शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

एका दादल्याचे दोघींशी लग्न ?

By admin | Updated: October 13, 2016 20:30 IST

सात दिवसांपुर्वीच प्रेमप्रकरण असलेल्या मुलीशी वैदिक पद्धतीने सत्यप्रतीज्ञालेख लिहून लग्न करून पुन्हा घरच्यांच्या संमतीने दुसरे लग्न करणाऱ्या त्या नवरोबा विरोधात पहिल्या

ऑनलाइन लोकमतटिटवाळा, दि. 13 - सात दिवसांपुर्वीच प्रेमप्रकरण असलेल्या मुलीशी वैदिक पद्धतीने सत्यप्रतीज्ञालेख लिहून लग्न करून पुन्हा घरच्यांच्या संमतीने दुसरे लग्न करणाऱ्या त्या नवरोबा विरोधात पहिल्या पत्नीने पोलिसात रितसर तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन १२ दिवसांचा कालावधी उलटला तरी आरोपींना अटक करण्यात न आल्याने पोलिसांच्या तपासावरही तक्रारदार मुलीच्या वडिलांनी संशय व्यक्त केला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, टिटवाळ्यात इंदिरानगर येथील मराठी शाळेजवळ राहणाऱ्या दामिनी जोशी (१९) हिचे लग्न २७ एप्रिल २०१६ रोजी मुरबाडमध्ये राहणाऱ्या तेजस व्यापारी (२५) याच्याशी समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे झाले. मात्र एक दिड महिन्यानंतर तेजस व्यापारी हा सुवर्णा चन्ने नामक तरूणीबरोबर फिरायला गेला. याबाबत त्याची दुसरी पत्नी दामिनी हिने तेजसकडे विचारणा केली असता त्याने सुवर्ण चन्ने या मुलीबरोबर २० एप्रिल रोजीच पहिले लग्न झालेले असल्याचे सांगितले. तसेच याबाबत सत्यप्रतिज्ञापत्र देखिल केल्याचे सांगितले. मात्र याचा जाब विचारणाऱ्या दामिनीला तिचा नवरा तेजस, सासू वर्षा, सासरा वसंत, तसेच चुलत दिर कल्पेश यांनी तिला शिवीगाळ करत मारझोड केली. हे सर्व सहन न झाल्याने दामिनीने सदरचा प्रकार आपल्या आई-वडिलांच्या कानावर घातला. १५ ऑगस्ट रोजी त्यामुळे आणखी चिडून दामिनीला लग्नात दिलेले दागिने काढून घेऊन माहेरी हाकलून दिले. या बाबत दामिनीच्या वडिलांनी महिला व बाल विकास विभागाच्या टिटवाळ्यातील महिला समुपदेशन केंद्रात तक्रार दाखल केली. शिवाय हिंदू लोहार समाज महासंघात निवदेन देऊन सदरच्या समस्येवर काही तोडगा निघतो का, याचा प्रयत्न केला. मात्र हिंदू लोहार समाजाच्या बैठकीला दामिनीचे सासरे वसंत व्यापारी हे अनुपस्थित राहिल्याने त्यांची ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून असलेली नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अण्णासाहेब जोशी यांनी रद्द करून एक रूपया दंड ठोठावला. तसेच दामिनीची आपसात संगनमत करून फसवणूक-ठकवणुक करून स्त्रीधनाचा अपहार, तसेच आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय समाज संघाने घेतला. त्यानुसार दामिनी हिने तिचा नवरा, सासू, सासरा व दिराच्या विरोधात तालुका अर्थात टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस हवालदार कोर यांच्याकडे विचारणा केली असता गुन्हा दाखल होऊन दहा-बारा दिवस झालेले असून आपण पंचनामा व तत्सम कामासाठी आरोपीच्या घरी गेलो होतो. मात्र आरोपी मिळून आलेले नाही. तर या बाबत पोलीस निरीक्षक व्यंकटराव आंधळे यांनी सांगितले की, सदरचा तपास हा पोलीस हवालदार कोर यांच्याकडे असून गुन्हा पोलीस ठाण्यात नोंद केला आहे. यातील सर्व आरोपींना अटक करण्याचे आदेश हवालदार कोर यांना दिलेले आहेत. संबधित फिर्यादी मुलीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले.