शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

पूर्व विदर्भात वाढले माता मृत्यूचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2017 04:04 IST

माता मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्याचा आरोग्य विभाग प्रयत्नशील असला तरी त्याला अद्याप पुरेसे यश आलेले

सुमेध वाघमारे / नागपूरमाता मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी राज्याचा आरोग्य विभाग प्रयत्नशील असला तरी त्याला अद्याप पुरेसे यश आलेले दिसून येत नाही. विशेषत: नागपूर विभागातील सहा जिल्हे मिळून २०११-१२मध्ये माता मृत्यूची संख्या २३९ होती, ती २०१५-१६ मध्ये २५६वर गेली आहे. यात वर्धा व नागपूर जिल्ह्यात प्रमाण जास्त असल्याचे वास्तव आहे.हलगर्जीपणासोबतच गंभीर रक्तस्राव, संसर्ग, इजा, अ‍ॅनिमिया, वाढलेला रक्तदाब आणि मुलाच्या जन्माच्या वेळी झालेली दुखापत यामुळे प्रसूतीच्या वेळी मातांचे मृत्यू होत आहेत, हे कटु सत्य नाकारता येत नाही. सशक्त पिढी निर्माणासाठी आई सशक्त होणे, ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.सर्वात कमी  मृत्युदर गुजरातमध्ये इतर राज्याच्या तुलनेत सर्वात कमी माता मृत्युदर गुजरातमध्ये आहे. केंद्राची ‘चिरंजीवी’ योजना येथे प्रभावीपणे राबविली जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, यात राज्य सरकारनेही मदत केली आहे. डॉक्टरला एका रुग्णामागे ३ हजार ८०० रुपयांची मदत मिळते. यात रुग्णांच्या पोषणापासून ते त्याच्या औषधांचा खर्च संबंधित डॉक्टरमार्फतच केला जातो. यामुळे रुग्णांना योग्य उपचारही मिळतो. याशिवाय ग्रामीण भागात इस्पितळ उघडण्यास पाच लाख रुपयांचे अनुदानही दिले जाते. विशेष म्हणजे आठ मिनिटांच्या आत दारासमोर उभी असणारी रुग्णवाहिका ही जमेची बाजू आहे.माता मृत्यू रोखण्यासाठी ‘डेथ आॅडिट’ आवश्यकमहाराष्ट्रात प्रसूत होणाऱ्या एक लाख महिलांपैकी १०६ माता दगावतात. तामिळनाडूमध्ये हे प्रमाण ९७ तर केरळमध्ये ८१ आहे. केरळचा ‘पॅटर्न’ आपल्याकडे लागू करायचा असेल तर आरोग्यासाठी स्वतंत्र केडर निर्माण होणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, याचे ‘डेथ आॅडिट’ होऊन व्यवस्थेतल्या त्रुटी दूर करणे महत्त्वाचे आहे. असे झाल्यास तरच जास्तीत जास्त मातांचे प्राण वाचविले जाऊ शकतील. - डॉ. नोझेर शेरियार, स्त्रीरोग प्रसूती तज्ज्ञ.