शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

जिजाऊंच्या भूमीत मराठा जनसागर!

By admin | Updated: September 27, 2016 02:20 IST

कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या क्रांती मोर्चाचे विराट दर्शन सोमवारी बुलडाणा

बुलडाणा : कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या क्रांती मोर्चाचे विराट दर्शन सोमवारी बुलडाणा येथे पाहायला मिळाले. तरुणी व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि काटेकोर नियोजन व शिस्त येथेही दिसून आली. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील बदल आणि स्वामिनाथन आयोग लागू करणे या मागण्यांसोबतच, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना शहीद घोषित करा, ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना वृद्धापकाळात सन्मानाने जगण्यास पाच हजार सन्मान वेतन द्यावे, मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे महिला ग्रामीण विद्यापीठाची स्थापना करावी, या नवीन मागण्या या मोर्चात करण्यात आल्या. पहाटे ५पासूनच गावागावातून मराठा समाजाचे जत्थेच्या जत्थे बुलडाण्याकडे कूच करत होते. सातपासून मोर्चेकरी जयस्तंभ चौकात दाखल झाले. अगदी शिस्तबद्धपणे, सुरुवातीला युवती, महिला व त्यानंतर पुरूषांचा मोर्चामध्ये सहभाग होता. मागण्यांच्या वाचनाला ११.३० वाजतापासून सुरुवात झाली. त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली. दुपारी १२.३० वाजता राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला. मंचावरील ११ मुलींनी २२ मागण्यांचे वाचन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)जिजाऊंच्या लेकी मोर्चात!बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ही जिजाऊंची जन्मभूमी! त्यामुळे सकल मराठा क्रांती मूक मोर्चात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आणि झेंड्यांसोबतच राष्ट्रमाता जिजाऊंचे छायाचित्र असलेले झेंडे आणि प्रतिमा मोठ्या प्रमाणात दिसून आले.शहिदांच्या भूमीत वज्रमूठनंदुरबार : स्वातंत्र्य लढ्यातील शिरीषकुमार आणि इतर चार बालशहिदांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबारात सोमवारी सकल मराठा मूक क्रांती मोर्चाचा एल्गार नंदुरबारकरांनी सोमवारी याची देही, याची डोळा अनुभवला. वर्षानुवर्षापासून मनात साचलेल्या असंतोषाचा आक्रोश मौनातून प्रदर्शित करीत सकल मराठा समाजाच्या या मोर्चाने नंदुरबारात आजवर निघालेल्या सर्वच मोर्चांचा विक्रम मोडीत काढला. शिस्त आणि नियोजनाचा आदर्श घालून देत लाखोंच्या संख्येत समाजबांधवांनी सहभाग नोंदविला. महिला आणि विद्यार्थिनींची संख्या लक्षवेधी होती.च्मोर्चासाठी सकाळी ९ वाजेपासूनच हजारो समाजबांधव विविध वाहनांनी नंदुरबारात दाखल होत होते. दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास सहा तरुणींनी पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी केली. त्यानंतर मूक मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाचे पहिले टोक ते शेवटचे टोक असे जवळपास अडीच ते तीन किलोमीटरचे लांब अंतर होते. मोर्चेकरी महिला, तरुण, तरुणी, वृद्ध यांच्या हातात काळे झेंडे, भगवे झेंडे, विविध घोषणा असलेले फलक होते.