शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लावून दिला विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 19:30 IST

लातूर शहरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिचा सांगली जिल्ह्यातील तासगावातील मुलाशी विवाह लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

राजकुमार जोंधळे

लातूर, दि. 2 : शहरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिचा सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात सावर्डे येथील एका मुलाशी विवाह लावून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात दहा जणांचे रॅकेट असून, त्यांनी यापूर्वीही अल्पवयीन मुलींचा विवाह लावून दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पूनम शहाणे हिच्यासह दहा जणांना अटक करण्यात आली असून, अन्य काहींचा शोध सुरु आहे.या प्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.महिनाभरापूर्वी शहरातील एक ११ वर्षीय मुलगी शाळेतून दुपारीच हरवल्याची तक्रार तिच्या आईने पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, मुलीच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला मात्र, ती आढळून आली नाही. आईने एका महिलेवर संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेत चौकशी केली असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्या महिलेने वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून हा प्रकार केल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. या रॅकेटमधील एकूण दहा जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून, अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान, पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पुनम शहाणे व अन्य नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता, पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास कामासाठी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे उघड केली नाहीत.वधू-वर सूचक मंडळातून चालायचे रॅकेट...लातूर शहरातील झिंगणप्पा गल्लीत राहणा-या एका महिलेने वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून हा विवाह घडवून आणल्याचे पुढे आले आहे.विशेष म्हणजे या रॅकेटमध्ये एका राजकीय पक्षाची जबाबदार कार्यकर्ती सहभागी असून, तिच्या नावावर वधू-वर सूचक मंडळ आहे. या वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यातून त्यांनी असे विवाह लावले असल्याचे पोलिसांनी सांगितले.अन्य आरोपींचा शोध सुरु...अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन विवाह लावणा-या रॅकेटमधील अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून मुलाच्या कुटुंबियांशी बोलाचाली करायची आणि शहरातील एखाद्या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून न्यायाचे...हा उद्योग या आरोपींकडून सुरु होता. यात दहा जणांना अटक केली असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी सांगितले.गायब मुलींचा शोध सुरु...लातूर शहरातून गेल्या वर्षभरात गायब झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध पोलीस प्रशासनाने सुरु केला आहे. कथित वधू-वर सूचक मंडळाच्या नावाखाली सुरु करण्यात आलेल्या गोरखधंद्याचा पर्दाफाश केल्यानंतर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गायब झालेल्या मुलींची माहिती घेतली जात असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहे. या वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून किती मुलींची फसवणूक करण्यात आली याचाही शोध सुरु आहे. अशी माहिती, लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत ढवळे यांनी दिली.विक्रीचा संशय..?कथित वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना वेगवेगळे आमिष दाखवून फसवणे, त्यांचा इतरत्र विवाह लावून देणे, असा प्रकार या मंडळाच्या मोहक्यांकडून झाल्याचे पुढे आले आहे. लातूर शहरातील गायब मुलींची राज्यासह परराज्यात विक्री करण्यात येत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.विशेष तपास पथकाची नियुक्तीलातुरातील अल्पवयीन मुलींना वेगवेगळी आमिषं दाखवून त्यांचे अपहरण करुन, विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी चौकशी उपाधीक्षक शिलवंत ढवळे हे करणार आहेत. त्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिली.