शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

मन की बात खूप झाली; आता कर्जमाफीचे बोला- राधाकृष्ण विखे पाटील

By admin | Updated: March 30, 2017 17:31 IST

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 30 - राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. विधिमंडळात कर्जमाफीची मागणी केली म्हणून विरोधी पक्षातील 19 आमदारांना निलंबित करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठविणे हा गुन्हा ठरत असेल तर हा गुन्हा आम्ही यापुढेही करू. भाजपा नेत्यांनी मन की बात बंद करून कर्जमाफीची घोषणा करावी. शेतकरी आणि कष्टकऱ्यांना न्याय मिळावा. यासाठीच संघर्ष यात्रा काढण्यात आल्याचे प्रतिपादन विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुुरुवारी नागपुरात केले.सिंदेवाही ते पनवेल अशी निघालेली संघर्ष यात्रा नागपुरात पोहोचल्यानंतर व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. येथे आयोजित जाहीर सभेत विखे पाटील बोलत होते. आता कोणत्याही निवडणुका नसल्याने राजकीय हेतूने ही संघर्ष यात्रा काढलेली नाही. शेतीमालाला भाव मिळावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी. यासाठी ही संघर्ष यात्रा असल्याचे विखे पाटील म्हणाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात राज्यातील ९ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. सत्तेत नसताना ते कर्जमाफीची मागणी करीत होते. परंतु आज तेच कर्जमाफीची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या आमदारांचे निलंबन करीत आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी कर्जमाफीची मागणी केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही ही मागणी लावून धरली. परंतु सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळावा. यासाठीच संघर्ष यात्रा असल्याचे माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार सुनील केदार, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेंद्र मुळक, आमदार गोपालदास अग्रवाल आदींनी मार्गदर्शन केले. आमदार प्रकाश गजभीये, काँग्रेसचे नेते नाना गावंडे, माजी आमदार दिनानाथ पडोळे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, दुनेश्वर पेठे, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. पीक विम्यातून कर्ज वसुलीमुळे बँकांचा फायदा नाही का?शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर बँकांचाच फायदा होईल, असा दावा करणाऱ्या राज्यातील भाजपा -शिवसेना युती सरकारने जिल्हा बँका आणि उपनिबंधकांना शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीक विम्याच्या रकमेतून त्यांच्या कर्जाची वसुली करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशामुळे बँकांचा फायदा होणार नाही का असा प्रश्न करून कर्जमाफीमुळे बँकांचा फायदा होणार असल्याचा दावा खोटा असल्याची भूमिका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली.