शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
5
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
6
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
7
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
8
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
9
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
10
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
11
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
12
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
13
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
14
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
15
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
16
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
17
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
18
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
19
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
20
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग

एका दादल्याचे दोघींशी लग्न ?

By admin | Updated: October 13, 2016 20:30 IST

सात दिवसांपुर्वीच प्रेमप्रकरण असलेल्या मुलीशी वैदिक पद्धतीने सत्यप्रतीज्ञालेख लिहून लग्न करून पुन्हा घरच्यांच्या संमतीने दुसरे लग्न करणाऱ्या त्या नवरोबा विरोधात पहिल्या

ऑनलाइन लोकमतटिटवाळा, दि. 13 - सात दिवसांपुर्वीच प्रेमप्रकरण असलेल्या मुलीशी वैदिक पद्धतीने सत्यप्रतीज्ञालेख लिहून लग्न करून पुन्हा घरच्यांच्या संमतीने दुसरे लग्न करणाऱ्या त्या नवरोबा विरोधात पहिल्या पत्नीने पोलिसात रितसर तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन १२ दिवसांचा कालावधी उलटला तरी आरोपींना अटक करण्यात न आल्याने पोलिसांच्या तपासावरही तक्रारदार मुलीच्या वडिलांनी संशय व्यक्त केला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, टिटवाळ्यात इंदिरानगर येथील मराठी शाळेजवळ राहणाऱ्या दामिनी जोशी (१९) हिचे लग्न २७ एप्रिल २०१६ रोजी मुरबाडमध्ये राहणाऱ्या तेजस व्यापारी (२५) याच्याशी समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे झाले. मात्र एक दिड महिन्यानंतर तेजस व्यापारी हा सुवर्णा चन्ने नामक तरूणीबरोबर फिरायला गेला. याबाबत त्याची दुसरी पत्नी दामिनी हिने तेजसकडे विचारणा केली असता त्याने सुवर्ण चन्ने या मुलीबरोबर २० एप्रिल रोजीच पहिले लग्न झालेले असल्याचे सांगितले. तसेच याबाबत सत्यप्रतिज्ञापत्र देखिल केल्याचे सांगितले. मात्र याचा जाब विचारणाऱ्या दामिनीला तिचा नवरा तेजस, सासू वर्षा, सासरा वसंत, तसेच चुलत दिर कल्पेश यांनी तिला शिवीगाळ करत मारझोड केली. हे सर्व सहन न झाल्याने दामिनीने सदरचा प्रकार आपल्या आई-वडिलांच्या कानावर घातला. १५ ऑगस्ट रोजी त्यामुळे आणखी चिडून दामिनीला लग्नात दिलेले दागिने काढून घेऊन माहेरी हाकलून दिले. या बाबत दामिनीच्या वडिलांनी महिला व बाल विकास विभागाच्या टिटवाळ्यातील महिला समुपदेशन केंद्रात तक्रार दाखल केली. शिवाय हिंदू लोहार समाज महासंघात निवदेन देऊन सदरच्या समस्येवर काही तोडगा निघतो का, याचा प्रयत्न केला. मात्र हिंदू लोहार समाजाच्या बैठकीला दामिनीचे सासरे वसंत व्यापारी हे अनुपस्थित राहिल्याने त्यांची ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून असलेली नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अण्णासाहेब जोशी यांनी रद्द करून एक रूपया दंड ठोठावला. तसेच दामिनीची आपसात संगनमत करून फसवणूक-ठकवणुक करून स्त्रीधनाचा अपहार, तसेच आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय समाज संघाने घेतला. त्यानुसार दामिनी हिने तिचा नवरा, सासू, सासरा व दिराच्या विरोधात तालुका अर्थात टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस हवालदार कोर यांच्याकडे विचारणा केली असता गुन्हा दाखल होऊन दहा-बारा दिवस झालेले असून आपण पंचनामा व तत्सम कामासाठी आरोपीच्या घरी गेलो होतो. मात्र आरोपी मिळून आलेले नाही. तर या बाबत पोलीस निरीक्षक व्यंकटराव आंधळे यांनी सांगितले की, सदरचा तपास हा पोलीस हवालदार कोर यांच्याकडे असून गुन्हा पोलीस ठाण्यात नोंद केला आहे. यातील सर्व आरोपींना अटक करण्याचे आदेश हवालदार कोर यांना दिलेले आहेत. संबधित फिर्यादी मुलीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले.