शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

‘नीट’च्या प्रश्नाबाबत पंतप्रधानांना भेटणार

By admin | Updated: May 17, 2016 05:25 IST

मोदी यांच्याशी रविवारी फोनवरून यासंदर्भात चर्चा झाली असून, त्यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असल्याचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई : ‘नीट’चा तिढा सोडविण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच भेटून करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी रविवारी फोनवरून यासंदर्भात चर्चा झाली असून, त्यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असल्याचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाने यंदापासून ‘नॅशनल एलिजिबिलिटी-कम-एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) बंधनकारक केल्याच्या संदर्भात राज ठाकरे यांनी पालकांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या भेटीत पालकांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.‘नीट’ लादली गेल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगून ही परीक्षा अशी अचानक अनिवार्य करणे उचित नाही. मराठीमध्ये पेपर सोडविण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिलेली असली तरी ज्या सीबीएससीच्या अभ्यासक्रमावर ‘नीट’चे पेपर आधारित आहेत, त्या अभ्यासक्रमाचे मराठी भाषांतर उपलब्ध नाही. दोन महिन्यांत या परीक्षेची तयारी करणे कठीण आहे. सर्वोच्च न्यायालयाने नीटबाबत निर्णय दिला असला तरी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, अशी विनंती आपण पंतप्रधानांकडे करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, यासंदर्भात आपण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही फोनवरून चर्चा केली. त्यांना या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली असून, त्यांनीही आपण तातडीने या विषयामध्ये लक्ष घालू, असे आश्वासन दिल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)देश कोण चालवतेय, सरकार की कोर्ट?वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’ घ्यायची की नाही, कधीपासून घ्यायची हे सरकारला ठरवू द्या. न्यायालयाला वाटले म्हणून यंदापासून ‘नीट’ बंधनकारक केले, हे बरोबर नाही. देश सरकार चालवतंय की न्यायालय, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. राज्यात आधीच शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. नीटच्या या गोंधळामुळे उद्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुरू व्हायला नकोत. पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घातले, तर हा विषय नक्की सुटेल, असा विश्वास राज यांनी व्यक्त केला.राज्य शासनाने पुन्हा सुप्रीम कोर्टात जावेअहमदनगर : देशभरात एमबीबीएस व बीडीएसचे प्रवेश ‘नीट’मार्फत व्हावे, हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश बदलण्याचा अधिकार कोणाला आहे. त्याची कायदेशीर तपासणी करून राज्य व केंद्र शासनाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.