शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

मातृतीर्थ जिल्ह्यात ‘बेटी बचाओ’ अभियानाला नख

By admin | Updated: November 14, 2016 23:07 IST

राष्ट्रीय जिजाऊं मॉ साहेबांच्या जन्माने पावन झालेल्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातच जिजाऊंच्या लेकींना जन्म घेण्यापूर्वीचमारून टाकण्यात येत असल्याचे भिषण वास्तव समोर आले आहे.

सुधीर चेके पाटील
चिखली, दि. 14 : राष्ट्रीय जिजाऊं मॉ साहेबांच्या जन्माने पावन झालेल्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातच जिजाऊंच्या लेकींना जन्म घेण्यापूर्वीचमारून टाकण्यात येत असल्याचे भिषण वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील एकूण १२३ गावांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर ७० टक्यांऐवढा असल्याची गंभीर बाब निदर्शनास आली आहे.
 जिल्ह्यातील १२३ गावांमधील ३९ गावे एकट्या चिखली तालुक्यातील असून मातृशक्तीचा उदोउदो करणाºया समस्त जिल्ह्यासाठी ही बाब अत्यंत लांछनास्पद आहे. तथापी स्त्री जन्मदर वाढावा यासाठी शासनाव्दारे राबविण्यात येणाºया
विविध योजना देखील जिल्ह्यात यशस्वीपणे राबविल्या जात नसल्याचे यातून निष्पन्न होत असून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ची व्याप्ती वाढविणे नितांत गरजेचे आहे.
 
स्त्रीभ्रूण हत्या हे फार मोठे पाप आहे. ही मानिसकता थांबविण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. मुली, माता आणि भगिणींचे रक्षण व्हायलाच हवे. यात धर्माचा विचार व्हायलाच नको, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुंदेलखंड प्रांतातील महोबा येथे विशाल महापरिवर्तन रॅलीला संबोधित करताना सांगितले आहे. समाजातील स्त्रीभ्रूण हत्येच्या मानिसकतेवरही
त्यांनी सडकून टीका केली होती. तर स्त्रीभृण हत्या रोखण्यासाठी तसेच कोणत्याही वर्गातील पालकाला मुलीचे ओझे वाटू नये यासाठी मुलगीच हीच वंशाचा दिवा आहे हे बिबंवून देत मुलींच्या कल्याणार्थ अनेक योजना सरकारने हाती घेतल्या आहेत. मात्र, या योजनाअंतर्गत करावयाची कामे, उपाय-योजना तसेच व्यापक जनजागृती केवळ कागदावर होत असल्याचे चित्र सबंध जिल्ह्यात आजघडीला दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच ‘ ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून बेटी बचाओ, बेटी पढाओ  या अभियानाकडे पाहिल जातं.
 
२२ जानेवारी २०१५ पासून या अभियानाला सुरूवात झाली आहे. मात्र, जिल्ह्यात या अभियानाची एैशीतैशी होवून हे अभियान केवळ ‘सरकारी काम’ बनून राहिल्याने माँ जिजाऊंच्या जन्मभूमीत त्यांच्या लेकींना गर्भातच नख लावून मारल्या
जात आहे. परिणामी जिल्ह्यातील १२३ गावांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या ३० टक्याने कमी आहे. या १२३ गावांपैकी ३९ गावे एकट्या चिखली तालुक्यातील आहेत.
 
मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या समतोल राहावी यासाठी २२ जानेवारी २०१५ पासून राबविण्यात येत असलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाच्या काळातीलच ही आकडेवारी असून चिखली तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य
केंद्रातील किन्होळा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सातगाव भुसारी, सोनेवाडी, हातणी, सवणा, तांबुळवाडी, अंत्रीकोळी आणि गोद्री या ७ गावांमध्ये सन २०१४-१५ मध्ये १२४ मुलांमागे ११५ मुलींची संख्या होती तर सन २०१५-१६ मध्ये आतापर्यंत १५१ मुलांमागे १०८ मुलींची संख्या आहे.
 
 
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाकडे केवळ घोषणा व सरकारी काम यादृष्टीने पाहल्या जात असल्याचे चित्र आहे. वास्तविक पाहता या संदर्भातली जनजागृती करण हे केवळ सरकारी काम नसून त्याला विविध पक्ष, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था यांची जोड आवश्यक असल्याने जिल्हाभरातील सर्व स्वयंसेवी संस्था, संघटना, मित्रमंडळे, पक्ष-संघटनांही
स्वत:हून पुढाकार घेणे गरजेचे आहे.