शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

‘मजिप्रा’ आर्थिक अडचणीत

By admin | Updated: September 2, 2015 23:48 IST

पश्‍चिम व-हाडातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ८00 कोटींची थकबाकी.

सुनील काकडे/वाशिम : पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे पाणीपुरवठा योजनेचे सुमारे ८00 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम वर्षागणिक वाढतच चालल्याने 'मजिप्रा' आर्थिक अडचणीत सापडले आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने राज्यात ३८९ नागरी पाणीपुरवठा व २६ नागरी मलनि:सारण योजना पूर्ण केल्या आहेत. याशिवाय ११ हजारपेक्षा जास्त ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कामेदेखील ह्यमजिप्राह्णनेच पूर्ण केली आहेत. त्यानुसार, महान धरणावरुन अकोला शहराला पाणीपुरवठा करणारी पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पूर्ण करुन अकोला महानगरपालिकेकडे २00५ मध्ये हस्तांतरित केली. तेव्हापासून पाणीपुरवठा योजनेची रक्कम थकीत असून सध्या हा आकडा ५५१ कोटींच्या घरात पोहोचला असल्याची माहिती जीवन प्राधिकरणचे अकोला येथील कार्यकारी अभियंता एस.टी.हुंगे यांनी दिली. अकोला जिल्ह्यातीलच मुर्तीजापूर पालिकेकडे २४ कोटी आणि बाळापूर पालिकेकडे २३ कोटी रुपये थकीत आहेत. बुलडाणा शहराला येळगाव येथील धरणावरुन पाणीपुरवठा केला जातो. सन २0१२ ची लोकसंख्या गृहित धरुन तयार करण्यात आलेल्या या योजनेचे संपूर्ण काम जीवन प्राधिकरणने पूर्ण करुन २000-२00१ मध्ये ही योजना बुलडाणा नगरपरिषदेकडे हस्तांतरित केली; मात्र या कामापोटी निर्धारित रक्कम देण्यास बुलडाणा नगरपालिकेने टाळाटाळ केल्यामुळे सध्या या पालिकेकडे 'मजिप्रा'चे १६ कोटी रुपये थकीत आहेत. चिखली आणि शेगाव नगरपालिकेकडून 'मजिप्रा'ला अनुक्रमे ७ आणि ६ असे १३ कोटी रुपये घेणे आहेत. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एकबूर्जी पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करुन ही योजना जीवन प्राधिकरणने १९८६-८७ मध्ये नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. नागरिकांकडून पाणीकर वसूल करणार्‍या वाशिम पालिकेने 'मजिप्रा'ला पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने हा आकडा सध्या २५ कोटी रुपयांच्या आसपास पोचला आहे. रिसोड पालिका ३ कोटी आणि मंगरुळपीर पालिकेकडून 'मजिप्रा'ला २७ लाख रुपये घेणे आहेत, अशी माहिती जीवन प्राधिकरणचे वाशिम येथील कार्यकारी अभियंता डी.पी.हळदे यांनी दिली. याशिवाय अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ग्रामिण भागात तयार केलेल्या पाणीपुरवठा योजनांची जिल्हा परिषदांकडे प्रचंड थकबाकी असून सध्या या तीन जिल्ह्यांमध्ये जीवन प्राधिकरणचे सुमारे ८0२ कोटी रुपये अडकले आहेत.