शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
2
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
3
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
4
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
5
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
6
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
8
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
9
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
10
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
11
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
12
भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
13
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
14
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
15
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
16
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
17
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
18
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
19
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
20
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स

महापौर-आयुक्तांच्या मानापमानात नगरसेवकांचेच धाबे दणाणले!

By admin | Updated: November 19, 2016 03:44 IST

निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने कामांचे नारळ फोडायचे कसे आणि वचननाम्यात कामे दाखवायची कशी, असा पेच नगरसेवकांना पडला

अजित मांडके,

ठाणे - ठाण्याचा प्रथम नागरिक म्हणून विश्वासात न घेता, विषयपत्रिका पटलावर आणलीच कशी, असा सवाल उपस्थित करून प्रशासनाला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना प्रशासनानेच पलटवार करून झालेल्या अपमानाचा बदला घेतला खरा. परंतु, प्रशासन आणि सत्ताधारी, विरोधक यांच्यात रंगलेल्या मानापमानाच्या नाट्यात नगरसेवकांचे नुकसान झाले. पुढील महिन्यात होणारी महासभा शेवटची असेल. त्यानंतर, लागलीच निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने कामांचे नारळ फोडायचे कसे आणि वचननाम्यात कामे दाखवायची कशी, असा पेच नगरसेवकांना पडला आहे.जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागणार आहे. तिची आचारसंहिता डिसेंबरअखेर अथवा जानेवारीच्या पहिल्यादुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यात मागील पाच वर्षांचा अनुभव पाहता निधीचा अभाव, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगलेल्या सत्तेच्या सारीपाटाचा खेळ यामुळे विकासकामे रखडली होती. नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील कामांसाठीदेखील निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही. परंतु, मागील दोन ते तीन महासभांमध्ये प्रभागातील कामांचा समावेश विषयपत्रिकेत होऊ लागल्याने नगरसेवकांना हायसे वाटत होते. परंतु, काही नगरसेवकांच्या प्रभागातील कामांचा नारळच फुटला नसल्याचीही परिस्थिती आहे. त्यामुळे चालू आणि पुढील महिन्यात त्यांच्या प्रभागातील कामांचा समावेश होईल. शुक्रवारच्या महासभेतदेखील रस्ते, गटारे, पायवाटा, उद्यानांची दुरुस्ती, एलईडी पोल, पार्किंग, आरोग्यविषयक आदींसह इतर महत्त्वाच्या प्रस्तावांचा समावेश होता. महासभा सुरू होताच महापौरांनी सचिवांना दिलेल्या पत्रावरून सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात मानापमान नाट्य रंगल्याने आयुक्तांनी थेट सर्वच विषय मागे घेतले. त्यामुळे नारळ वाढवण्याच्या तयारीत असलेल्या अनेक नगरसेवकांची यामुळे घोर निराशा झाली आहे. याचे खापर त्यांनी महापौरांवर फोडले आहे. आयुक्तांनी आता हे सर्व विषय पुढील महासभेत घेण्याचे सांगितले आहे. >नारळ फुटणार तरी कधी?पुढील महिन्यात होणारी महासभा ही शेवटची असल्याने त्या वेळेस किती विषय मंजूर होतात, त्यावर स्वाक्षरी होऊन त्यांचे टेंडर केव्हा निघणार, त्या कामांचे नारळ केव्हा फोडणार, असा पेच आता सर्वपक्षीय नगरसेवकांना सतावू लागला आहे. या मानापमानाच्या नाट्यात हाल मात्र ठाणेकरांचे होतील.