शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकांजवळ वैद्यकीय सेवा

By admin | Updated: December 4, 2014 03:00 IST

न्यायालयाच्या दणक्यानंतर रेल्वे प्रशासनाने मुंबई व उपनगरांतील १४ रेल्वे स्थानकांजवळ आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे़

अमर मोहिते, मुंबईन्यायालयाच्या दणक्यानंतर रेल्वे प्रशासनाने मुंबई व उपनगरांतील १४ रेल्वे स्थानकांजवळ आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे़ येत्या तीन महिन्यांत ही केंद्र सुरू करण्याचा रेल्वेचा मानस आहे़ त्यामुळे नवीन वर्षात तरी निदान रेल्वे अपघातातील जखमींना तत्काळ उपचार मिळतील़ या सेवा केंद्रात एक एमबीबीएस डॉक्टर, नर्स व साहाय्यक पूर्णवेळ असेल़ ही टीम रेल्वे अपघातातील जखमींवर विनाविलंब उपचार करेल़ या सेवा केंद्राआधी रेल्वेने जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रेल्वे स्थानकांजवळ हेलिपॅड उभारण्याचा निर्णय घेतला आहे़ याचे काम सुरू असून या दोन निर्णयांमुळे रेल्वे अपघातात वेळेवर उपचार न मिळाल्याने बळी जाणाऱ्यांच्या संख्येत घट होण्याची शक्यता आहे़ रेल्वे अपघातातील जखमींना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेच्या काही स्थानकांजवळ आपत्कालीन वैद्यकीय सेवा केंद्र सुरू करा, असे आदेश मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठाने गेल्या वर्षी मार्च महिन्यात दिले होते़ मात्र त्याची अंमलबजावणी रेल्वे प्रशासन करीत नव्हते़ अखेर गेल्या महिन्यात न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाने रेल्वे प्रशासनाचे कान उपटत रेल्वे संवदेनशील नसल्याचा ताशेरे ओढले़ तसेच रेल्वे बोर्डाने याचा निर्णय घेण्यासाठी दोन अधिकारी नेमावेत व त्यांनी याबाबतच निर्णय घ्यावा, असे आदेशही न्या़ ओक यांनी दिले होते़ याची दखल घेत रेल्वेने दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली व त्यांनी रेल्वे स्थानकांजवळ आपत्कालीन सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे़ ज्या रेल्वे स्थानकांजवळ जागा उपलब्ध असेल, तेथे ही केंद्रे लगेचच सुरू केली जातील व ज्या स्थानकांजवळ जागा नसेल तेथे तातडीने जागा शोधून ही केंद्र सुरू केली जाणार आहे़ याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनी जनहित याचिका केली आहे़ अपघातातील जखमींना विनाविलंब उपचार मिळावेत, यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश न्यायालयाने रेल्वेला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे़ त्याची दखल घेत न्यायालयाने वरील आदेश दिले होते व त्यानुसार रेल्वेने हा निर्णय घेतला असून त्याची माहिती न्यायालयात सादर केल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या हाती लागले आहे़ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्णवेळ आसने राखीवरेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी पूर्णवेळ आसने राखीव ठेवण्याचा निर्णयही रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़ सध्या ही आसने ठरावीक वेळेसाठी ज्येष्ठ नागरिकांकरिता राखीव असतात़ याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल असून ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेमध्ये गैरसोय होत असल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे़ त्याची दखल घेत रेल्वेने हा निर्णय घेतला आहे़