शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

महापौर-आयुक्तांच्या मानापमानात नगरसेवकांचेच धाबे दणाणले!

By admin | Updated: November 19, 2016 03:44 IST

निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने कामांचे नारळ फोडायचे कसे आणि वचननाम्यात कामे दाखवायची कशी, असा पेच नगरसेवकांना पडला

अजित मांडके,

ठाणे - ठाण्याचा प्रथम नागरिक म्हणून विश्वासात न घेता, विषयपत्रिका पटलावर आणलीच कशी, असा सवाल उपस्थित करून प्रशासनाला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना प्रशासनानेच पलटवार करून झालेल्या अपमानाचा बदला घेतला खरा. परंतु, प्रशासन आणि सत्ताधारी, विरोधक यांच्यात रंगलेल्या मानापमानाच्या नाट्यात नगरसेवकांचे नुकसान झाले. पुढील महिन्यात होणारी महासभा शेवटची असेल. त्यानंतर, लागलीच निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने कामांचे नारळ फोडायचे कसे आणि वचननाम्यात कामे दाखवायची कशी, असा पेच नगरसेवकांना पडला आहे.जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागणार आहे. तिची आचारसंहिता डिसेंबरअखेर अथवा जानेवारीच्या पहिल्यादुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यात मागील पाच वर्षांचा अनुभव पाहता निधीचा अभाव, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगलेल्या सत्तेच्या सारीपाटाचा खेळ यामुळे विकासकामे रखडली होती. नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील कामांसाठीदेखील निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही. परंतु, मागील दोन ते तीन महासभांमध्ये प्रभागातील कामांचा समावेश विषयपत्रिकेत होऊ लागल्याने नगरसेवकांना हायसे वाटत होते. परंतु, काही नगरसेवकांच्या प्रभागातील कामांचा नारळच फुटला नसल्याचीही परिस्थिती आहे. त्यामुळे चालू आणि पुढील महिन्यात त्यांच्या प्रभागातील कामांचा समावेश होईल. शुक्रवारच्या महासभेतदेखील रस्ते, गटारे, पायवाटा, उद्यानांची दुरुस्ती, एलईडी पोल, पार्किंग, आरोग्यविषयक आदींसह इतर महत्त्वाच्या प्रस्तावांचा समावेश होता. महासभा सुरू होताच महापौरांनी सचिवांना दिलेल्या पत्रावरून सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात मानापमान नाट्य रंगल्याने आयुक्तांनी थेट सर्वच विषय मागे घेतले. त्यामुळे नारळ वाढवण्याच्या तयारीत असलेल्या अनेक नगरसेवकांची यामुळे घोर निराशा झाली आहे. याचे खापर त्यांनी महापौरांवर फोडले आहे. आयुक्तांनी आता हे सर्व विषय पुढील महासभेत घेण्याचे सांगितले आहे. >नारळ फुटणार तरी कधी?पुढील महिन्यात होणारी महासभा ही शेवटची असल्याने त्या वेळेस किती विषय मंजूर होतात, त्यावर स्वाक्षरी होऊन त्यांचे टेंडर केव्हा निघणार, त्या कामांचे नारळ केव्हा फोडणार, असा पेच आता सर्वपक्षीय नगरसेवकांना सतावू लागला आहे. या मानापमानाच्या नाट्यात हाल मात्र ठाणेकरांचे होतील.