शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

रेल्वे स्थानकांजवळ वैद्यकीय सेवा

By admin | Updated: December 4, 2014 03:00 IST

न्यायालयाच्या दणक्यानंतर रेल्वे प्रशासनाने मुंबई व उपनगरांतील १४ रेल्वे स्थानकांजवळ आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे़

अमर मोहिते, मुंबईन्यायालयाच्या दणक्यानंतर रेल्वे प्रशासनाने मुंबई व उपनगरांतील १४ रेल्वे स्थानकांजवळ आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे़ येत्या तीन महिन्यांत ही केंद्र सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे़ त्यामुळे नवीन वर्षात तरी निदान रेल्वे अपघातातील जखमींना तत्काळ उपचार मिळतील़ या सेवा केंद्रात एक एमबीबीएस डॉक्टर, नर्स व साहाय्यक पूर्णवेळ असेल़ ही टीम रेल्वे अपघातातील जखमींवर विनाविलंब उपचार करेल़ या सेवा केंद्राआधी रेल्वेने जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रेल्वे स्थानकांजवळ हेलिपॅड उभारण्याचा निर्णय घेतला आहे़ याचे काम सुरू असून या दोन निर्णयांमुळे रेल्वे अपघातात वेळेवर उपचार न मिळाल्याने बळी जाणाऱ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे़ रेल्वे अपघातातील जखमींना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेच्या काही स्थानकांजवळ आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र सुरू करा, असे आदेश मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठाने गेल्या वर्षी मार्च महिन्यात दिले होते़ मात्र त्याची अंमलबजावणी रेल्वे प्रशासन करीत नव्हते़ अखेर गेल्या महिन्यात न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाने रेल्वे प्रशासनाचे कान उपटत रेल्वे संवदेनशील नसल्याचा ताशेरे ओढले़ तसेच रेल्वे बोर्डाने याचा निर्णय घेण्यासाठी दोन अधिकारी नेमावेत व त्यांनी याबाबतच निर्णय घ्यावा, असे आदेशही न्या़ ओक यांनी दिले होते़ याची दखल घेत रेल्वेने दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली व त्यांनी रेल्वे स्थानकांजवळ आपत्कालीन सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे़ ज्या रेल्वे स्थानकांजवळ जागा उपलब्ध असेल, तेथे ही केंद्रे लगेचच सुरू केली जातील व ज्या स्थानकांजवळ जागा नसेल तेथे तातडीने जागा शोधून ही केंद्र सुरू केली जाणार आहे़ याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनी जनहित याचिका केली आहे़ अपघातातील जखमींना विनाविलंब उपचार मिळावेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश न्यायालयाने रेल्वेला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़ त्याची दखल घेत न्यायालयाने वरील आदेश दिले होते व त्यानुसार रेल्वेने हा निर्णय घेतला असून त्याची माहिती न्यायालयात सादर केल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या हाती लागले आहे़ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्णवेळ आसने राखीवरेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्णवेळ आसने राखीव ठेवण्याचा निर्णयही रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़ सध्या ही आसने ठरावीक वेळेसाठी ज्येष्ठ नागरिकांकरिता राखीव असतात़ याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल असून ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेमध्ये गैरसोय होत असल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे़ त्याची दखल घेत रेल्वेने हा निर्णय घेतला आहे़