठी ७५०० गाड्या कार्यरत असून ग्रामीण रस्त्यावर धावणारी ही सेवा गोरगरिबांसाठी आवश्यक असणारी आहे. सण व उत्सवाप्रसंगी हक्काची सेवा म्हणून हे गाडीवान प्रत्येक गावोगावी जातात. मात्र महानगरासारखी कररचना आकारणी होत असल्याने ग्रामीण परिसरातील चालक त्रस्त झाले आहेत. ही सेवा चालकांना अनेक परिवहन खात्याच्या जाचक ठरणाऱ्या अटींमध्ये शिथिलता करावी जेणेकरून ही सेवा पूर्णपणे या चालकांना आर्थिक स्थैर्य देण्यास परिणामकारक ठरेल अशी मागणी आहे. (वार्ताहर)।अटी शिथिल कराव्यातसण व उत्सवाप्रसंगी हक्काची सेवा म्हणून हे मिनीडोअर चालक गावोगावी जातात, महानगरासारखी कररचना आकारणी होत आहे. यामुळे ग्रामीण परिसरातील चालकांना अनेक परिवहन खात्याच्या जाचक ठरणाऱ्या अटींमध्ये शिथिलता करावी जेणेकरून ही सेवा या चालकांना आर्थिक स्थैर्य देण्यास परिणामकारक ठरेल.