शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारने तिजोरी उघडली
3
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
4
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
5
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
6
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
7
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
8
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
9
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
10
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
11
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
12
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
13
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
14
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
16
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
17
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
18
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
19
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
20
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर

पणन कायद्याविरोधात माथाडी एकवटले

By admin | Updated: January 13, 2016 01:23 IST

पणन विभागाने फळे आणि कांदा-बटाटा बाजार समितीच्या नियंत्रणातून मुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात माथाडी कामगार एकवटले आहेत. माथाडी कामगारांना उद्ध्वस्त कराल तर हे सरकार

नवी मुंबई : पणन विभागाने फळे आणि कांदा-बटाटा बाजार समितीच्या नियंत्रणातून मुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात माथाडी कामगार एकवटले आहेत. माथाडी कामगारांना उद्ध्वस्त कराल तर हे सरकार उद्ध्वस्त करण्यास कामगार व व्यापाऱ्यांना वेळ लागणार नाही, असा इशारा माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी येथे दिला.नवी मुंबई बाजार समितीच्या सभागृहात मंगळवारी निषेध सभेत झाली. पाचही मार्केटमधील बाजारपेठा बंद ठेवून माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात असंतोष व्यक्त केला. पणन विभागाने फळे आणि कांदा-बटाटाही एपीएमसीच्या मक्तेदारीतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करून शेतकऱ्याला देशाच्या कोणत्याही भागात जाऊन कृषी माल विकण्याची मुभा मुक्त अर्थव्यवस्थेत देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी ते ग्राहक अशी शेतमालाची थेट विक्री होईल, शेतीमालाला चांगला भाव मिळेल व त्यांचा फायदा शेतकऱ्याला होईल, असे केंद्र व राज्य सरकारचे म्हणणे असल्याचे फ्रूट मार्केट असोसिशनचे अध्यक्ष बाळासाहेब भेंडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हितासाठीच बाजार समितीचा कायदा केलाअसून शेतकऱ्यांना संरक्षण हाचया कायद्याचा मुख्य उद्देशअसल्याचे भेंडे यांनी सांगितले.वेळ आली तर नाकाबंदी करू,असेही भेंडे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)दिल्लीवरून आखला जातोय डाव१९६३ साली बाजार समितीचा कायदा अस्तित्वास आला, त्यानंतर १९८६ साली त्यास मान्यता मिळाली. शासनाचा १९९६ साली लिखित करार झाला. त्यानंतर दिल्लीवरून हा नवा डाव आखून शेतकऱ्यांचा माल थेट बाजारात विकण्याचे नवे धोरण लादण्याचा प्रयत्न शासन करत असल्याचे द फ्रूट अ‍ॅण्ड व्हेजिटेबल मर्चंटचे अध्यक्ष संजय पानसरे यांनी सांगितले.माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यास शरद पवार यांनी कायम अग्रक्रम दिला आहे. नवे सरकार व्यापारी व कामगारांना विश्वासात न घेता परस्पर बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. शासनाचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. राज्य सरकार जोपर्यंत धोरणात्मक निर्णय घेणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील. - नरेंद्र पाटील, आमदार