शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
5
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
6
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
7
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
8
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
9
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
10
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
11
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
12
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
13
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
14
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
15
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
16
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
17
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
18
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
19
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
20
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा

लग्न करताय?... थांबा! प्रिमॅरिटल काउन्सेलिंग जरूर करा!

By admin | Updated: March 14, 2016 01:29 IST

दोघांनी एकमेकांना पसंत केलं... दोघांनाही आपण ‘मेड फॉर इच अदर’ असल्यासारखं फिलिंग आलं... बघता बघता साखरपुडाही झाला... आणि अचानक दोघांना एकमेकांमध्ये काहीतरी हरवल्यासारखं

नम्रता फडणीस/सायली जोशी, पुणेदोघांनी एकमेकांना पसंत केलं... दोघांनाही आपण ‘मेड फॉर इच अदर’ असल्यासारखं फिलिंग आलं... बघता बघता साखरपुडाही झाला... आणि अचानक दोघांना एकमेकांमध्ये काहीतरी हरवल्यासारखं जाणवायला लागलं... आपण थोडं थांबून जरा विचार करू या... लग्नाची घाई नको करायला, असं दोघांनीही वाटलं... आणि दोघांचं लग्न तुटलं... हे काहीसं प्रातिनिधिक उदाहरण असलं तरी आज अनेक जोडपी आहेत; ज्यांची साखरपुडा झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर आणि अगदी एक किंवा दोन मुले झाल्यावरही आपण राहू शकत नाही अशी भावना मनात आल्यामुळे लग्नाचे बंध तुटले आहेत. मात्र वेळ निघून गेल्याचे जाणवते.समाजात हे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. दोघांना असे का वाटले? जोडीदारामध्ये त्या नक्की काय शोधत आहेत, एकमेकांकडून त्यांच्या अपेक्षा कोणत्या आहेत? का फक्त शारीरिक आकर्षण आहे? या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्नच जोडप्यांकडून केला जात नाही. त्यामुळे समाजात लग्न तुटणे, घटस्फोट होणे यांसारख्या माध्यमातून नाती दुरावत असल्याचे आपल्यासमोर येते. परंतु या नवरा-बायकोच्या नात्यांचा प्रवास समजावून घेण्यासाठी ‘प्रिमॅरेटिअल काउन्सेलिंग’ होणे आवश्यक असल्याचे समुपदेशकांचे म्हणणे आहे. लग्न म्हणजे खेळ नसतो, तो दोन जिवांचा मेळ असतो. दुकानामधून एखादी गोष्ट विकत घेण्यापूर्वी आपण किती बारीकसारीक गोष्टींचा विचार करतो, मग प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आनंदी क्षण ठरणाऱ्या लग्नाबद्दल जोडप्यांकडून एकमेकांचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, स्त्री-पुरुष म्हणून एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा यांचा का विचार केला जात नाही? तो केला असता तर लग्न तुटणे, घटस्फोटासारख्या परिणामांना सामोरे जाण्याची वेळ आलीच नसती. आज कितीतरी जोडपी अशी आहेत, ज्यांना निवडलेल्या जोडीदाराबरोबर लग्न करण्याचा पश्चाताप होत आहे. विसंवादामुळे कितीतरी जोडप्यांची लग्ने मूल झाल्यावरही संपुष्टात आली असल्याचे दिसते. परंतु, ही वेळ येऊच नये यासाठी जोडप्यांचे ‘प्रिमॅरेटिअल काउन्सेलिंग’ होणे ही काळाची गरज बनली आहे. लग्नापूर्वी समुपदेशन करणारे समुपदेशकच याची समाजातील आवश्यकता अधोरेखित करतात. काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ‘प्रिमॅरेटिअल काउन्सेलिंग’चे अभ्यासक्रमही राबविले जात आहेत, हे त्यातील विशेष!> प्रिमॅरेटिअल काउन्सेलिंगचे अनेक फायदेस्त्री व पुरुष किंवा व्यक्तिमत्त्व म्हणजे काय, हे कळते.नवरा कसा आहे - आक्रमक की मृदू? अथवा बायको कशी आहे हळवी की रोमॅन्टिक? त्या दोघांच्या स्वभावाचे गुणधर्म काय, हे समजायला मदत होते.तिच्या किंवा त्याच्या कोणत्या स्वभावाशी मी तडजोड करू शकतो? हे आधीच ठरवता येऊ शकते.लग्नानंतर वादाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता निर्माण होते. विवाहसंस्था टिकण्यास हातभार लागू शकतो. > प्रिमँरेटिअल काउन्सिलिंगची गरज का? लग्न या संकल्पनेबाबत योग्य ते ज्ञान मिळावेनातेसंबंधांबाबत पुरेसे मार्गदर्शन व्हावेसहनशक्ती आणि एकमेकांबद्दल आदर निर्माण व्हावाभविष्यात आपल्याला काही तडजोडी करायच्या आहेत याची जाणीव व्हावीएकमेकांची कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती समजावीस्वभाव समजून घेऊन त्यानुसार कृतिशीलतेकडे पाऊल पडावेभविष्यात आपल्यापुढे असणारी कौटुंबिक आव्हाने अवगत व्हावीत