शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

लग्न करताय?... थांबा! प्रिमॅरिटल काउन्सेलिंग जरूर करा!

By admin | Updated: March 14, 2016 01:29 IST

दोघांनी एकमेकांना पसंत केलं... दोघांनाही आपण ‘मेड फॉर इच अदर’ असल्यासारखं फिलिंग आलं... बघता बघता साखरपुडाही झाला... आणि अचानक दोघांना एकमेकांमध्ये काहीतरी हरवल्यासारखं

नम्रता फडणीस/सायली जोशी, पुणेदोघांनी एकमेकांना पसंत केलं... दोघांनाही आपण ‘मेड फॉर इच अदर’ असल्यासारखं फिलिंग आलं... बघता बघता साखरपुडाही झाला... आणि अचानक दोघांना एकमेकांमध्ये काहीतरी हरवल्यासारखं जाणवायला लागलं... आपण थोडं थांबून जरा विचार करू या... लग्नाची घाई नको करायला, असं दोघांनीही वाटलं... आणि दोघांचं लग्न तुटलं... हे काहीसं प्रातिनिधिक उदाहरण असलं तरी आज अनेक जोडपी आहेत; ज्यांची साखरपुडा झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर आणि अगदी एक किंवा दोन मुले झाल्यावरही आपण राहू शकत नाही अशी भावना मनात आल्यामुळे लग्नाचे बंध तुटले आहेत. मात्र वेळ निघून गेल्याचे जाणवते.समाजात हे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. दोघांना असे का वाटले? जोडीदारामध्ये त्या नक्की काय शोधत आहेत, एकमेकांकडून त्यांच्या अपेक्षा कोणत्या आहेत? का फक्त शारीरिक आकर्षण आहे? या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्नच जोडप्यांकडून केला जात नाही. त्यामुळे समाजात लग्न तुटणे, घटस्फोट होणे यांसारख्या माध्यमातून नाती दुरावत असल्याचे आपल्यासमोर येते. परंतु या नवरा-बायकोच्या नात्यांचा प्रवास समजावून घेण्यासाठी ‘प्रिमॅरेटिअल काउन्सेलिंग’ होणे आवश्यक असल्याचे समुपदेशकांचे म्हणणे आहे. लग्न म्हणजे खेळ नसतो, तो दोन जिवांचा मेळ असतो. दुकानामधून एखादी गोष्ट विकत घेण्यापूर्वी आपण किती बारीकसारीक गोष्टींचा विचार करतो, मग प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आनंदी क्षण ठरणाऱ्या लग्नाबद्दल जोडप्यांकडून एकमेकांचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, स्त्री-पुरुष म्हणून एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा यांचा का विचार केला जात नाही? तो केला असता तर लग्न तुटणे, घटस्फोटासारख्या परिणामांना सामोरे जाण्याची वेळ आलीच नसती. आज कितीतरी जोडपी अशी आहेत, ज्यांना निवडलेल्या जोडीदाराबरोबर लग्न करण्याचा पश्चाताप होत आहे. विसंवादामुळे कितीतरी जोडप्यांची लग्ने मूल झाल्यावरही संपुष्टात आली असल्याचे दिसते. परंतु, ही वेळ येऊच नये यासाठी जोडप्यांचे ‘प्रिमॅरेटिअल काउन्सेलिंग’ होणे ही काळाची गरज बनली आहे. लग्नापूर्वी समुपदेशन करणारे समुपदेशकच याची समाजातील आवश्यकता अधोरेखित करतात. काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ‘प्रिमॅरेटिअल काउन्सेलिंग’चे अभ्यासक्रमही राबविले जात आहेत, हे त्यातील विशेष!> प्रिमॅरेटिअल काउन्सेलिंगचे अनेक फायदेस्त्री व पुरुष किंवा व्यक्तिमत्त्व म्हणजे काय, हे कळते.नवरा कसा आहे - आक्रमक की मृदू? अथवा बायको कशी आहे हळवी की रोमॅन्टिक? त्या दोघांच्या स्वभावाचे गुणधर्म काय, हे समजायला मदत होते.तिच्या किंवा त्याच्या कोणत्या स्वभावाशी मी तडजोड करू शकतो? हे आधीच ठरवता येऊ शकते.लग्नानंतर वादाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता निर्माण होते. विवाहसंस्था टिकण्यास हातभार लागू शकतो. > प्रिमँरेटिअल काउन्सिलिंगची गरज का? लग्न या संकल्पनेबाबत योग्य ते ज्ञान मिळावेनातेसंबंधांबाबत पुरेसे मार्गदर्शन व्हावेसहनशक्ती आणि एकमेकांबद्दल आदर निर्माण व्हावाभविष्यात आपल्याला काही तडजोडी करायच्या आहेत याची जाणीव व्हावीएकमेकांची कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती समजावीस्वभाव समजून घेऊन त्यानुसार कृतिशीलतेकडे पाऊल पडावेभविष्यात आपल्यापुढे असणारी कौटुंबिक आव्हाने अवगत व्हावीत