शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

‘मजिप्रा’ आर्थिक अडचणीत

By admin | Updated: September 2, 2015 23:48 IST

पश्‍चिम व-हाडातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ८00 कोटींची थकबाकी.

सुनील काकडे/वाशिम : पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे पाणीपुरवठा योजनेचे सुमारे ८00 कोटी रुपये थकीत आहेत. ही रक्कम वर्षागणिक वाढतच चालल्याने 'मजिप्रा' आर्थिक अडचणीत सापडले आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने राज्यात ३८९ नागरी पाणीपुरवठा व २६ नागरी मलनि:सारण योजना पूर्ण केल्या आहेत. याशिवाय ११ हजारपेक्षा जास्त ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कामेदेखील ह्यमजिप्राह्णनेच पूर्ण केली आहेत. त्यानुसार, महान धरणावरुन अकोला शहराला पाणीपुरवठा करणारी पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने पूर्ण करुन अकोला महानगरपालिकेकडे २00५ मध्ये हस्तांतरित केली. तेव्हापासून पाणीपुरवठा योजनेची रक्कम थकीत असून सध्या हा आकडा ५५१ कोटींच्या घरात पोहोचला असल्याची माहिती जीवन प्राधिकरणचे अकोला येथील कार्यकारी अभियंता एस.टी.हुंगे यांनी दिली. अकोला जिल्ह्यातीलच मुर्तीजापूर पालिकेकडे २४ कोटी आणि बाळापूर पालिकेकडे २३ कोटी रुपये थकीत आहेत. बुलडाणा शहराला येळगाव येथील धरणावरुन पाणीपुरवठा केला जातो. सन २0१२ ची लोकसंख्या गृहित धरुन तयार करण्यात आलेल्या या योजनेचे संपूर्ण काम जीवन प्राधिकरणने पूर्ण करुन २000-२00१ मध्ये ही योजना बुलडाणा नगरपरिषदेकडे हस्तांतरित केली; मात्र या कामापोटी निर्धारित रक्कम देण्यास बुलडाणा नगरपालिकेने टाळाटाळ केल्यामुळे सध्या या पालिकेकडे 'मजिप्रा'चे १६ कोटी रुपये थकीत आहेत. चिखली आणि शेगाव नगरपालिकेकडून 'मजिप्रा'ला अनुक्रमे ७ आणि ६ असे १३ कोटी रुपये घेणे आहेत. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एकबूर्जी पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करुन ही योजना जीवन प्राधिकरणने १९८६-८७ मध्ये नगरपालिकेकडे हस्तांतरित केली. नागरिकांकडून पाणीकर वसूल करणार्‍या वाशिम पालिकेने 'मजिप्रा'ला पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने हा आकडा सध्या २५ कोटी रुपयांच्या आसपास पोचला आहे. रिसोड पालिका ३ कोटी आणि मंगरुळपीर पालिकेकडून 'मजिप्रा'ला २७ लाख रुपये घेणे आहेत, अशी माहिती जीवन प्राधिकरणचे वाशिम येथील कार्यकारी अभियंता डी.पी.हळदे यांनी दिली. याशिवाय अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ग्रामिण भागात तयार केलेल्या पाणीपुरवठा योजनांची जिल्हा परिषदांकडे प्रचंड थकबाकी असून सध्या या तीन जिल्ह्यांमध्ये जीवन प्राधिकरणचे सुमारे ८0२ कोटी रुपये अडकले आहेत.