शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

‘एमबीए’ त प्रवेशाची मंदी

By admin | Updated: August 4, 2014 00:50 IST

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यपातळीवर राबविण्यात आलेल्या ‘एमबीए’ प्रवेशप्रक्रियेला नागपूर विभागात निराशाजनक प्रतिसाद मिळाला आहे. ‘कॅप’अंतर्गत (सेंट्रलाईज्ड अ‍ॅडमिशन प्रोसेस) झालेल्या सर्व

‘कॅप’मध्ये विद्यार्थ्यांचा निरुत्साह : विभागातील केवळ ४५ टक्के जागा भरल्यानागपूर : तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राज्यपातळीवर राबविण्यात आलेल्या ‘एमबीए’ प्रवेशप्रक्रियेला नागपूर विभागात निराशाजनक प्रतिसाद मिळाला आहे. ‘कॅप’अंतर्गत (सेंट्रलाईज्ड अ‍ॅडमिशन प्रोसेस) झालेल्या सर्व फेऱ्यांमध्ये केवळ ४५ टक्के जागा भरल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांचा प्रचंड निरुत्साह व महाविद्यालयांचा घसरता दर्जा यांचा फटका प्रवेशप्रक्रियेला बसला. गेल्या दशकात पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची सर्वात मोठी पसंती असलेल्या ‘एमबीए’ची क्रेझ हळूहळू सरत चालली असल्याचे या आकडेवारीने स्पष्ट केले आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. याअंतर्गत गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगले प्रवेश होतील अशी महाविद्यालयांना अपेक्षा होती. परंतु ती सपशेल फोल ठरली. शेवटच्या फेरीनंतर नागपूर विभागात जवळपास ‘कॅप’ अंतर्गत येणाऱ्या ५५ टक्के जागा रिक्त आहेत. विद्यार्थ्यांच्या निरुत्साहामुळे निरनिराळ््या ५२ महाविद्यालयांतील ‘कॅप’अंतर्गत येणाऱ्या एकूण ४,०४७ जागांपैकी केवळ १,८२६ जागांवरच प्रवेश झाले. तीनही फेऱ्यांअखेरच चक्क २,२२१ जागा रिक्त राहिल्याने या रिकाम्या जागांचे करायचे तरी काय असा प्रश्न महाविद्यालयांना पडला आहे.(प्रतिनिधी)महाविद्यालयांसमोर आव्हान‘कॅप’ अंतर्गत २,२२१ जागा रिक्त राहिल्या असून इतर कोट्यातील जागांना भरण्याचेदेखील आव्हान महाविद्यालयांसमोर आहे. यात संस्थास्तर, अल्पसंख्यक संस्था यांचादेखील समावेश आहे. नागपूर विभागात या सर्व मिळून एकूण ४,६०८ जागा उपलब्ध आहेत. यापैकी २,७८२ म्हणजेच सुमारे ६० टक्के जागा रिक्त आहेत.विद्यार्थ्यांमध्ये निरुत्साहएमबीएला प्रवेश घेण्यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. हव्या त्या प्रमाणात नोकरी मिळत नसणे हे याचे सगळ््यात मोठे कारण आहे. प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने दाखविल्या जातात. मात्र त्यानंतर त्यांच्या पदरी निराशाच येते. अनेक महाविद्यालयांत तर योग्य प्राध्यापक व सोयीसुविधा देखील नाहीत. यातूनच महाविद्यालयांतील जागा रिकाम्या राहण्यास सुरुवात झाली.