शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
4
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
5
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
6
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
7
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
8
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
9
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
10
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
11
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
12
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
13
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
14
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
15
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
16
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
17
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
18
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
19
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
20
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल

मुंबईकरांचा दुहेरी वातावरणाशी सामना

By admin | Updated: February 2, 2015 04:55 IST

उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग कमी-अधिक होत असतानाच मुंबईच्या वातावरणात उल्लेखनीय बदल होत आहेत

मुंबई : उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग कमी-अधिक होत असतानाच मुंबईच्या वातावरणात उल्लेखनीय बदल होत आहेत. वातावरणातील बदलामुळे मुंबईत दिवसा ऊन तर, रात्री सुटणाऱ्या गार वाऱ्यामुळे बोचरी थंडी पडत आहे. अशा दुहेरी वातावरणाचा मुंबईकरांना सध्या सामना करावा लागत आहे.राज्यात थंड लाटेचा काहीसा प्रभाव असल्याने मागील २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट होती तर उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. राज्यात पुढील २४ तासांत दिवसा आणि रात्रीच्या किमान तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दुसरीकडे विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंद झाले आहे.मुंबईत दोन दिवसांपासून कमाल व किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येऊ लागली आहे. कमाल तापमान ३३ तर, किमान २१ अंशावर पोहोचले आहे. तत्पूर्वी मुंबईचे कमाल तापमान २७ व किमान तापमान १५ अंश एवढे नोंद होत होते. परंतु तीन ते चार दिवसांत झालेल्या वातावरणातील बदलांमुळे दिवसा व रात्रीच्या हवेतील फरकामुळे मुंबईकरांना दुहेरी वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. पुढील ४८ तासांत मुंबईत असेच हवामान कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)