शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

बाजार समितीचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे

By admin | Updated: June 8, 2014 01:15 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील चटईक्षेत्रचे वाटप , संचालक मंडळाची मुदतवाढ व इतर विषयांविषयी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. पु

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील चटईक्षेत्रचे वाटप , संचालक मंडळाची मुदतवाढ व इतर विषयांविषयी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. पुढील आठवडय़ात याविषयी सुनावणी होणार आहे. काय निर्णय होणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. 
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार विविध कारणांमुळे चर्चेत येवू लागला आहे. संचालक मंडळाची मुदत संपून सहा महिने झाले तरी अद्याप निवडणुका होवू शकल्या नाहीत.  यापूर्वीच संचालक मंडळाविषयी न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाने धोरणात्मक निर्णय घेण्यास संचालक मंडळास मनाई केली आहे. अशा स्थितीमध्ये शासनाने दुस:यांदा मुदतवाढ दिली आहे. मसाला मार्केटमधील वाढीव चटईक्षेत्रच्या देण्यावरूनही एक संचालकाने न्यायालयात धाव घेतली आहे. 
पणन संचालकांनी यामध्ये गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता व्यक्त करून सभापती व सचिवांना तुमच्यावर गुन्हा का दाखल करण्यात येवू नये अशी कारणो दाखवा नोटीस दिली आहे. या सर्व कारणांमुळे संस्था कायम चर्चेत राहू लागली आहे. 
वाढीव चटईक्षेत्र, संचालक मंडळाची मुदतवाढ व इतर याचिकांवर पुढील आठवडय़ात उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काहीजण संचालक मंडळ बरखास्त होणार असे गृहीतक मांडत आहेत. तर काहीजण मुदतवाढ कायम राहणार असे मत मांडत आहेत. 
नक्की काय होणार याकडे आता सर्वाचेच लक्ष लागले आहे. महत्वाचे निर्णय होत नसल्यामुळे कर्मचा:यांमध्येही कामापेक्षा या चर्चेत रस दिसत आहे. अनेकांनी निर्णय लागल्यानंतर फटाके वाजविण्याचीही तयारी सुरू केली असून नक्की काय निर्णय होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. 
(प्रतिनिधी)
 
पणन संचालकांचा मुदतवाढीस विरोध
शासनाने नुकतीच संचालक मंडळास मुदतवाढ दिली आहे. परंतू तत्पूर्वी दोन दिवस अगोदरच पणन संचालक सुभाष माने यांनी पणन सचिवांना मेल करून  मुंबई बाजार समितीच्या संचालक मंडळास मुदतवाढ दिली जावू नये असे स्पष्ट मत कळविले होते. एफएसआय गैरव्यवहार प्रकरणी सचिव व सभापतींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे मुदतवाढ देवू नये असे कळविले होते. 
 
बाजार समिती म्हणते, आरोप खोटे
बाजार समिती सभापती बाळासाहेब सोळसकर व इतर संचालक  मात्र पणनसंचालक सुभाष माने  हेतूपुरस्पर आरोप करत असल्याचे स्पष्टीकरण देत आहेत. एफएसआय प्रकरणी गैरव्यवहार झालेला नाही. याविषयी एक याचिका उच्च न्यायालयात सुरू आहे. न्यायालयाचा निर्णय आम्हास मान्य आहे. यापूर्वी पणन संचालकांचे मुंबई बाजार समितीच्या सचिव पदावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आकसाने कारवाई सुरू असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.