शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

लग्नात आले विघ्न..!

By admin | Updated: May 13, 2014 03:57 IST

लग्नसराईच्या हंगामात राज्यात मारहाणीचे प्रसंग उद्भवले आहेत.

मुंबई : लग्नसराईच्या हंगामात राज्यात मारहाणीचे प्रसंग उद्भवले आहेत. गेल्या आठवड्यात वरातीत नाचण्यावरून चार ठिकाणी खून पडले असताना गेल्या दोन दिवसांत घडलेल्या चार घटनांनी त्यात भर घातली. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे मधमाश्यांनी एका वºहाड्याचा बळी घेतला. नागपुरात लग्नमंडपात तोडफोड झाली. सोलापुरात घोड्याने लाथ मारल्याने एक जण दगावला. जळगाव जिल्ह्यात लग्नमंडपाच्या पायपात विद्युतप्रवाह शिरल्याने एकाचा बळी गेला. लग्नासारख्या मंगल सोहळ्यात हा प्रकर झाल्याने समाजमन हेलावले आहे. मधमाश्यांचा हल्ला नागभीड (चंद्रपूर) : येनोली (माल) येथे वºहाडी म्हणून आलेल्या आणि पेरजागड (सातबहिणी डोंगर) हे पर्यटनस्थळ पाहायला गेलेल्या वºहाड्यांवर मधमाश्यांनी जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात गणेश महादेव हरडे या वºहाड्याचा मृत्यू झाला तर सात वºहाडी जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. येनोली (माल) येथे विनोद हरी बावणकर यांच्या दोन मुलांचे लग्नकार्य आटोपल्यावर त्यांचे नातेवाईक येनोलीपासून पेरजागड हे पर्यटनस्थळ जवळच असल्याने काही मंडळी ते पाहायला गेली. तिथे कोणीतरी मधमाश्यांच्या मोहोळाला डिवचल्याने मधमाश्यांनी हल्ला चढविला. गणेश हरडे (३६, रा. मूल) या वºहाड्यावर मधमाश्या अक्षरश: तुटून पडल्या. अंगभर चावा घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ओम्कार विनोद मानापुरे (१३, रा. मूल), आशिष विजय ठवरे (२४) पवनी, यश विजय खेडीकर (१३, रा. भंडारा), अनुज अजय ठवरे (१४) अथर्व अजय ठवरे (१०, रा. पवनी) हे गंभीररीत्या जखमी झाले. नागपुरात लग्नमंडपात तोडफोड नागपूर : रस्त्यावर मंडप टाकण्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान लग्नमंडपात तोडफोड करण्यात झाले. या प्रकारामुळे लग्नघरी जमलेल्या मंडळींमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. शेजार्‍यांनी धाव घेऊन आरोपींना कसेबसे आवरले. तक्रार नंदनवन ठाण्यात नोंदविण्यात आली. पोलिसांनी चौघांना अटक केली. दादाराव फत्तूजी अतकरी (वय ५२) हे आराधनानगरातील सिद्धेश्वर कॉलनीत राहतात. ते सिमेंटच्या चौकटी (दारांच्या फ्रेम, खिडक्या) बनवितात. मुलीचे लग्न असल्यामुळे त्यांनी आपल्या घरासमोर मंडप घातला होता. बाजूलाच राहणार्‍या सय्यद असलम सय्यद शौकत सय्यद मोहम्मद (२५) याने त्याला आक्षेप घेतला. ‘तेरे बाप की जगह है क्या’, असे म्हणत सय्यदने वाद घातल्यामुळे या दोघांमध्ये रविवारी दुपारी वाद झाला. ती कुरबुर सायंकाळपर्यंत कायम होती. त्यामुळे अतकरी आणि त्यांचे नातेवाईक रवी जोगे हे दोघे रविवारी रात्री ८.३० वाजता लग्नमंडपात लग्नाच्या व्यवस्थेबाबत चर्चा करीत असताना सय्यद त्याचे वडील सय्यद शौकत सय्यद मोहम्मद (५०), फारुख शेख करीम शेख (२५), निर्भय सुरेशसिंग ठाकूर आणि त्यांच्या पाच ते सहा साथीदारांनी अतकरी तसेच रवीवर हल्ला चढवला. लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉड घेऊन आरोपी मंडपात शिरले. आतमधील जेवणाचे टेबल-खुर्च्या, जेवणाचे पदार्थ फेकून प्रचंड हैदोस घातला. सोलापुरात घोडा भोवला कंदर (जि़ सोलापूर) : जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात रविवारी कामटे-सुरवसे व सुतार-पालवे असे दोन विवाह सोहळे होते़ सकाळी १० वाजता नवरदेवाची वरात काढण्यात आली. वरात विवाहस्थळी आल्यानंतर वाद्य वाजविण्याचे बंद झाले, परंतु एकाने अचानक हलगी वाजविताच घोडेवाल्याने घोडे नाचविण्यास प्रारंभ केला़ पहिला घोडा नाचायचा बंद होताच दुसरा घोडा नाचवत असताना भाऊसाहेब हनुमंत देवकर (२८) घोड्याच्या पाठीमागे आला़ तेव्हा घोड्याने त्याच्या छातीत लाथ मारली़ त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.