शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

मेडिकललाच झाला क्षयरोग!

By admin | Updated: December 16, 2014 01:05 IST

‘क्षयरोग’ हा राष्ट्रीय नियंत्रण कार्यक्रमात येतो. परंतु मेडिकलच्या छाती व क्षयरोग विभागाला तब्बल आठ महिन्यांपासून वॉर्ड नाही. परिणामी गंभीर रुग्णांना वाऱ्यावर सोडले जात आहे.

प्रभावी औषधे नाही : आठ महिन्यांपासून वॉर्डही बंदसुमेध वाघमारे - नागपूर‘क्षयरोग’ हा राष्ट्रीय नियंत्रण कार्यक्रमात येतो. परंतु मेडिकलच्या छाती व क्षयरोग विभागाला तब्बल आठ महिन्यांपासून वॉर्ड नाही. परिणामी गंभीर रुग्णांना वाऱ्यावर सोडले जात आहे. दुसरीकडे या विभागात आवश्यक यंत्रणा आहे, तज्ज्ञ डॉक्टर आहेत. परंतु नव्या औषधी व तंत्रज्ञानाच्या अभावाने रुग्ण अडचणीत सापडले आहेत. विशेषत: या आजारावर प्रभावी असलेले ‘इन्हेलर’ही दिले जात नसल्याने मेडिकललाच क्षयरोग झाल्याचे चित्र आहे. भारतात सध्याच्या स्थितीत अस्थमाच्या रु ग्णांची संख्या सुमारे दोन कोटी आहे. एकट्या नागपुरात सुमारे तीन लाख अस्थमाचे रुग्ण आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक लहान मुलांना अस्थमाचा त्रास असल्याचे सांगण्यात येते. वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या सवयीत झालेला बदल आदी कारणांमुळे क्षयरोगाचे रुग्ण वाढत असतानाही मेडिकलच्या छाती व क्षयरोग विभागाला घेऊन कुणीच गंभीर नाही. मेडिकलपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेला हा विभाग वाळीत टाकल्याप्रमाणेच आहे. याच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज २०० वर रुग्ण येतात. यातील पाच ते दहा तरी रुग्णांना भरती करून उपचार करणे आवश्यक असते. परंतु किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी बंद करण्यात आलेला वॉर्ड अद्यापही कुलूपातच आहे. रुग्णाला मेयो रुग्णालयाकडे पाठविले जात असलेतरी अनेक रुग्ण तिथपर्यंत पोहचत नसल्याची धक्कादायक माहिती आहे. दरकरारावर इन्हेलरही नाहीअस्थमा रुग्णांसाठी आवश्यक ‘एमडीआय’ किंवा ‘डीपीआय’ हे इन्हेलर मेडिकलमध्ये उपलब्ध नाही. विशेष म्हणजे दरकरारावर (आरसी) या औषधाची नोंदच नाही. यामुळे स्थानिक पातळीवर अत्यंत कमी प्रमाणात हे औषध खरेदी केले जाते. याचा फायदा १० टक्केही लोकांना होत नसल्याची माहिती आहे. बीपीएल व ज्येष्ठ नागरिकांना मोफत औषध देण्याचा नियम असताना डॉक्टर इन्हेलर बाहेरून विकत घेण्यासाठी लिहून देतात.दुरुस्तीच्या नावाखाली रुग्ण वाऱ्यावरया विभागाला ४२ व ४३ असे दोन वॉर्ड आहेत. परंतु दरम्यानच्या काळात मनुष्यबळ नसल्याचे कारणावरून तीन वर्षांपूर्वी वॉर्ड ४३ बंद करण्यात आला तर दुरुस्तीच्या नावाखाली आठ महिन्यांपूर्वी वॉर्ड ४२ बंद करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे, क्षयरोग विभागाच्या परिसरात ‘एम्स’ स्थापन करण्याची घोषणा झाल्याने या विभागाकडे मेडिकल प्रशासनासह वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयाचेही (डीएमईआर) दुर्लक्ष झाले आहे.