शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

बांगलादेशी घुसखोरांनी बनविले उपराजधानीला माहेरघर

By admin | Updated: December 19, 2014 00:42 IST

उपराजधानीत माहेरघर बनविणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांची संख्या महिनोगणिक वाढत आहे. मात्र या धोकादायक प्रकाराकडे पोलिसांची विशेष शाखा, गुप्तचर यंत्रणा आणि दहशतवादविरोधी

नागपूर : उपराजधानीत माहेरघर बनविणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांची संख्या महिनोगणिक वाढत आहे. मात्र या धोकादायक प्रकाराकडे पोलिसांची विशेष शाखा, गुप्तचर यंत्रणा आणि दहशतवादविरोधी पथकाचे पुरते दुर्लक्ष आहे. परिणामी त्याची मोठी किंमत चुकवावी लागू शकते, अशी भीती खुद्द काही पोलीस अधिकारीच खासगीत व्यक्त करीत आहेत. नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उपराजधानीत सद्यस्थितीत ५०० पेक्षा जास्त बांगलादेशी घुसखोर आहेत. यातील काही जण रोजमजुरी करतात तर, काही जण हातगाड्यांवर व्यवसाय करतात. काही जण मात्र काय करतात, तोच संशोधनाचा विषय आहे. कोलकाता, मालदा (प. बंगाल) या भागातून भारतात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर शिरतात. तेथून रेल्वेच्या माध्यमाने मिळेल त्या भागात ते जातात. जेथे ‘आपली माणसं’ स्थिरावली, अशा ठिकाणी वास्तव्याला ही मंडळी प्राधान्य देतात. उपराजधानी सोयीची वाटत असल्यामुळे २००५ पासून येथे घुसखोरांची संख्या झपाट्याने वाढत आहे.दोन वर्षात २०० वर पकडलेपोलिसांनी सप्टेंबर २००६ मध्ये १०३ घुसखोरांना नागपुरात पकडले. त्यांची नंतर भारतातून हकालपट्टी करण्यात आली. या घटनेच्या काही दिवसानंतर पुन्हा नागपूर आणि गोंदियात ८० बांगलादेशी घुसखोर पकडण्यात आले. २४ डिसेंबर २००७ मध्ये ३४ बांगलादेशी घुसखोर पकडण्यात आले. तर, जानेवारी २००८ मध्ये पुन्हा अशाच प्रकारे काही घुसखोरांना अटक करण्यात आली. या कारवायांचा धसका घेऊन बांगलादेशी घुसखोरांनी नागपुरातून पलायन सुरू केले. मात्र, २०१० पासून त्यांनी पुन्हा नागपुरात आश्रय घेणे सुरू केले आहे. अलिकडे घुसखोरांच्या नागपुरातील वास्तव्याचा आकडा चांगलाच फुगू लागला आहे. गुप्तचर यंत्रणा आणि विशेष शाखा (एसबी) तसेच एटीएसचे त्याकडे पुरते दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. या संदर्भात संपर्क केला असता अधिकारी बोलायला तयार नाहीत. विशेष म्हणजे, पोलिसांच्या विशेष शाखेकडे याबाबत कसलीही माहिती नाही. गेल्या वर्षी दोन घुसखोरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आमच्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे येथील अधिकारी सांगतात. गेल्या आठवड्यात प्रशासनालाही त्यांच्याकडून अशीच (दोन घुसखोरांची) माहिती देण्यात आल्याचे कळते. त्यामुळे बांगलादेशी घुसखोराच्या मुद्यावर तपास यंत्रणा किती गांभिर्याने लक्ष ठेवून आहेत, त्याची प्रचिती येते. (प्रतिनिधी) अर्थव्यवस्थेलाही धोकाबांगलादेशी घुसखोर भारताची चलन व्यवस्था खिळखिळी करण्यात महत्त्वाची भूमिका वठवत आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांत ५०० आणि १००० च्या लाखोंच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांपैकी बहुतांश आरोपी प. बंगालच्या सीमेनजीकचे (कोलकाता, मालदा जिल्ह्यातील) रहिवासी आहेत. सीमेपलीकडून या नोटा आणल्याची त्यांनी पोलिसांकडे कबुलीही दिली आहे. तरीसुद्धा घुसखोरांची माहिती ठेवून त्यांना अटकाव करण्यात तपास यंत्रणा स्वारस्य दाखवत नाही.