शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व विदर्भात वाढले माता मृत्यूचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2017 04:04 IST

माता मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्याचा आरोग्य विभाग प्रयत्नशील असला तरी त्याला अद्याप पुरेसे यश आलेले

सुमेध वाघमारे / नागपूरमाता मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्याचा आरोग्य विभाग प्रयत्नशील असला तरी त्याला अद्याप पुरेसे यश आलेले दिसून येत नाही. विशेषत: नागपूर विभागातील सहा जिल्हे मिळून २०११-१२मध्ये माता मृत्यूची संख्या २३९ होती, ती २०१५-१६ मध्ये २५६वर गेली आहे. यात वर्धा व नागपूर जिल्ह्यात प्रमाण जास्त असल्याचे वास्तव आहे.हलगर्जीपणासोबतच गंभीर रक्तस्राव, संसर्ग, इजा, अ‍ॅनिमिया, वाढलेला रक्तदाब आणि मुलाच्या जन्माच्या वेळी झालेली दुखापत यामुळे प्रसूतीच्या वेळी मातांचे मृत्यू होत आहेत, हे कटु सत्य नाकारता येत नाही. सशक्त पिढी निर्माणासाठी आई सशक्त होणे, ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.सर्वात कमी  मृत्युदर गुजरातमध्ये इतर राज्याच्या तुलनेत सर्वात कमी माता मृत्युदर गुजरातमध्ये आहे. केंद्राची ‘चिरंजीवी’ योजना येथे प्रभावीपणे राबविली जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, यात राज्य सरकारनेही मदत केली आहे. डॉक्टरला एका रुग्णामागे ३ हजार ८०० रुपयांची मदत मिळते. यात रुग्णांच्या पोषणापासून ते त्याच्या औषधांचा खर्च संबंधित डॉक्टरमार्फतच केला जातो. यामुळे रुग्णांना योग्य उपचारही मिळतो. याशिवाय ग्रामीण भागात इस्पितळ उघडण्यास पाच लाख रुपयांचे अनुदानही दिले जाते. विशेष म्हणजे आठ मिनिटांच्या आत दारासमोर उभी असणारी रुग्णवाहिका ही जमेची बाजू आहे.माता मृत्यू रोखण्यासाठी ‘डेथ आॅडिट’ आवश्यकमहाराष्ट्रात प्रसूत होणाऱ्या एक लाख महिलांपैकी १०६ माता दगावतात. तामिळनाडूमध्ये हे प्रमाण ९७ तर केरळमध्ये ८१ आहे. केरळचा ‘पॅटर्न’ आपल्याकडे लागू करायचा असेल तर आरोग्यासाठी स्वतंत्र केडर निर्माण होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, याचे ‘डेथ आॅडिट’ होऊन व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करणे महत्त्वाचे आहे. असे झाल्यास तरच जास्तीत जास्त मातांचे प्राण वाचविले जाऊ शकतील. - डॉ. नोझेर शेरियार, स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ.