शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

मे महिन्यापर्यंत बेकायदेशीर धार्मिक स्थळे पाडू; राज्य सरकारचे आश्वासन

By admin | Updated: January 20, 2016 02:37 IST

बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासंदर्भात राज्य सरकारने १८ नोव्हेंबर २०१५ रोजी शासन निर्णय काढला.

मुंबई: बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यासंदर्भात राज्य सरकारने १८ नोव्हेंबर २०१५ रोजी शासन निर्णय काढला. मात्र, या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी न केल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. मे महिन्यापर्यंत सर्व बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली नाही, तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. देशातील सर्व धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचा व जुनी धार्मिक स्थळे हलवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २००९ मध्ये सर्व राज्यांना दिले. मात्र, महाराष्ट्रात या आदेशाचे पालन न झाल्याने, ‘सोसायटी फॉर फास्ट जस्टिस’ या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे होती.मंगळवारच्या सुनावणीच्या वेळी खंडपीठाने आत्तापर्यंत किती बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यात आली? अशी विचारणा मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांच्याकडे केली. अ‍ॅड. वग्यानी यांनी या संदर्भातील माहिती बुधवारी देऊ, असे खंडपीठाला सांगितले. खंडपीठाने ही माहिती त्वरित सादर करा, अन्यथा संबंधितांवर न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई करू, अशी समज सरकारला दिली. दुपारच्या सत्रात अ‍ॅड. वग्यानी यांनी कारवाई केल्याची माहिती खंडपीठासमोर सादर केली. सरकारच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण राज्यात सरकारी जमिनीवर ८६२ बेकायदेशीर धार्मिकस्थळे आहेत. त्यापैकी ४१ धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली, तर महापालिकांच्या जागांवर ८८१ बेकायदेशीर धार्मिक स्थळे आहेत आणि त्यापैकी २८ धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) प्रभावी अंमलबजावणी झालीच पाहिजे : ‘दिवाळीत जरी तुम्ही (सरकार) बेकायदेशीर धार्मिकस्थळे पाडण्याचे काम हाती घेतले असले तरी आतापर्यंत १० टक्केही बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाई केली नाहीत,’ अशा शब्दांत खंडपीठाने सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. त्यावर अ‍ॅड. वग्यानी यांनी मे महिन्यापर्यंत सर्व बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करू. तसेच जुन्या धार्मिक स्थळांना स्थलांतरित करू, असे आश्वासन खंडपीठाला दिले.नोव्हेंबर महिन्यातील निर्णय : उच्च न्यायालयाने वारंवार फैलावर घेतल्यानंतर राज्य सरकारने बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटवण्यासंदर्भात १८ नोव्हेंबर २०१५ रोजी शासन निर्णय काढला. या निर्णयानुसार, नोव्हेंबरपासून पुढील सहा महिन्यात राज्यातील सर्व बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येईल, तर जुन्या धार्मिक स्थळांना स्थलांतरित करण्यात येईल. १५ फेब्रुवारी रोजी किती बेकायदेशीर धार्मिक स्थळांवर : कारवाई करण्यात आली, याचा अहवाल आमच्यापुढे सादर करा. यावेळी जर तुम्ही शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी केलेले दिसले नाही, तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे म्हणत खंडपीठाने सरकारला १५ फेब्रुवारी रोजी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आणि १८ फेब्रुवारी रोजी या याचिकेवर पुढील सुनावणी ठेवली.