शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

मेडिकलच्या ५०० जागांचा तिढा सुटणार!

By admin | Updated: July 13, 2014 00:59 IST

मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) मागील शैक्षणिक वर्षात वाढविलेल्या राज्यातील एमबीबीएसच्या ५०० जागा पायाभूत सुविधांचे कारण पुढे करून यावर्षी राखून ठेवल्या होत्या.

१५ जुलैला होणार घोषणा : केंद्राकडे प्रस्ताव सादरनागपूर : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) मागील शैक्षणिक वर्षात वाढविलेल्या राज्यातील एमबीबीएसच्या ५०० जागा पायाभूत सुविधांचे कारण पुढे करून यावर्षी राखून ठेवल्या होत्या. एमसीआयने या संदर्भात शनिवारी बैठक बोलाविली होती. यात या जागांवर सकारात्मक निर्णय घेत मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविल्याची व १५ जुलैला यावर घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या बैठकीत पश्चिम बंगालमधील रद्द केलेल्या १०५० मेडिकलच्या जागा पुन्हा बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला.एमसीआयने मागील शैक्षणिक वर्षात देशातील एमबीबीएसच्या ३००० जागा वाढविण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम वर्ष एमबीबीएसची प्रवेशक्षमता ५० व १०० असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना प्रत्येकी ५० वाढीव जागा मिळणार होत्या. महाराष्ट्रात २०६० जागांवरून २५६० जागांवर यावर्षी प्रवेश मिळणार होते, परंतु एमसीआयने ५०० जागा राखून ठेवल्याने जुन्याच जागांवर या वर्षी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. गेलेल्या जागा मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, केंद्रीय आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांनी संयुक्त प्रयत्न चालविले होते. या विषयावर एमसीआयने देशभरातील आरोग्य शिक्षण विभागाची आज बैठक बोलाविली होती. यात राज्यातील वैद्यकीय शिक्षण संचालक आणि नऊ मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता बैठकीत उपस्थित होते. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर या गैरहजर होत्या. त्यांच्या अनुपस्थितीमुळे एमसीआयच्या सचिवांनी नाराजी व्यक्त केली. परंतु सर्वांनी मिळून त्यांची नाराजी दूर केल्याने ५०० जागांवर सकारात्मक निर्णय घेत मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला. (प्रतिनिधी)