शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

कचरा उचलायलाही बैठक पे बैठक!

By admin | Updated: July 22, 2016 02:38 IST

औद्योगिक वसाहतींत ठिकठिकाणी साचलेला कचरा, राडारोडा तत्काळ साफ करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिल्यानंतरही अद्याप तो जैसे थे आहे.

कल्याण : डोंबिवली आणि अंबरनाथच्या औद्योगिक वसाहतींत ठिकठिकाणी साचलेला कचरा, राडारोडा तत्काळ साफ करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिल्यानंतरही अद्याप तो जैसे थे आहे. एमआयडीसीच्या हद्दीतील कचरा पालिकेने उचलायचा कसा, त्याचा खर्च कोण देणार, या मुद्द्यावर गाडे अडले असून त्यासाठी पालिका-एमआयडीसी अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. डोंबिवली-अंबरनाथच्या प्रदूषणाचा विषय हरित लवादाने उचलून धरल्यावर नेमक्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भेट दिली होती, तेव्हा त्यांनी हे आदेश दिले होते. त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याने कचरा आहे, त्याच जागेवर पडून आहे. तो एमआयडीसीने उचलायचा की महापालिकेने, याविषयी अद्याप एकमत झालेले नाही. बदलापूर-शीळ रस्त्यालगतही त्यांना कचरा आढळला होता. हाच कचरा औद्योगिक परिसरातील नाल्यात टाकला जातो. त्यामुळे नाले तुंबतात. आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. हा कचरा तातडीने हटवण्याचे आदेश कदम यांनी दिले होते. डोंबिवलीतील औद्योगिक कारखान्यांचा परिसर पालिका हद्दीत आला असला, तरी त्यातील काही भागासाठी एमआयडीसी नियोजन प्राधिकरण आहे. तेथे सुविधा पुरवण्याचे काम एमआयडीसीचे आहे. मात्र, एमआयडीसी ते करत नाही. आलेला निधी त्यांच्याकडून खर्च केला जात नाही. त्यातच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील यांनी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांची भेट घेतली. त्यानंतर तोरस्कर यांनी सांगितले, पालिका आपल्या क्षेत्रातील कचरा उचलण्यास तयार आहे. एमआयडीसीने त्यांच्या हद्दीतील कचरा उचलावा. हा कचरा कुठे टाकावा, हा प्रश्न आहेच. त्यामुळे एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबतच प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका अधिकाऱ्यांची लवकरच एक संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढला जाईल. मुख्याधिकारीही शांतबदलापूर-शीळ मार्गावरील कचरा उचलावा, यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावताना त्यात त्यांनी पर्यावरणमंत्र्यांचा पाहणी दौरा व आदेशाचा उल्लेख केला होता.