शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

औरंगाबादच्या महापौरपदावर सेनेचा दावा

By admin | Updated: April 28, 2015 01:33 IST

औरंगाबाद महापालिकेत भाजपा अवास्तव मागण्या करीत असल्याने अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करू, असा दावा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला.

मुंबई : औरंगाबाद महापालिकेत भाजपा अवास्तव मागण्या करीत असल्याने अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करू, असा दावा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केला. शिवसेनेकडे सध्या ४५ नगरसेवकांचे संख्याबळ असून, त्या भरवशावर महापौर बसवणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे २९ तर भाजपाचे २३ नगरसेवक विजयी झाले. येथील महापौरपद अडीच वर्षांकरिता भाजपाला देण्यावरून तिढा निर्माण झाला आहे. शिवसेनेने भाजपाला पाच वर्षांकरिता उपमहापौरपद देऊ केले असून, शेवटच्या वर्षी महापौरपद देण्याची तयारी दाखवली आहे. याखेरीज पाच वर्षांपैकी तीन वर्षे स्थायी समितीचे अध्यक्षपद भाजपाला देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र भाजपाला अडीच वर्षे महापौरपद हवे आहे. औरंगाबादमधील अपक्षांना सोबत घेऊन ४५ नगरसेवकांची जमवाजमव केल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले. महापौरपदाकरिता शिवसेना, भाजपा व एमआयएमचे उमेदवार रिंगणात असतील तर मतविभाजनाचा लाभ शिवसेनेला होऊन महापौर निवडला जाईल. च्औरंगाबाद महापालिकेतील तिढा सोडवण्याकरिता पर्यावरणमंत्री रामदास कदम व भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची बैठक झाली. अडीच वर्षांकरिता महापौरपदाची मागणी सोडण्यास भाजपाने नकार दिला तेव्हा कदम यांनी याच न्यायाने राज्याचे मुख्यमंत्रिपदही अडीच वर्षांकरिता शिवसेनेला देण्याची मागणी केल्याचे कळते.च्भाजपाने शिवसेनेला कोणती खाती देऊ केली? महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे का? अशी प्रश्नांची सरबत्ती कदम यांनी दानवे यांच्यावर केल्याचे कळते.