शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

लग्नात आले विघ्न..!

By admin | Updated: May 13, 2014 03:57 IST

लग्नसराईच्या हंगामात राज्यात मारहाणीचे प्रसंग उद्भवले आहेत.

मुंबई : लग्नसराईच्या हंगामात राज्यात मारहाणीचे प्रसंग उद्भवले आहेत. गेल्या आठवड्यात वरातीत नाचण्यावरून चार ठिकाणी खून पडले असताना गेल्या दोन दिवसांत घडलेल्या चार घटनांनी त्यात भर घातली. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे मधमाश्यांनी एका वºहाड्याचा बळी घेतला. नागपुरात लग्नमंडपात तोडफोड झाली. सोलापुरात घोड्याने लाथ मारल्याने एक जण दगावला. जळगाव जिल्ह्यात लग्नमंडपाच्या पायपात विद्युतप्रवाह शिरल्याने एकाचा बळी गेला. लग्नासारख्या मंगल सोहळ्यात हा प्रकर झाल्याने समाजमन हेलावले आहे. मधमाश्यांचा हल्ला नागभीड (चंद्रपूर) : येनोली (माल) येथे वºहाडी म्हणून आलेल्या आणि पेरजागड (सातबहिणी डोंगर) हे पर्यटनस्थळ पाहायला गेलेल्या वºहाड्यांवर मधमाश्यांनी जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात गणेश महादेव हरडे या वºहाड्याचा मृत्यू झाला तर सात वºहाडी जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. येनोली (माल) येथे विनोद हरी बावणकर यांच्या दोन मुलांचे लग्नकार्य आटोपल्यावर त्यांचे नातेवाईक येनोलीपासून पेरजागड हे पर्यटनस्थळ जवळच असल्याने काही मंडळी ते पाहायला गेली. तिथे कोणीतरी मधमाश्यांच्या मोहोळाला डिवचल्याने मधमाश्यांनी हल्ला चढविला. गणेश हरडे (३६, रा. मूल) या वºहाड्यावर मधमाश्या अक्षरश: तुटून पडल्या. अंगभर चावा घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ओम्कार विनोद मानापुरे (१३, रा. मूल), आशिष विजय ठवरे (२४) पवनी, यश विजय खेडीकर (१३, रा. भंडारा), अनुज अजय ठवरे (१४) अथर्व अजय ठवरे (१०, रा. पवनी) हे गंभीररीत्या जखमी झाले. नागपुरात लग्नमंडपात तोडफोड नागपूर : रस्त्यावर मंडप टाकण्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान लग्नमंडपात तोडफोड करण्यात झाले. या प्रकारामुळे लग्नघरी जमलेल्या मंडळींमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. शेजार्‍यांनी धाव घेऊन आरोपींना कसेबसे आवरले. तक्रार नंदनवन ठाण्यात नोंदविण्यात आली. पोलिसांनी चौघांना अटक केली. दादाराव फत्तूजी अतकरी (वय ५२) हे आराधनानगरातील सिद्धेश्वर कॉलनीत राहतात. ते सिमेंटच्या चौकटी (दारांच्या फ्रेम, खिडक्या) बनवितात. मुलीचे लग्न असल्यामुळे त्यांनी आपल्या घरासमोर मंडप घातला होता. बाजूलाच राहणार्‍या सय्यद असलम सय्यद शौकत सय्यद मोहम्मद (२५) याने त्याला आक्षेप घेतला. ‘तेरे बाप की जगह है क्या’, असे म्हणत सय्यदने वाद घातल्यामुळे या दोघांमध्ये रविवारी दुपारी वाद झाला. ती कुरबुर सायंकाळपर्यंत कायम होती. त्यामुळे अतकरी आणि त्यांचे नातेवाईक रवी जोगे हे दोघे रविवारी रात्री ८.३० वाजता लग्नमंडपात लग्नाच्या व्यवस्थेबाबत चर्चा करीत असताना सय्यद त्याचे वडील सय्यद शौकत सय्यद मोहम्मद (५०), फारुख शेख करीम शेख (२५), निर्भय सुरेशसिंग ठाकूर आणि त्यांच्या पाच ते सहा साथीदारांनी अतकरी तसेच रवीवर हल्ला चढवला. लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉड घेऊन आरोपी मंडपात शिरले. आतमधील जेवणाचे टेबल-खुर्च्या, जेवणाचे पदार्थ फेकून प्रचंड हैदोस घातला. सोलापुरात घोडा भोवला कंदर (जि़ सोलापूर) : जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात रविवारी कामटे-सुरवसे व सुतार-पालवे असे दोन विवाह सोहळे होते़ सकाळी १० वाजता नवरदेवाची वरात काढण्यात आली. वरात विवाहस्थळी आल्यानंतर वाद्य वाजविण्याचे बंद झाले, परंतु एकाने अचानक हलगी वाजविताच घोडेवाल्याने घोडे नाचविण्यास प्रारंभ केला़ पहिला घोडा नाचायचा बंद होताच दुसरा घोडा नाचवत असताना भाऊसाहेब हनुमंत देवकर (२८) घोड्याच्या पाठीमागे आला़ तेव्हा घोड्याने त्याच्या छातीत लाथ मारली़ त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.