शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मावळ गोळीबार प्रकरणाची पुन्हा चौकशी - हायकोर्टाचा दणका

By admin | Updated: April 16, 2015 14:59 IST

मावळ गोळीबारात संदीप कर्णिक यांच्या गोळीनेच कांताबाई ठाकर या महिलेचा मृ्त्यू झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केल्यानंतर हायकोर्टाने या घटनेची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १६ - मावळ गोळीबार प्रकरणी पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप कर्णिक गोत्यात येण्याची चिन्हे आहेत.  संदीप कर्णिक यांच्या गोळीनेच कांताबाई ठाकर या महिलेचा मृ्त्यू झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केल्यानंतर हायकोर्टाने या घटनेची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मावळ गोळीबाराप्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली असून गुरुवारी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्ते खंडेलवाल यांनी कोर्टासमोर बॅलेस्टिक अहवाल सादर केला. कांताबाई ठाकर या महिलेचा मृत्यू संदीप कर्णिक यांच्या गोळीनेच झाला होता असे या बॅलेस्टिक अहवालातून समोर आले आहे. याशिवाय कांतीबाई ठाकर या उताराच्या दिशेने धावत गेल्या होत्या व त्यादिशेने संदीप कर्णिक यांनीच गोळीबार केला होता असा आरोप पोलिसांनी केला.  तपासात या अहवालाची दखल का घेतली नाही असा सवाल उपस्थित करत हायकोर्टाने राज्य सरकारला गोळीबार प्रकरणाची पुन्हा चौकशी करुन संदीप कर्णिक यांच्यावर योग्य कारवाई करा असे सुनावले आहे. 
९ ऑगस्ट २०११ रोजी मुंबई पुणे महामार्गावर भारतीय किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी आंदोलन केले होते. पवना धरणातील पाणी पिंपरी चिंचवड महापालिकेला देण्यास शेतक-यांचा विरोध होता. या आंदोलनाला शिवसेना, आरपीआय व भाजपा या पक्षांचाही पाठिंबा होता. आंदोलन करणा-या शेतक-यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात तिघा शेतक-यांचा मृत्यू झाला होता. यामध्ये कांताबाई ठाकर या महिलेचाही समावेश होता. संदीप कर्णिक हे त्यावेळी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक होते.