शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

संमेलन हवेच!

By admin | Updated: April 2, 2015 03:11 IST

मराठी भाषेवर ज्याचं प्रेम आहे, असा कोणी साहित्य संमेलनांना; मग ते अखिल भारतीय असो किंवा अगदी तालुका किंवा गावस्तरावरचं, विरोध करेल

प्रा. डॉ. द. ता. भोसलेमराठी भाषेवर ज्याचं प्रेम आहे, असा कोणी साहित्य संमेलनांना; मग ते अखिल भारतीय असो किंवा अगदी तालुका किंवा गावस्तरावरचं, विरोध करेल असं मला वाटत नाही. एकच भाषा बोलणारी लाखभर माणसं एकाच वेळी एकाच ठिकाणी दोन-तीन दिवस जमतात, बोलतात, चर्चा करतात याला काहीच अर्थ नाही, असं कसं म्हणता येईल? आजच्या धकाधकीच्या काळात लेखकांना परस्परांना भेटता येतं का? या प्रश्नाचं सरळ उत्तर नाही असंच आहे. संमेलनाच्या निमित्तानं ते तसे एकत्र येतात. विचारांचं आदानप्रदान होतं, नवे विषय, नवे विचार यांची सहजपणे देवाणघेवाण होते. लेखकांनाही आपल्या वाचकांना असे समोर थेट आपल्याशी बोलताना पाहून आनंद होत असणारच की! वाचक-लेखक हा साहित्यदुवा जपायचे काम संमेलने नक्कीच करतात. या निमित्तानं नामवंत वक्त्यांची भाषणं ऐकायला मिळणं, हीही एक फायद्याचीच गोष्ट आहे. मी स्वत: तब्बल २७ पेक्षा अधिक संमेलनांना उपस्थित राहिलेला साहित्यप्रेमी आहे. अगदी अशा मोठ्या संमेलनातील नसला तरी माझा स्वत:चा विद्यार्थिदशेतील एक अनुभव सांगतो. ६० किंवा ६१ साल असेल. पुण्यातील स. प. महाविद्यालयात असंच कसलं तरी संमेलन होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर बोलणार होते. ‘पाकिस्तानचं भारतावरील आक्रमण’ असा विषय होता. मैदानात प्रचंड गर्दी होती. आम्ही बरेच विद्यार्थी वसतिगृहातून खास भाषण ऐकण्यासाठी गेलो होतो. सावरकर बोलले. फारच चांगलं भाषण झालं त्यांचं. मी आता थकलो आहे, असे ते म्हणाले व खाली बसले. त्यानंतर काय झालं समजलं नाही; पण उठून त्यांनी उत्तरार्ध सुरू केला. आजही आठवण झाली तरी अंगावर काटा उभा राहतो. ओजस्वी वक्तृत्व म्हणजे काय याचाच तो अनुभव होता. संमेलन नसते तर तो मिळाला असता का, याचा मी आजही विचार करतो. आज कुठे आहेत असे वक्ते? असे म्हणण्यापूर्वी श्रोते असले तरच वक्ते तयार होतात हे लक्षात घ्यायला हवं. कोणत्याही गोष्टीत आर्थिक फायदा पाहायचा ही आजची रीतच आहे. तसा विचार केला तरी संमेलने फायद्याचीच आहेत. एरवीची ग्रंथविक्री व संमेलनातून होणारी २ ते ३ कोटी रुपयांची ग्रंथविक्री पाहा. त्यामुळे ग्रंथप्रसार आणि वाचनसंस्कृती रुजायला संमेलने हातभार लावतातच. अर्थात संमेलनात काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. नाट्यलेखनाची कार्यशाळा, अभिनयाची कार्यशाळा असं होऊ शकतं तर मग नवोदित लेखकांसाठी अशी कार्यशाळा का आयोजित केली जाऊ नये? गावांमध्ये अशा कार्यशाळांची नितांत गरज आहे, कथा कशी लिहावी, प्रसंग कसे फुलवावेत, वाचन कसं वाढवावं हे या कार्यशाळांमधून सांगता येईल. साहित्याची आवड आता फक्त शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही. अगदी खेड्यांमध्येही चांगली संमेलने होतात. महामंडळ त्यांना थोडीफार आर्थिक मदत करून ही अडचण दूर करू शकतं. त्यातून त्या मंडळींना उत्साह मिळेल. परप्रांतातही हवीत संमेलने. मराठी माणसे घर न सोडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यानिमित्तानं एखाद्या प्रांताची ओळख होत असेल तर त्यात काही गैर नाही. नेहमीच नाही; पण अधूनमधून परप्रांतातही संमेलनं घ्यायलात हवीत, असं माझं मत आहे. एखादी सहल काढली तर मराठी माणसे आता १०-१५ हजार रुपये अगदी सहज खर्च करतात. पंजाबला जाण्यासाठी मला वाटत नाही इतका खर्च येईल. आपल्या भाषेसाठी आपण एवढंही करणार नसू तर काय बोलायचं? आणि कशाला बोलायचं?(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)