शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळासंदर्भात उपाययोजना कराव्यात : सतेज पाटील

By admin | Updated: May 5, 2016 20:56 IST

दुष्काळासंदर्भात शासनाच्या भूमिकेवर आता संत बोलायला लागले, कोर्ट बोलायला लागलेय, शेतकरी टाहो फोडून सांगत आहे. तरीही सरकारला जाग येत नाही.

ऑनलाइन लोकमतसांगोला, दि. ५ : दुष्काळासंदर्भात शासनाच्या भूमिकेवर आता संत बोलायला लागले, कोर्ट बोलायला लागलेय, शेतकरी टाहो फोडून सांगत आहे. तरीही सरकारला जाग येत नाही. आम्ही बोललो म्हणजे राजकीय विरोधक भांडवल करताहेत म्हणून आमच्यावर आरोप केले जातात. परंतु आता सगळेच बोलायला लागल्यानंतर तरी किमान सरकारला जाग यावी आणि दुष्काळासंदर्भात उपाययोजना कराव्यात अशी इच्छा माजी गृहराज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.सांगोला तालुक्यातील हातीद, वाटंबरे व वाढेगाव येथे भेट देवून आमदार सतेज पाटील यांनी दुष्काळाची दाहकता समजावून घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. सांगोला येथे युवक काँग्रेसच्या कार्यालयात आ. पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, प्रा. प्रबुध्दचंद्र झपके, जगदीश बाबर, तालुकाध्यक्ष दत्तात्रय टापरे, शहराध्यक्ष अजयसिंंह इंगवले, पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, माढा लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विक्रमसिंंह भोसले, माण तालुकाध्यक्ष विशाल बागल, माढा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब वाघ, करमाळ्याचे चिंंतामणी जगताप, मंगळवेढ्याचे ऋतुराज बिले, महिला जिल्हाध्यक्षा साधना उगले उपस्थित होत्या.आ. सतेज पाटील म्हणाले, प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार आम्ही दुष्काळी भागाचा दोन दिवसांचा दौरा करत आहोत. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत. लोक टँकर मागत आहेत, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु सरकारकडून काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत. टँकर मंजूरीचे अधिकार तहसीलदारांना असतानाही ते मंजूर केले जात नाहीत. डाळींबाच्या बागा काढा, जनावरे विका असे सल्ले सध्या सरकारी अधिकारी देत असल्याचे शेतकऱ्यांनी आपणास सांगितले. याबाबत आपण आपला अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे सादर करणार आहोत. त्यानंतर दुष्काळासंदर्भात काय करायचे? त्याचा निर्णय प्रदेश पातळीवर होणार आहे. तात्पुरत्या उपाययोजना तसेच दीर्घकालीन उपाययोजना काय -काय कराव्या लागतील ते पहावे लागणार आहे.टेंभू योजनेची रखडलेली कामे पूर्ण झाली तर पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटणार आहे. त्यासाठीही आपण अहवालात कळवणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी दिली पाहिजे, बागा जगवण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली पाहिजे असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.