शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कामगार, व्यापाऱ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: May 24, 2016 02:08 IST

फळे, भाजीपाला, कांदा व बटाटा बाजार समितीमधून वगळण्याचे सूतोवाच राज्य शासनाने करताच बाजार समित्यांमधील कामगार व व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

नवी मुंबई : फळे, भाजीपाला, कांदा व बटाटा बाजार समितीमधून वगळण्याचे सूतोवाच राज्य शासनाने करताच बाजार समित्यांमधील कामगार व व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये मंगळवारी विशेष बैठक होणार असून, २५ मेपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. राज्य शासन बाजार समितीमधून भाजीपाला व फळे वगळण्याची अधिसुचना लवकरच काढणार असल्याचे समजताच मुंबई बाजार समितीमध्ये खळबळ उडाली आहे. ३० हजारपेक्षा जास्त मापाडी कामगार, १५हजारपेक्षा जास्त रोजंदारी कामगार, व्यापारी, त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी मिळून एक लाखपेक्षा जास्त नागरिकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. साखर, डाळी व इतर वस्तू यापूर्वीच बाजार समितीमधून वगळल्या आहेत. आता भाजीपाला व फळे वगळली तर मुंबई बाजार समिती बंद होवून माथाडी कामगार बेरोजगार होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून बाजार समितीच्या विरोधी भूमिका घेतली जात आहे. यापूर्वीही त्यांनी अशाप्रकारचे सूतोवाच केले होते. परंतु कामगारांनी आंदोलन केल्यानंतर माघार घेतली होती. आता पुन्हा बाजार समितीमधून वगळण्याची भूमिका घेतली जात असून त्याला तीव्र विरोध करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. बाजार समितीमधील व्यापारी व कामगार प्रतिनिधींची बैठक मंगळवारी माथाडी भवनमध्ये होणार आहे. या बैठकीमध्ये आंदोलनाचे स्वरूप निश्चित केले जाणार आहे. राज्यातील सर्वच बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार असल्याने राज्यव्यापी आंदोलन उभे केले जाणार आहे. २५ मे रोजी मुंबई बाजार समिती बंद ठेवून जाहीर मेळावा होणार असून त्यामध्ये आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. भाजपा सरकार सातत्याने बाजार समिती व कामगारांच्या विरोधात भूमिका घेत आहे. माथाडी कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून शासनाच्या विरोधात रोडवर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल. - नरेंद्र पाटील, सरचिटणीस, माथाडी संघटना