शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीत तांत्रिक अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 04:42 IST

मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिवाजी विद्यापीठाने एक हजार संगणक आणि ३५० प्राध्यापकांची फौज सज्ज ठेवली.

कोल्हापूर : मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिवाजी विद्यापीठाने एक हजार संगणक आणि ३५० प्राध्यापकांची फौज सज्ज ठेवली. मात्र, मुंबई विद्यापीठाकडून तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी विलंब होत असल्याने शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने तपासणीचे काम सुरू होऊ शकले नाही. शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापूर, सांगली व सातारा येथील उत्तरपत्रिका तपासणी केंद्रांवर दिवसभरात ५०हून अधिक प्राध्यापक उपस्थित होते.मुंबई विद्यापीठाच्या मागणीनुसार कॉमर्स, मॅनेजमेंट आणि लॉ (विधि) अभ्यासक्रमांच्या ३५ हजार आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी करून देण्याबाबत शिवाजी विद्यापीठाने तयारी दर्शविली. त्यानुसार कोल्हापुरातील सायबर इन्स्टिट्यूट, मिरज येथील संजय भोकरे ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट आणि सातारा येथील यशोदा टेक्निकल कॅम्पस या ठिकाणी केंद्रांची सुविधा केली आहे. तपासणीच्या कामासाठी मुंबई विद्यापीठाने पात्र ठरविलेले सुमारे ५०हून अधिक प्राध्यापक सकाळी या केंद्रांवर दाखल झाले. त्यांनी सुरुवातीला नोंदणी केली. मात्र, युझर आणि लॉगीन आयडी उपलब्ध न होणे, ‘ओटीपी’ नोंदविल्यानंतर संगणकावर उत्तरपत्रिका न दिसणे अशा तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे बहुतांश प्राध्यापकांना नुसतेच बसून राहावे लागले. या तांत्रिक अडचणींची माहिती मुंबई विद्यापीठाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.साताºयात दोन तासांत काम गुंडाळलेसातारा जिल्ह्यातील निवडक सात प्राध्यापकांना अवघ्या दोन तासांत तपासणीचे काम गुंडाळावे लागले. यशोदा संस्थेत सुमारे ५०० संगणक, इंटरनेट सेवेसह हॉल सज्ज करण्यात आला होता. दुपारी साडे तीनच्या सुमारास सात प्राध्यापकांनी हजेरी लावली. परंतु सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे येथे उत्तरपत्रिका डाऊनलोड झाल्या नाहीत, अशी माहिती यशोदा टेक्निकलचे रजिस्ट्रार गणेश सुरवसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.‘विद्यापीठाला घेराव घालणार’३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर न झाल्यास काँग्रेसतर्फे मुंबई विद्यापीठाला घेराव घालणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली.मराठवाडा विद्यापीठाचा उत्तरपत्रिका तपासण्यास होकारमुंबई विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने होकार कळवला आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठ विधि-अभ्यासक्रमाच्या ५ हजार उत्तरपत्रिका पाठवल्या आहेत.