शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

माथाडी कामगार, व्यापाऱ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: May 24, 2016 02:08 IST

फळे, भाजीपाला, कांदा व बटाटा बाजार समितीमधून वगळण्याचे सूतोवाच राज्य शासनाने करताच बाजार समित्यांमधील कामगार व व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

नवी मुंबई : फळे, भाजीपाला, कांदा व बटाटा बाजार समितीमधून वगळण्याचे सूतोवाच राज्य शासनाने करताच बाजार समित्यांमधील कामगार व व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये मंगळवारी विशेष बैठक होणार असून, २५ मेपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. राज्य शासन बाजार समितीमधून भाजीपाला व फळे वगळण्याची अधिसुचना लवकरच काढणार असल्याचे समजताच मुंबई बाजार समितीमध्ये खळबळ उडाली आहे. ३० हजारपेक्षा जास्त मापाडी कामगार, १५हजारपेक्षा जास्त रोजंदारी कामगार, व्यापारी, त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी मिळून एक लाखपेक्षा जास्त नागरिकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला आहे. साखर, डाळी व इतर वस्तू यापूर्वीच बाजार समितीमधून वगळल्या आहेत. आता भाजीपाला व फळे वगळली तर मुंबई बाजार समिती बंद होवून माथाडी कामगार बेरोजगार होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून बाजार समितीच्या विरोधी भूमिका घेतली जात आहे. यापूर्वीही त्यांनी अशाप्रकारचे सूतोवाच केले होते. परंतु कामगारांनी आंदोलन केल्यानंतर माघार घेतली होती. आता पुन्हा बाजार समितीमधून वगळण्याची भूमिका घेतली जात असून त्याला तीव्र विरोध करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे. बाजार समितीमधील व्यापारी व कामगार प्रतिनिधींची बैठक मंगळवारी माथाडी भवनमध्ये होणार आहे. या बैठकीमध्ये आंदोलनाचे स्वरूप निश्चित केले जाणार आहे. राज्यातील सर्वच बाजार समित्यांचे अस्तित्व संपणार असल्याने राज्यव्यापी आंदोलन उभे केले जाणार आहे. २५ मे रोजी मुंबई बाजार समिती बंद ठेवून जाहीर मेळावा होणार असून त्यामध्ये आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी दिली आहे. भाजपा सरकार सातत्याने बाजार समिती व कामगारांच्या विरोधात भूमिका घेत आहे. माथाडी कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून शासनाच्या विरोधात रोडवर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल. - नरेंद्र पाटील, सरचिटणीस, माथाडी संघटना