शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

‘नीट’च्या प्रश्नाबाबत पंतप्रधानांना भेटणार

By admin | Updated: May 17, 2016 05:25 IST

मोदी यांच्याशी रविवारी फोनवरून यासंदर्भात चर्चा झाली असून, त्यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असल्याचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई : ‘नीट’चा तिढा सोडविण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी विनंती आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच भेटून करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी रविवारी फोनवरून यासंदर्भात चर्चा झाली असून, त्यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असल्याचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाने यंदापासून ‘नॅशनल एलिजिबिलिटी-कम-एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) बंधनकारक केल्याच्या संदर्भात राज ठाकरे यांनी पालकांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या भेटीत पालकांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.‘नीट’ लादली गेल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगून ही परीक्षा अशी अचानक अनिवार्य करणे उचित नाही. मराठीमध्ये पेपर सोडविण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिलेली असली तरी ज्या सीबीएससीच्या अभ्यासक्रमावर ‘नीट’चे पेपर आधारित आहेत, त्या अभ्यासक्रमाचे मराठी भाषांतर उपलब्ध नाही. दोन महिन्यांत या परीक्षेची तयारी करणे कठीण आहे. सर्वोच्च न्यायालयाने नीटबाबत निर्णय दिला असला तरी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, अशी विनंती आपण पंतप्रधानांकडे करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, यासंदर्भात आपण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही फोनवरून चर्चा केली. त्यांना या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली असून, त्यांनीही आपण तातडीने या विषयामध्ये लक्ष घालू, असे आश्वासन दिल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)देश कोण चालवतेय, सरकार की कोर्ट?वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’ घ्यायची की नाही, कधीपासून घ्यायची हे सरकारला ठरवू द्या. न्यायालयाला वाटले म्हणून यंदापासून ‘नीट’ बंधनकारक केले, हे बरोबर नाही. देश सरकार चालवतंय की न्यायालय, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. राज्यात आधीच शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. नीटच्या या गोंधळामुळे उद्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुरू व्हायला नकोत. पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घातले, तर हा विषय नक्की सुटेल, असा विश्वास राज यांनी व्यक्त केला.राज्य शासनाने पुन्हा सुप्रीम कोर्टात जावेअहमदनगर : देशभरात एमबीबीएस व बीडीएसचे प्रवेश ‘नीट’मार्फत व्हावे, हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश बदलण्याचा अधिकार कोणाला आहे. त्याची कायदेशीर तपासणी करून राज्य व केंद्र शासनाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.