शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

एसटीच्या ७00 फेऱ्यांवर गदा

By admin | Updated: September 14, 2016 06:04 IST

ग्रामीण भाग शहरांशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या एसटी महामंडळाने अजब पवित्रा घेतला आहे.

मुंबई : ग्रामीण भाग शहरांशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या एसटी महामंडळाने अजब पवित्रा घेतला आहे. फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करत असल्याचे कारण देत, चार महिन्यांत लांब पल्ल्याच्या तब्बल ७00 बस फेऱ्यांवर गदा आणली आहे. अनेक आगारांतून सुटणाऱ्या फेऱ्यांवर गदा आल्याने आगारांचे उत्पन्न घटले आहे. परिणामी, आगारातील कर्मचाऱ्यांच्या पगारांपुढेही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रवासी संख्या व उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न केले जात असून, अनेक सोईसुविधा दिल्या जात आहेत. एकीकडे सोईसुविधांचा वर्षाव केला जात असतानाच, दुसरीकडे थेट प्रवासी नसल्याने फेऱ्यांच्या सुसूत्रीकरणाचे कारण पुढे करत, लांब पल्ल्याच्या अनेक फेऱ्या कमी केल्या जात असल्याची बाब समोर आली आहे. एप्रिल ते जून हा गर्दीचा काळ मानला जातो. मे महिन्यापासूनच लांब पल्ल्याच्या फेऱ्या कमी करण्यास एसटी महामंडळाकडून सुरुवात करण्यात आली. मुंबई, ठाणे, भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड, विठ्ठलवाडी, वाडा, सिंधुदुर्ग, धुळे, रत्नागिरी विभाग व आगारांतील बस फेऱ्यांवर तर गदाच आणण्यात आली. जवळपास ५७ ते ७५ टक्के प्रत्येक आगारांतील फेऱ्यांचे भारमान असताना, फेऱ्या कमी करण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांकडूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २0१६ मधील मे ते आॅगस्ट या चार महिन्यांत जवळपास ७00 फेऱ्यांवर गदा आणण्यात आल्याचे एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे काही आगारांचे उत्पन्न कमी होतानाच, तेथील कर्मचाऱ्यांचे पगारही उशिरा होऊ लागले आहेत. धुळे विभागातील दहा आगारांपैकी सहा आगारांत याच कारणांमुळे कर्मचाऱ्यांचे पगार उशिराने झाले. हीच परिस्थती सिंधुदुर्ग व रत्नागिरीत निर्माण झाली. सुसूत्रीकरणाच्या नावाखाली फेऱ्यांवर गदा आणली जात असल्याने, खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना प्राधान्य देण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)