शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: October 18, 2016 05:25 IST

गेल्या दोन वर्षांत राज्य सरकारने केलेल्या कामगिरीचा मतदारांनी केलेला लेखाजोखा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने समोर येणार

मुंबई : गेल्या दोन वर्षांत राज्य सरकारने केलेल्या कामगिरीचा मतदारांनी केलेला लेखाजोखा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने समोर येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागेल. सध्या या नगरपालिकांमधील संख्याबळाचा विचार करता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत राजकीयदृष्ट्या बरेच पाणी वाहून गेले आहे. पाच वर्षांपूर्वी निवडणूक झाली तेव्हा आघाडी सरकार होते. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेने प्रचंड यश मिळविले. विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेने निर्विवाद यश संपादन केले. गेल्या दोन वर्षांत फडणवीस सरकारने केलेली विकासाची कामे लोकांच्या पसंतीला उतरली का याची ही निवडणूक म्हणजे एक चाचणी असेल. तसेच, या स्थानिक स्वराज्य संस्थांवरील आपले वर्चस्व कायम ठेवण्याचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर असेल. आघाडी वा युतीतील कोणत्याही पक्षाने ही निवडणूक स्वबळावर लढायची की आघाडी/युतीमध्ये या बाबतचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही कसोटी लागणार आहे. मराठा मोर्चांचा काही राजकीय परिणाम होतो काय याची चाचणीदेखील या निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातील होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची ही रंगीत तालिम असेल. आघाडी वा युती करण्यासाठी सर्वच पक्षांकडे कमी दिवस आहेत. पहिल्या टप्प्यात २७ नोव्हेंबरला १४७ नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची थेट निवडणूकीस उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ आॅक्टोबर आहे. (विशेष प्रतिनिधी)