शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

महापौर-आयुक्तांच्या मानापमानात नगरसेवकांचेच धाबे दणाणले!

By admin | Updated: November 19, 2016 03:44 IST

निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने कामांचे नारळ फोडायचे कसे आणि वचननाम्यात कामे दाखवायची कशी, असा पेच नगरसेवकांना पडला

अजित मांडके,

ठाणे - ठाण्याचा प्रथम नागरिक म्हणून विश्वासात न घेता, विषयपत्रिका पटलावर आणलीच कशी, असा सवाल उपस्थित करून प्रशासनाला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना प्रशासनानेच पलटवार करून झालेल्या अपमानाचा बदला घेतला खरा. परंतु, प्रशासन आणि सत्ताधारी, विरोधक यांच्यात रंगलेल्या मानापमानाच्या नाट्यात नगरसेवकांचे नुकसान झाले. पुढील महिन्यात होणारी महासभा शेवटची असेल. त्यानंतर, लागलीच निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने कामांचे नारळ फोडायचे कसे आणि वचननाम्यात कामे दाखवायची कशी, असा पेच नगरसेवकांना पडला आहे.जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागणार आहे. तिची आचारसंहिता डिसेंबरअखेर अथवा जानेवारीच्या पहिल्यादुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यात मागील पाच वर्षांचा अनुभव पाहता निधीचा अभाव, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगलेल्या सत्तेच्या सारीपाटाचा खेळ यामुळे विकासकामे रखडली होती. नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील कामांसाठीदेखील निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही. परंतु, मागील दोन ते तीन महासभांमध्ये प्रभागातील कामांचा समावेश विषयपत्रिकेत होऊ लागल्याने नगरसेवकांना हायसे वाटत होते. परंतु, काही नगरसेवकांच्या प्रभागातील कामांचा नारळच फुटला नसल्याचीही परिस्थिती आहे. त्यामुळे चालू आणि पुढील महिन्यात त्यांच्या प्रभागातील कामांचा समावेश होईल. शुक्रवारच्या महासभेतदेखील रस्ते, गटारे, पायवाटा, उद्यानांची दुरुस्ती, एलईडी पोल, पार्किंग, आरोग्यविषयक आदींसह इतर महत्त्वाच्या प्रस्तावांचा समावेश होता. महासभा सुरू होताच महापौरांनी सचिवांना दिलेल्या पत्रावरून सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात मानापमान नाट्य रंगल्याने आयुक्तांनी थेट सर्वच विषय मागे घेतले. त्यामुळे नारळ वाढवण्याच्या तयारीत असलेल्या अनेक नगरसेवकांची यामुळे घोर निराशा झाली आहे. याचे खापर त्यांनी महापौरांवर फोडले आहे. आयुक्तांनी आता हे सर्व विषय पुढील महासभेत घेण्याचे सांगितले आहे. >नारळ फुटणार तरी कधी?पुढील महिन्यात होणारी महासभा ही शेवटची असल्याने त्या वेळेस किती विषय मंजूर होतात, त्यावर स्वाक्षरी होऊन त्यांचे टेंडर केव्हा निघणार, त्या कामांचे नारळ केव्हा फोडणार, असा पेच आता सर्वपक्षीय नगरसेवकांना सतावू लागला आहे. या मानापमानाच्या नाट्यात हाल मात्र ठाणेकरांचे होतील.