शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

दुष्काळासंदर्भात उपाययोजना कराव्यात : सतेज पाटील

By admin | Updated: May 5, 2016 20:56 IST

दुष्काळासंदर्भात शासनाच्या भूमिकेवर आता संत बोलायला लागले, कोर्ट बोलायला लागलेय, शेतकरी टाहो फोडून सांगत आहे. तरीही सरकारला जाग येत नाही.

ऑनलाइन लोकमतसांगोला, दि. ५ : दुष्काळासंदर्भात शासनाच्या भूमिकेवर आता संत बोलायला लागले, कोर्ट बोलायला लागलेय, शेतकरी टाहो फोडून सांगत आहे. तरीही सरकारला जाग येत नाही. आम्ही बोललो म्हणजे राजकीय विरोधक भांडवल करताहेत म्हणून आमच्यावर आरोप केले जातात. परंतु आता सगळेच बोलायला लागल्यानंतर तरी किमान सरकारला जाग यावी आणि दुष्काळासंदर्भात उपाययोजना कराव्यात अशी इच्छा माजी गृहराज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.सांगोला तालुक्यातील हातीद, वाटंबरे व वाढेगाव येथे भेट देवून आमदार सतेज पाटील यांनी दुष्काळाची दाहकता समजावून घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. सांगोला येथे युवक काँग्रेसच्या कार्यालयात आ. पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, प्रा. प्रबुध्दचंद्र झपके, जगदीश बाबर, तालुकाध्यक्ष दत्तात्रय टापरे, शहराध्यक्ष अजयसिंंह इंगवले, पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, माढा लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विक्रमसिंंह भोसले, माण तालुकाध्यक्ष विशाल बागल, माढा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब वाघ, करमाळ्याचे चिंंतामणी जगताप, मंगळवेढ्याचे ऋतुराज बिले, महिला जिल्हाध्यक्षा साधना उगले उपस्थित होत्या.आ. सतेज पाटील म्हणाले, प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार आम्ही दुष्काळी भागाचा दोन दिवसांचा दौरा करत आहोत. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत. लोक टँकर मागत आहेत, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु सरकारकडून काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत. टँकर मंजूरीचे अधिकार तहसीलदारांना असतानाही ते मंजूर केले जात नाहीत. डाळींबाच्या बागा काढा, जनावरे विका असे सल्ले सध्या सरकारी अधिकारी देत असल्याचे शेतकऱ्यांनी आपणास सांगितले. याबाबत आपण आपला अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे सादर करणार आहोत. त्यानंतर दुष्काळासंदर्भात काय करायचे? त्याचा निर्णय प्रदेश पातळीवर होणार आहे. तात्पुरत्या उपाययोजना तसेच दीर्घकालीन उपाययोजना काय -काय कराव्या लागतील ते पहावे लागणार आहे.टेंभू योजनेची रखडलेली कामे पूर्ण झाली तर पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटणार आहे. त्यासाठीही आपण अहवालात कळवणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी दिली पाहिजे, बागा जगवण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली पाहिजे असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.