शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

अल्पवयीन जोडप्याचा रोखला विवाह !

By admin | Updated: May 3, 2016 02:20 IST

अंबाजोगाई तालुक्यात ममदापूर (परळी) येथे नवरदेव व नवरी दोघेही अल्पवयीन ठरल्याने प्रशासनाने ऐनवेळी विवाह रोखला. महाराष्ट्र दिनी रविवारी गावात एकाच मांडवात सहा विवाह होणार होते.

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ममदापूर (परळी) येथे नवरदेव व नवरी दोघेही अल्पवयीन ठरल्याने प्रशासनाने ऐनवेळी विवाह रोखला. महाराष्ट्र दिनी रविवारी गावात एकाच मांडवात सहा विवाह होणार होते. पैकी पाच विवाह झाले; मात्र, एका वऱ्हाडाला नवरीविनाच परतावे लागले. ममदापूर (परळी) येथील सीता (नाव बदलले आहे) हिचा विवाह रविवारी धारूर तालुक्यातील सुरनरवाडी येथील बाबाराव काळे याच्याशी होणार होता. त्यांच्यासोबतच इतर पाच विवाहही होणार होते. सहा विवाह असल्याने गावकऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. गावकरी लगबगीत असतानाच पोलीस व महसूल प्रशासनाची दोन वाहने गावात धडकली. अधिकाऱ्यांनी सीता, बाबाराव काळे या जोडप्याची शहानिशा केली असता नवरीचे वय १५ तर नवरदेवाचे वय १७ असल्याचे समोर आले. महसूल व पोलीस प्रशासनाने विवाह रद्द करीत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून लिहून घेतले.