शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
8
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
9
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
12
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
13
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
14
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
15
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
16
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
17
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
18
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
19
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
20
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP

एसटीच्या ७00 फेऱ्यांवर गदा

By admin | Updated: September 14, 2016 06:04 IST

ग्रामीण भाग शहरांशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या एसटी महामंडळाने अजब पवित्रा घेतला आहे.

मुंबई : ग्रामीण भाग शहरांशी जोडण्याचे उद्दिष्ट ठेवणाऱ्या एसटी महामंडळाने अजब पवित्रा घेतला आहे. फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करत असल्याचे कारण देत, चार महिन्यांत लांब पल्ल्याच्या तब्बल ७00 बस फेऱ्यांवर गदा आणली आहे. अनेक आगारांतून सुटणाऱ्या फेऱ्यांवर गदा आल्याने आगारांचे उत्पन्न घटले आहे. परिणामी, आगारातील कर्मचाऱ्यांच्या पगारांपुढेही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.प्रवासी संख्या व उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न केले जात असून, अनेक सोईसुविधा दिल्या जात आहेत. एकीकडे सोईसुविधांचा वर्षाव केला जात असतानाच, दुसरीकडे थेट प्रवासी नसल्याने फेऱ्यांच्या सुसूत्रीकरणाचे कारण पुढे करत, लांब पल्ल्याच्या अनेक फेऱ्या कमी केल्या जात असल्याची बाब समोर आली आहे. एप्रिल ते जून हा गर्दीचा काळ मानला जातो. मे महिन्यापासूनच लांब पल्ल्याच्या फेऱ्या कमी करण्यास एसटी महामंडळाकडून सुरुवात करण्यात आली. मुंबई, ठाणे, भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड, विठ्ठलवाडी, वाडा, सिंधुदुर्ग, धुळे, रत्नागिरी विभाग व आगारांतील बस फेऱ्यांवर तर गदाच आणण्यात आली. जवळपास ५७ ते ७५ टक्के प्रत्येक आगारांतील फेऱ्यांचे भारमान असताना, फेऱ्या कमी करण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांकडूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. २0१६ मधील मे ते आॅगस्ट या चार महिन्यांत जवळपास ७00 फेऱ्यांवर गदा आणण्यात आल्याचे एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे काही आगारांचे उत्पन्न कमी होतानाच, तेथील कर्मचाऱ्यांचे पगारही उशिरा होऊ लागले आहेत. धुळे विभागातील दहा आगारांपैकी सहा आगारांत याच कारणांमुळे कर्मचाऱ्यांचे पगार उशिराने झाले. हीच परिस्थती सिंधुदुर्ग व रत्नागिरीत निर्माण झाली. सुसूत्रीकरणाच्या नावाखाली फेऱ्यांवर गदा आणली जात असल्याने, खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना प्राधान्य देण्याचा तर हा प्रयत्न नाही ना, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)